शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

नागपूर रेल्वे स्थानकावर भरकटलेल्या ४१४ बालकांना सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:58 AM

जानेवारी ते सप्टेबर दरम्यान तब्बल ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची धक्कादायक माहिती आहे. हे बालक असामाजिक तत्त्वांच्या हाती लागण्यापूर्वी त्यांना आरपीएफने सुरक्षा कवच पुरवून सुखरुप कुटुंबीयांच्या सुपूर्द केले आहे.

ठळक मुद्देआरपीएफचे योगदानहरवलेली मुले केली कुटुंबीयांना सुपूर्द

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईने रागावले, वडील दारू पितात, शाळेत शिक्षकांनी मारले अशा एक ना अनेक कारणावरून अनेक मुलेमुली घर सोडण्याचा विचार करतात. मिळेल त्या रेल्वेगाडीने प्रवास करतात. जानेवारी ते सप्टेबर दरम्यान तब्बल ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची धक्कादायक माहिती आहे. हे बालक असामाजिक तत्त्वांच्या हाती लागण्यापूर्वी त्यांना आरपीएफने सुरक्षा कवच पुरवून सुखरुप कुटुंबीयांच्या सुपूर्द केले आहे.लहान मुलांच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होतो. क्षुल्लक कारणावरून ते घर सोडण्याचा निर्णय घेतात. कोणताच विचार न करता ते रेल्वेत बसून निघून जातात. कुठे जायचे, काय करायचे हे कोणतेच विचार त्यांच्या मनात नसतात. अशा वेळी असामाजिक तत्त्वांची नजर त्यांच्यावर गेल्यास त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची भीती राहते.अशा साध्या कारणातून जानेवारी ते सप्टेबर या नऊ महिन्याच्या कार्यकाळात ४१४ मुलामुलींनी घर सोडल्याची नोंद रेल्वे सुरक्षा दलाने केली आहे. यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने नऊ महिन्यात ३१४ मुलामुलींना तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने १०० मुलामुलींना सुरक्षा कवच पुरविले. अशी बालके आढळल्याबरोबर त्यांची आरपीएफतर्फे आस्थेने विचारपूस करण्यात येते. विश्वासात घेऊन त्यांना घरून निघून येण्याचे कारण विचारतात. आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा अशा मुलामुलींचे समुपदेशन करतात. घरून निघून आलेली मुले आढळल्यानंतर त्याची सूचना रेल्वे चाईल्ड लाईनला देण्यात येते. कुटुंबीय येईपर्यंत या मुलामुलींना रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविण्यात येते. रेल्वेत प्रवाशांना लहान मुले एकटी दिसल्यास १८२ या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे तसेच कुली, आॅटोचालक, व्हेंडर आदींना अशी मुले आढळल्यास आरपीएफला कळविण्याच्या सूचना देण्यात येतात. लहान मुलांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरुप पोहोचवून आरपीएफने आपल्या कर्तव्यदक्षतेचा परिचय देऊन या बालकांचे आयुष्यही सावरण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

बालकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध‘बालकांच्या सुरक्षेसाठी आरपीएफतर्फे अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात. १८२ हेल्पलाईनवर प्रवाशांनी अशा मुलांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात येते. व्हेंडर, आॅटोचालकही अशी मुले दिसताच त्याबाबत माहिती देतात.’- ज्योती कुमार सतीजा,वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर