शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

नागपूर विभागात पाण्याची भीषणता आणखी तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:38 IST

संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देधरणांमध्ये केवळ सहा टक्के पाणी साठा : पाच वर्षातील सर्वात भयावह स्थितीतोतलाडोह, नांद वणा, दिना, पोथरा, गोसीखुर्द, बावनथडी प्रकल्प रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राज्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेत प्रशासनाला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश बजावले आहेत. पाण्याच्या बाबततीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये केवळ सहा टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गोसीखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा आणि बावनथडी यासारखे मोठे प्रकल्प तर रिकामे आहेत. या धरणात केवळ ० टक्के इतका साठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे, हे विशेष.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला ( १६ मे रोजी) केवळ २२२ दलघमी(६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३६ दलघमी (२६ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये ९ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १५ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १८ टक्के, सिरपूर २० टक्के, पुजारी टोला १० टक्के, कालीसरार ४९ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ६ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३० टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १३ टक्के, धाममध्ये ६ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ५ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा २ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.पाच वर्षातील स्थितीवर्ष       (१६ मे रोजी) नोंदवलेला पाणीसाठा२०१९- २२२ दलघमी२०१८ - ८०६ दलघमी२०१७ - ४०१ दलघमी२०१६ - ७८५ दलघमी२०१५- ८४३ दलघमी२०१४ - १५४६ दलघमीमध्यम व लघु प्रकल्पातील साठाही होतोय कमीनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७८ दलघमी इतकी आहे. त्यात १६ मे रोजीपर्यंत केवळ ७२ दलघमी म्हणजेच १३ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ४८ दलघमी म्हणजेच १० टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.

 

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई