शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

‘शुभमंगल’ला परवानगी मिळाली पण उशीर झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 11:07 PM

अनलॉकची प्रक्रिया सुरू करून टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता देत नियमांच्या अधीन राहून मंगल कार्यालय, सभागृहामध्ये ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आली. मात्र या परवानगीला आता खूप उशीर झाला आहे आणि संबंधित क्षेत्राची पूर्ण साखळी विस्कटली असून झालेले नुकसान भरून निघणारे नाही, अशी खंत मंगल कार्यालय व्यावसायिकांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉकची प्रक्रिया सुरू करून टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता देत नियमांच्या अधीन राहून मंगल कार्यालय, सभागृहामध्ये ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आली. मात्र या परवानगीला आता खूप उशीर झाला आहे आणि संबंधित क्षेत्राची पूर्ण साखळी विस्कटली असून झालेले नुकसान भरून निघणारे नाही, अशी खंत मंगल कार्यालय व्यावसायिकांनी व्यक्त केली.प्रशासनाने दिलेल्या नियमावलीनुसार मंगल कार्यालयात फिजिकल डिस्टन्स्ािंगचे पालन करत लग्नसोहळा आयोजित करण्यात येणार आहेत. मात्र या परवानगीला खूप उशीर झाला आहे. मंगल कार्यालय, लॉन व्यावसायिकांची लाखोंची कमाई बुडाली. शहरात दीड हजारावर मंगल कार्यालये आहेत. हजारावर सभागृह तर लॉनदेखील पाचशेवर आहेत. मंगल कार्यालयाचे कमीतकमी भाडे सरासरी ४० हजार ते लाखो रुपयांच्या घरात असते. लॉन आणि सभागृहाचीही स्थिती जवळपास सारखीच असते. भाड्याव्यतिरिक्त इतर शुल्क घेतले जाते. मात्र लग्न कार्यच झाले नसल्याने हे सर्व बुडाले. मंगल कार्यालयातील लग्न समारंभाशी जुळलेले कॅटरिंग व्यवसाय, बिछायत, बॅण्ड, घोडे यांचा व्यवसाय तसेच कार्यालयात काम करणारे कामगार, स्वयंपाकी यांचा रोजगार अशी पूर्ण साखळी कोलमडली. आता किमान वर्षभर तरी हे नुकसान भरून निघणार नाही, अशी व्यथा मंगल कार्यालय मालकांनी व्यक्त केली. परवानगी मिळण्यासाठी अनेकदा बैठक घेऊन शासन व प्रशासनाला निवेदने दिली. शासनाने परवानगी दिली, पण खूप उशीर केल्याची टीका व्यावसायिकांनी केली आहे.दरवर्षी याच सीझनमध्ये लाखोंची उलाढाल होत असते. मात्र यावर्षी पूर्ण सीझन खाली गेला. प्रशासनाने लोकांना घरी लग्न करण्याची परवानगी दिली व अनेकांनी ते उरकूनही घेतले. मात्र ९० टक्के लोकांच्या घरी एवढी जागा नसते, ज्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले असेल का?. हीच परवानगी मंगल कार्यालय चालकांना दिली असती तर नियमांचे पालन झाले असते आणि थोडा का होईना व्यवसायही मिळाला असता.युवराज शिर्के, मंगल कार्यालय व्यावसायिकलहान कार्यालयांना प्राधान्य, दरही कमी केलेमोठ्या मंगल कार्यालयांचे भाडे ५० व्यक्तींसाठी परवडणारे नसल्याने लहान हॉल बुकिंग केले जात आहेत. जून महिन्यात २५, २९ व ३० या तीनच तारखांचे मुहूर्त शिल्लक होते व या दिवशी अनेकांनी लग्न उरकून घेतल्याची माहिती आहे. अनेक मंगल कार्यालयाच्या मालकांनी कार्यालयांचे दर १० ते १५ हजारांनी कमी केले आहे.

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूर