शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मान्सूनच्या संथ गतीने बॅकलॉग वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 00:18 IST

काही ठराविक दिवस वगळल्यास नागपुरात जुलै महिन्यात पावसाळी ढग शांत झाले आहेत. पाऊस होत नसल्याने उष्णता वाढली आहे. विदर्भातील तीन जिल्हे कमी पावसामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. सध्या विदर्भात २६९.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देआठवडाभरापासून पावसाचे ढग शांत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काही ठराविक दिवस वगळल्यास नागपुरात जुलै महिन्यात पावसाळी ढग शांत झाले आहेत. पाऊस होत नसल्याने उष्णता वाढली आहे. विदर्भातील तीन जिल्हे कमी पावसामुळे रेड झोनमध्ये आले आहेत. सध्या विदर्भात २६९.२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. साधारणत: या काळात सरासरी २७२.६ मिमी पावसाची नोंद होत असते. यावरून स्पष्ट दिसते की आठवडाभर पाऊस थांबला असल्याने पावसाचा बॅकलॉग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शहरात या मान्सूनमध्ये आतापर्यंत ३९८.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. १ जूनपासून ११ जुलैपर्यंत नागपुरात सरासरी ६ टक्के, अमरावतीत ५, चंद्रपूरमध्ये ३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मात्र याउलट गडचिरोलीत २ टक्के, भंडारा २ टक्के आणि वर्ध्यात ३ टक्के पाऊस कमी झाला. गोंदिया जिल्ह्यात सामान्यपेक्षा २८, अकोल्यामध्ये २१ टक्के आणि यवतमाळमध्ये २० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे कमी पावसामुळे हे तिन्ही जिल्हे रेड झोनमध्ये आले आहेत. वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांची स्थिती समाधानकारक आहे. या दोन्ही जिल्ह्यात सामान्यपेक्षा अनुक्रमे ३६ आणि २१ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली.उमसने वाढविला मनस्तापशहरात शनिवारी सकाळपासून ढग दाटले होते. दुपारपर्यंत राहून राहून ढगांमधून ऊन तापत होते. हवेचा वेग कमी असल्याने आणि वातावरणात आर्द्रता असल्याने उमस वाढायला लागली आहे. कमाल तापमान सामान्यपेक्षा एक अंश अधिक म्हणजे ३३.२ अंश आणि रात्रीचे तापमान २४.३ अंशावर कायम होते.विदर्भाच्या काही जिल्ह्यात पाऊसविदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३०.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. याशिवाय अकोलामध्ये २७.४ मिमी, गोंदियात १४.२ मिमी, वर्ध्यात १६ मिमी, अमरावतीत ४ मिमी, ब्रह्मपुरीत ३.२ मिमी आणि बुलडाण्यात २ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर