शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

नागपुरात जीवघेण्या ‘स्क्रब टायफस’चा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 11:03 IST

‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असून गेल्या २० दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १३ रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देपाच जणांचा मृत्यू मेडिकलमध्ये २० दिवसांत १३ रुग्ण दाखल, ८ गंभीर

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असून गेल्या २० दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १३ रुग्ण आढळून आले आहेत. यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, उर्वरित आठ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.‘चिगर माईट्स’ नावाच्या अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे हा आजार होतो. या जीवाणूचा आकार ०.२ ते ०.४ मिलीमीटर एवढा असतो. जिथे झाडेझुडपे आणि गवत वाढलेले असते, अशा ठिकाणी हे ‘चिगर माईट्स’ असतात. या रोगावर तत्काळ उपचार न घेणाऱ्या ५० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. ‘स्क्रब टायफस’ची पहिली नोंद १८९९ मध्ये जपानमध्ये घेण्यात आली. पहिल्या महायुद्धाच्या वेळी रशियामध्ये ३० लाख लोक या रोगामुळे दगावले होते. दुसºया महायुद्धाच्या वेळी हा आजार बर्मा आणि सिलोनच्या सैनिकांनासुद्धा झाल्याची नोंद आहे. स्क्रब टायफस हा मुख्यत: दक्षिण पश्चिम आशिया आणि दक्षिण अमेरिकी या देशात होतो. आपल्या देशात तामिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम आणि विदर्भात या रोगाचे रुग्ण सापडतात. पावसाळा सुरू झाला की या रोगाचे आगमन होते. काही ठिकाणी हिवाळ्यातसुद्धा याचा त्रास होतो. हा रोग अंदाजे १० लाख लोकांना होता, वेळेत औषधोपचार मिळाला नाही तरमृत्यू ओढावतो. नागपूरच्या मेडिकलमध्ये आॅगस्ट महिन्याच्या आतापर्यंत १३ रुग्ण आढळून आले असून यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित आठही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. चार रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यातील दोन रुग्णांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

३ ते २२ आॅगस्टदरम्यान ‘स्क्रब टायफस’ रुग्णांची संख्या वाढली. आतापर्यंत १३ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून यातील ५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित आठ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. मेडिकलमध्ये येणारे रुग्ण हे गंभीर होऊन येत आहे.-डॉ. वाय.व्ही. बन्सोडविभाग प्रमुख,औषधवैद्यकशास्त्र विभाग४० टक्के लोकांमध्ये लक्षणेच दिसून येत नाहीया आजारामध्ये डोकेदुखी, मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे आणि काही रुग्णांमध्ये किडा चावल्याच्या ठिकाणी व्रण दिसतो. ज्याला ‘इशर’ म्हणतात. हा ‘इशर’ या आजाराची ओळख आहे. परंतु ४०टक्के लोकांमध्ये याची लक्षणे दिसून येत नाही. रक्ताची चाचणी केल्यानंतरच रोगाचे निदान होते.

काही रुग्णांना किडनी, तर काहींना फुफ्फुसाचा त्रासआसाममधील एका संशोधनामुळे ५०० हून जास्त मेंदूज्वराच्या रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण स्क्रब टायफसचे होते. काही रुग्णांमध्ये किडनीचा त्रास होतो, तर ५०टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाचा त्रास आणि न्यूमोनिया होतो. काही रुग्णांना कावीळ होतो, तर काहींना श्वासाचा त्राससुद्धा होतो.

हे करा

  • दाट झाडाझुडपात जाऊ नका.
  • पूर्ण अंग झाकेल असे कपडे घाला.
  • घरात आणि बाहेर स्वच्छता पाळा.
  • डोकेदुखी, मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे, ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • काही रुग्णांमध्ये कीडा चावल्यास चावल्याच्या ठिकाणी व्रण दिसतो.

स्क्रब टायफसवर प्रतिबंधक लस नाहीया आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. पण साथीच्या वेळी डॉक्टरकडे जाणे आणि वेळेत औषधोपचार, अ‍ॅन्टीबायोटिक्स घेतल्याने या रोगापासून बचाव होतो. लोकांचे जनजागरण, उंदरावर नियंत्रण आणि लवकर निदान झाले तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ शकतो. 

टॅग्स :Healthआरोग्य