शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

समाजाची नि:स्वार्थ सेवा करणारे इतिहास घडवितात : सत्यपाल सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 11:44 PM

जे लोक नि:स्वार्थ भावनेतून समाजाची व राष्ट्राची सेवा करतात तेच इतिहास घडवितात. समाजातही अशाच लोकांचा सन्मान होतो व ते चिरंतन आठवणीत राहतात, अशी भावना केंद्रीय मानव संसाधन व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले. मैत्री गौरव पुरस्कार वितरण समारोहाच्या वेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देमैत्री गौरव पुरस्कारांचे थाटात वितरण

आॅनलाईन लोकमतनागपूर : ईश्वराने प्रत्येकाला एक विशेष उद्देश ठेवून जन्म दिला आहे. जी व्यक्ती कुटुंबाचे, समाजाचे आणि राष्ट्राचे कल्याण करू शकत नाही त्याने जन्म व्यर्थ गेला असे समजावे. जे लोक नि:स्वार्थ भावनेतून समाजाची व राष्ट्राची सेवा करतात तेच इतिहास घडवितात. समाजातही अशाच लोकांचा सन्मान होतो व ते चिरंतन आठवणीत राहतात, अशी भावना केंद्रीय मानव संसाधन व गंगा शुद्धीकरण राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केले. मैत्री गौरव पुरस्कार वितरण समारोहाच्या वेळी ते बोलत होते.मैत्री परिवाराच्यावतीने शनिवारी अंध विद्यालयाच्या मुंडले सभागृहात भव्य समारोहात मैत्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दिव्यांग असूनही उद्योगाच्या क्षेत्रात भरारी घेणारे उद्योजक जयसिंह चौहान यांना मानाच्या मैत्री गौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. २१ हजार रुपयाचा धनादेश, मानपत्र, मानचिन्ह व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, उपाध्यक्ष विजय शाहाकर, सचिव प्रमोद पेंडके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. सत्यपाल सिंह यांनी वेद मंत्राद्वारे मार्गदर्शनास सुरुवात करीत आध्यात्मिक बोध घडवून दिला. आज समाजात गुंड व बदमाश प्रवृत्तीच्या लोकांचा नाही तर चांगल्या लोकांचा सन्मान करण्याची गरज आहे. लोकांनीही अशा लोकांच्या सोबत ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. कुप्रवृत्तीच्या लोकांचा सन्मान केल्यास राष्ट्रावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. भीतीमुक्त समाज निर्माण करायचा असेल तर अशा सेवाभावी लोकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मैत्री परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले. व्यक्तींनी समाजाला काही देणे शिकले पाहिजे. नि:स्वार्थ दान आणि चांगल्या लोकांच्या बाजूने उभे राहा असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय भेंडे यांनी केले. संचालन माधुरी यावलकर यांनी केले. प्रमोद पेंडके यांनी आभार मानले.यांचाही मैत्री गौरव पुरस्काराने सन्मानजयसिंह चौहान यांच्यासह विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या आठ नामवंत व्यक्तींचा यावेळी मैत्री गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये अंध मुलांसाठी सेवा देणाऱ्या मायाताई ठोंबरे, गडचिरोली येथे सर्च संस्थेसोबत आदिवासींना सेवा देणारे डॉ. योगेश काळकोंडे, खराशी, जि. भंडारा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुबारक अली उमर अली सैयद, रायफल शुटर व प्रशिक्षक अनिल पांडे, पर्यावरण स्नेही व पक्षीमित्र कौस्तुभ पांढरीपांडे, ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर यांच्यासह नागपूर पोलिसांची भरोसा सेल व वाहतूक पोलिसांच्या ‘एफ-कॉप’ टीमला यावेळी सन्मानित करण्यात आले. भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक शुभदा संखे यांच्या नेतृत्वात संपूर्ण टीम आणि वाहतूक पोलिसांचे जयेश भांडारकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण टीमला यावेळी सन्मानित करण्यात आले.सायकल नको, दिव्यांगांना सक्षम करा : चौहानसत्काराला उत्तर देताना जयसिंह चौहान यांनी दिव्यांग लोकांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी सरकारकडे करीत त्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. दिव्यांगांना विविध योजनाद्वारे ट्रायसिकल वाटपाचा कार्यक्रम केला जातो. मात्र त्यांना सायकली देण्यापेक्षा दिव्यांग सक्षम होतील यासाठी उद्योग स्थापण्यात मदत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भारतात सात कोटी दिव्यांगजन आहेत. त्यांना निराधार भत्ता आणि सायकली देण्यात पैसा खर्च करण्यात अर्थ नाही. आम्ही २६० प्रकारच्या लघुउद्योगांची यादी तयार केली आहे. शासनाने दिव्यांगांना हे लघुउद्योग करण्यासाठी मदत करावी. ते सक्षम झाल्यास तेही सरकारला कर देतील असा विश्वास त्यांनी दिला.

टॅग्स :nagpurनागपूर