शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नागपूर विभागात पाण्याची भीषणता आणखी तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:38 IST

संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देधरणांमध्ये केवळ सहा टक्के पाणी साठा : पाच वर्षातील सर्वात भयावह स्थितीतोतलाडोह, नांद वणा, दिना, पोथरा, गोसीखुर्द, बावनथडी प्रकल्प रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गोसीखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा आणि बावनथडी यासारखे मोठे प्रकल्प तर रिकामे आहेत. या धरणात केवळ ० टक्के इतका साठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे, हे विशेष.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला ( १६ मे रोजी) केवळ २२२ दलघमी(६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३६ दलघमी (२६ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये ९ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १५ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १८ टक्के, सिरपूर २० टक्के, पुजारी टोला १० टक्के, कालीसरार ४९ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ६ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३० टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १३ टक्के, धाममध्ये ६ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ५ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा २ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.पाच वर्षातील स्थितीवर्ष       (१६ मे रोजी) नोंदवलेला पाणीसाठा२०१९- २२२ दलघमी२०१८ - ८०६ दलघमी२०१७ - ४०१ दलघमी२०१६ - ७८५ दलघमी२०१५- ८४३ दलघमी२०१४ - १५४६ दलघमीमध्यम व लघु प्रकल्पातील साठाही होतोय कमीनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७८ दलघमी इतकी आहे. त्यात १६ मे रोजीपर्यंत केवळ ७२ दलघमी म्हणजेच १३ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ४८ दलघमी म्हणजेच १० टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.

 

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई