शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सेवा अपुऱ्या; पण कर वाढणार !

By admin | Updated: April 13, 2016 02:59 IST

अग्निशमन विभागाचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. यातील अंतर कमी करून उत्पन्नातूनच खर्च भागावा यासाठी अग्निशमन सेवाकरात ....

नागपूर : अग्निशमन विभागाचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. यातील अंतर कमी करून उत्पन्नातूनच खर्च भागावा यासाठी अग्निशमन सेवाकरात वाढ करण्याचा प्रस्ताव विभागाच्या विचाराधीन आहे. मे महिन्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. पण सध्या मनपाच्या अग्निशमन विभागाच्या वतीने नागपूरकरांना देण्यात येणाऱ्या सेवा अपुऱ्या आहेत, त्यात सुधारणा कधी होणार यावर प्रशासन अद्यापही गप्प आहे. अग्निशमन सेवाकर निर्धारित करण्याचा अधिकार राज्य सरकारला असल्याने सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. परंतु सेवाकरात नेमकी किती वाढ केली जाणार आहे. या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही.गेल्या पाच वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अग्निशमन सेवाकरात वाढ केली होती. तसेच उंच इमारतीवर इमारत कर लावण्यात आला होता. परंतु या करवाढीला सभागृहाची व राज्य सरकारची अनुमती घेतली नव्हती. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत हा निर्णय घेण्यात आला होता. या विरोधात काही नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर ही करवाढ मागे घेण्यात आली. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला. शहर विकास नियमावलीनुसार १५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या अथवा १५०चौरस मीटर मधील व्यापारी उपयोगाच्या मालमत्ताधारकांकडून एकरकमी कर वसुली केली जाते. यावर दरवर्षी एक टक्का शुल्क आकारण्यात येते. गेल्या तीन वर्षात अग्निशमन विभागाच्या उत्पन्नात घट झाली आहे. सन २०१३-१४ या वर्षात ५.५० कोटी , २०१४-१५ या वर्षात ३.६१ कोटी तर सन २०१५-१६ या वर्षात २.५८ कोटींची कर वसुली झाली आहे. त्यामुळे करवाढ आवश्यक असल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी सांगितले. विभागाला सक्षम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे विभागाचा खर्च कर वसुलीतून होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.(प्रतिनिधी)आठ कोटी परत केलेउंच इमारत निधी व अग्निशमन सेवाकरात विभागाने वाढ केली होती. परंतु उच्च न्यायालयाने याला स्थगिती दिल्याने विभागाला आर्थिक फटका बसला. वसूल करण्यात आलेले ८ कोटी विभागाला परत करावे लागले. सॉ -मिल व फटाक्यांच्या दुकानांवर नजर केरळ येथील मंदिरात फटाक्यामुळे आग लागल्याची घटना घडली. याची दखल घेत अग्निशमन विभागाने शहरातील फटाक्यांच्या दुकानांचा सर्वे केला आहे. शहरात ३० फटाक्यांची दुकाने आहेत. ही दुकाने नागरी वस्तीत असल्याने यापासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दुकानांना परवाना देण्याचे अधिकार पोलीस व स्फोटके विभागाला आहेत. परंतु अग्निशमन विभाग या विभागांना पत्र लिहून याची दखल घेण्याची सूचना केली आहे. तसेच सॉ मिलमध्ये बांधकाम केले जात नाही. त्यामुळे त्यांना अनुमतीची गरज नसते. परंतु आगीचा धोका विचारात घेता सॉ मिल व फटाक्यांच्या दुकानावर विभागाची नजर आहे. त्यांच्याकडून करवसुली करण्याचा विचार आहे.