शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
3
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
4
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
5
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
6
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
7
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
8
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
9
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
10
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
11
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण
12
Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
13
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा छगन भुजबळांनी हट्ट सोडला; म्हणाले, 'पद हवेच असे नाही' 
14
शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश
15
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
16
कोणी बोलल्यावर आपण हसलो तर आरोपी होतो का?
17
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
18
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
19
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
20
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...

नागपुरात शाळा झाल्या सुरू, विद्यार्थ्यांना मात्र सुटी, शिक्षकांची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 21:37 IST

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात शासनाकडून अजूनही संभ्रम दूर झाला नसला तरी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार आज शाळेत शिक्षक पोहचले. शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील गावागावात शाळा सुरू झाली.

ठळक मुद्देशाळा व्यवस्थापन समितीच्या झाल्या बैठकी : १२३५ शाळांचा बैठकीचा अहवाल पोहचला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांविना शाळा सुरू झाल्या. शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात शासनाकडून अजूनही संभ्रम दूर झाला नसला तरी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात शिक्षकांना पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश होते. त्यानुसार आज शाळेत शिक्षक पोहचले. शिक्षण विभागाने दिलेल्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील गावागावात शाळा सुरू झाली.

कोरोना साथरोग उपाययोजनांतर्गत राज्यातील सर्व शाळांना १६ मार्च पासून सुट्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे पुढे या सर्व शाळा सत्र संपतपर्यंत बंदच होत्या. नवीन शैक्षणिक सत्रात शाळा कधी व कशा सुरू करायच्या याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून १५ जून रोजी एक परिपत्रक निर्गमित करून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ९, १० आणि बारावीचे वर्ग १ जुलैपासून, ६ ते ८ चे वर्ग १ आॅगस्ट, तिसरी ते पाचवीचे वर्ग १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात यावे. तर वर्ग १ व २ शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्यानुसार सुरू करण्यात यावे. कन्टेन्मेंट एरियामधील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे सुचविले होते. पण शिक्षकांनी उपस्थित रहावे किंवा नाही, याबाबत स्पष्ट केले नव्हते. मात्र स्थानिक प्रशासनाने पहिल्या दिवशी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीसुद्धा घेण्यास सांगितले होते. शिक्षकांनी शाळेत जातांना आरोग्याची तपासणी सुद्धा करवून घ्यायची होती. काही शाळेत याचे पालन झाले तर काही शाळेत याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र जिल्ह्यातील कन्टेन्मेंट एरिया सोडून सर्वच शाळा सुरू झाल्या. शिक्षण विभागाकडे शाळेच्या पहिल्या दिवशीचा १२३५ शाळांनी अहवाल पाठविला. दरम्यान कमी पटसंख्येच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना बोलावून पहिल्याच दिवशी शालेय साहित्याचे वाटप केले.आरोग्य तपासणी न करताच शिक्षक शाळेतबाहेरगावाहून येणाºया शिक्षकांनी वैद्यकीय तपासणीची प्रमाणपत्र घेऊन जावे, असे आदेश होते. त्यासाठी काही शिक्षकांनी सकाळपासून आरोग्य केंद्रामध्ये गर्दी केली होती. काही शिक्षक शाळेत पोहचल्यानंतर, आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेले. बहुतांश शिक्षक आरोग्य तपासणी न करताच शाळेत पोहचले.वेलतूर ग्रा.पं.ने दिला इशाराकुही पं.स. अंतर्गत येणाऱ्या वेलतूर ग्रा.पं.ने जि.प. उच्च प्रा. शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र पाठवून शिक्षकांना मुख्यालयीच राहण्याची स्पष्ट ताकीद दिली. अन्यथा मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाई करून गावात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले. पचखेडी ग्रा.पं.ने शिक्षकांना १४ दिवस विलगीकरण केंद्रात ठेवून, त्यांना मुख्यालयी राहण्यासाठी रुम शोधून देणार असा निर्णय घेतला.मुंबई, ठाण्यातील शिक्षकांना दिलासा आम्हाला का नाही?शालेय शिक्षण विभागाने २४ जून रोजी परिपत्रक काढून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर येथील शाळेच्या शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सवलत दिली. महिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार व ५५ वर्षावरील शिक्षकांना शाळेत न बोलाविण्याच्या सूचना केल्या. असा दिलासा इतर जिल्ह्यातील शिक्षकांनाही द्यावा, अशीही मागणी शिक्षकांनी केली.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर