शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात पाण्याची भीषणता आणखी तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:38 IST

संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देधरणांमध्ये केवळ सहा टक्के पाणी साठा : पाच वर्षातील सर्वात भयावह स्थितीतोतलाडोह, नांद वणा, दिना, पोथरा, गोसीखुर्द, बावनथडी प्रकल्प रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गोसीखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा आणि बावनथडी यासारखे मोठे प्रकल्प तर रिकामे आहेत. या धरणात केवळ ० टक्के इतका साठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे, हे विशेष.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला ( १६ मे रोजी) केवळ २२२ दलघमी(६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३६ दलघमी (२६ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये ९ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १५ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १८ टक्के, सिरपूर २० टक्के, पुजारी टोला १० टक्के, कालीसरार ४९ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ६ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३० टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १३ टक्के, धाममध्ये ६ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ५ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा २ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.पाच वर्षातील स्थितीवर्ष       (१६ मे रोजी) नोंदवलेला पाणीसाठा२०१९- २२२ दलघमी२०१८ - ८०६ दलघमी२०१७ - ४०१ दलघमी२०१६ - ७८५ दलघमी२०१५- ८४३ दलघमी२०१४ - १५४६ दलघमीमध्यम व लघु प्रकल्पातील साठाही होतोय कमीनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७८ दलघमी इतकी आहे. त्यात १६ मे रोजीपर्यंत केवळ ७२ दलघमी म्हणजेच १३ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ४८ दलघमी म्हणजेच १० टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.

 

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई