शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

शिंदे-फडणवीस सरकारने रुग्णवाहिका, पाणीपुरवठा योजनांचाही निधी रोखला; काँग्रेस नेत्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 13:52 IST

माजी मंत्री सुनील केदार व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

नागपूर : राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने नागपूर जिल्ह्यातील विकासकामांचा ७०० कोटींचा निधी रोखला आहे. विशेष म्हणजे यात रुग्णवाहिका, पुरामुळे वाहून गेलेल्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, शाळा दुरुस्ती अशा अत्यावश्यक कामांचा निधी रोखला आहे. विकासात राजकारण आणून ग्रामीण भागातील लोकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी केला.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामांना सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यात यावी. यासाठी जिल्हा परिषदेतीलकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, नगर परिषदांचे अध्यक्ष व सदस्यांनी सोमवारी सरपंच भवन येथे माजी मंत्री सुनील केदार व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा नियोजनचा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करून पुढील वर्षाचा विकास आराखडा मंजूर केला जातो. मात्र, मागील दोन वर्षांतील विकासकामांसाठी मंजूर असलेला निधी थांबविला आहे. ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सुनील केदार यांनी यावेळी केला. मंजूर निधी रोखल्याने सरकारने आंदोलनाची वेळ आणली आहे. विकासात राजकारण आणून ग्रामीण भागातील लोकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राजेंद्र मुळक यांनी केला. यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, जि. प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, सभापती अवंतिका लेकुरवाळे, राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, प्रवीण जोध, माजी उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, माजी सभापती उज्ज्वला बोढारे, नेमवाली माटे, वंदना बालपांडे, प्रकाश वसू, संजय जगताप, सुनीता ठाकरे, दीक्षा मुलताईकर, वृंदा नागपुरे यांच्यासह जि. प., पं. स. सभापती, सदस्य उपस्थित होते. सुनील केदार व राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन विटणकर यांना निवेदन देऊन स्थगिती हटवून तातडीने निधी देण्याची मागणी केली.

रुग्णवाहिकांचाही निधी रोखला

जिल्ह्यातील लोकांना आरोग्य सुविधा व्हावी, यासाठी तीन रुग्णवाहिकांसाठी मंजूर असलेला ४५ लाखांचा निधी रोखला आहे. अत्यावश्यक सेवांचा निधी रोखला नसल्याचा दावा सरकारकडून केला जात असताना जिल्हा परिषदेला हा निधी मिळालेला नाही.

पुरात वाहून गेलेल्या नळ योजनेचा निधी रोखला

पारशिवणी तालुक्यतील नेअरवाडा येथील पाणीपुरवठा योजना पुराच्या पाण्यात वाहून गेली. गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर असलेला २७ लाखांचा निधी शासनाने रोखला आहे.

शाळा दुरुस्ती व बांधकाम थांबले

निधी रोखल्याने ग्रामीण भागातील शाळांची दुरुस्ती व वर्गखोल्यांचे बांधकाम थांबले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे जि. प. पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

थांबविण्यात आलेला निधी (कोटी)

  • पुरामुळे हानी झालेले रस्ते, पूल दुरुस्ती -१२६.००
  • सिंचन विभाग -३०.५२
  • बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, पशुसंवर्धन व पंचायत विभाग (२०२१-२२)- ११५.११
  • खनिज विभागाचा बांधकाम व सिंचन (२०२१-२२)- १२६.९०
  • प्रशासकीय मान्यता व निधी निर्गमित प्रस्तावित (२०२२-२३)- २३८.४०
  • ग्राम विकास योजना (२०२१-२२)- ३२.००
  • सार्वजनिक बांधकाम (२०२१-२२)- १५०.००
टॅग्स :Politicsराजकारणzpजिल्हा परिषदcongressकाँग्रेसnagpurनागपूरagitationआंदोलन