शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

शिंदे-फडणवीस सरकारने रुग्णवाहिका, पाणीपुरवठा योजनांचाही निधी रोखला; काँग्रेस नेत्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 13:52 IST

माजी मंत्री सुनील केदार व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

नागपूर : राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने नागपूर जिल्ह्यातील विकासकामांचा ७०० कोटींचा निधी रोखला आहे. विशेष म्हणजे यात रुग्णवाहिका, पुरामुळे वाहून गेलेल्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, शाळा दुरुस्ती अशा अत्यावश्यक कामांचा निधी रोखला आहे. विकासात राजकारण आणून ग्रामीण भागातील लोकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी केला.

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामांना सरकारने दिलेली स्थगिती उठविण्यात यावी. यासाठी जिल्हा परिषदेतीलकाँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, नगर परिषदांचे अध्यक्ष व सदस्यांनी सोमवारी सरपंच भवन येथे माजी मंत्री सुनील केदार व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा नियोजनचा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करून पुढील वर्षाचा विकास आराखडा मंजूर केला जातो. मात्र, मागील दोन वर्षांतील विकासकामांसाठी मंजूर असलेला निधी थांबविला आहे. ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सुनील केदार यांनी यावेळी केला. मंजूर निधी रोखल्याने सरकारने आंदोलनाची वेळ आणली आहे. विकासात राजकारण आणून ग्रामीण भागातील लोकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राजेंद्र मुळक यांनी केला. यावेळी आमदार अभिजित वंजारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, जि. प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, सभापती अवंतिका लेकुरवाळे, राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, प्रवीण जोध, माजी उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, माजी सभापती उज्ज्वला बोढारे, नेमवाली माटे, वंदना बालपांडे, प्रकाश वसू, संजय जगताप, सुनीता ठाकरे, दीक्षा मुलताईकर, वृंदा नागपुरे यांच्यासह जि. प., पं. स. सभापती, सदस्य उपस्थित होते. सुनील केदार व राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन विटणकर यांना निवेदन देऊन स्थगिती हटवून तातडीने निधी देण्याची मागणी केली.

रुग्णवाहिकांचाही निधी रोखला

जिल्ह्यातील लोकांना आरोग्य सुविधा व्हावी, यासाठी तीन रुग्णवाहिकांसाठी मंजूर असलेला ४५ लाखांचा निधी रोखला आहे. अत्यावश्यक सेवांचा निधी रोखला नसल्याचा दावा सरकारकडून केला जात असताना जिल्हा परिषदेला हा निधी मिळालेला नाही.

पुरात वाहून गेलेल्या नळ योजनेचा निधी रोखला

पारशिवणी तालुक्यतील नेअरवाडा येथील पाणीपुरवठा योजना पुराच्या पाण्यात वाहून गेली. गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर असलेला २७ लाखांचा निधी शासनाने रोखला आहे.

शाळा दुरुस्ती व बांधकाम थांबले

निधी रोखल्याने ग्रामीण भागातील शाळांची दुरुस्ती व वर्गखोल्यांचे बांधकाम थांबले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे जि. प. पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

थांबविण्यात आलेला निधी (कोटी)

  • पुरामुळे हानी झालेले रस्ते, पूल दुरुस्ती -१२६.००
  • सिंचन विभाग -३०.५२
  • बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, पशुसंवर्धन व पंचायत विभाग (२०२१-२२)- ११५.११
  • खनिज विभागाचा बांधकाम व सिंचन (२०२१-२२)- १२६.९०
  • प्रशासकीय मान्यता व निधी निर्गमित प्रस्तावित (२०२२-२३)- २३८.४०
  • ग्राम विकास योजना (२०२१-२२)- ३२.००
  • सार्वजनिक बांधकाम (२०२१-२२)- १५०.००
टॅग्स :Politicsराजकारणzpजिल्हा परिषदcongressकाँग्रेसnagpurनागपूरagitationआंदोलन