शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबार्इंचे कार्य नवीन पिढीसाठी प्रेरणादायी

By admin | Updated: January 4, 2017 02:25 IST

ज्योतिरावांच्या कार्यात सावित्रीबार्इंना केवळ एक शिक्षिका म्हणून गृहीत धरले जाते. मात्र त्या साध्या शिक्षिका नव्हत्या तर शिक्षणतज्ज्ञ होत्या.

हरी नरके : धनवटे कॉलेजमध्ये जयंती सोहळा
नागपूर : ज्योतिरावांच्या कार्यात सावित्रीबार्इंना केवळ एक शिक्षिका म्हणून गृहीत धरले जाते. मात्र त्या साध्या शिक्षिका नव्हत्या तर शिक्षणतज्ज्ञ होत्या. या दाम्पत्याने स्वत:च्या कृतीतून मांडलेले शैक्षणिक कार्य आजही सरकारला धोरणात राबवावे लागते. हे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्योतिराव फुले अध्यासन मंडळाचे संचालक व ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरि नरके यांनी व्यक्त केले.
बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळ, धनवटे नॅशनल कॉलेज व राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. हरि नरके यांनी आपले विचार व्यक्त केले. सावित्रीआईने ज्योतिरावांच्या खांद्याला खांदा लावून, कधी नेतृत्व करून तर कधी त्यांची अनुयायी म्हणून जातीपातींच्य पलिक डे शैक्षणिक व सामाजिक कार्य केले. एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असेच आहे. देशात ज्ञान आणि कौशल्याची संकल्पना सावित्रीबार्इंनी सर्वात आधी मांडली. उद्योग शिक्षण शाळेशी जोडण्यासाठी त्या आग्रही होत्या. यासोबतच शेतीच्या शिक्षणासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. सर्व जाती, धर्मांच्या मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्याचे त्यांचे धोरण होते. सावित्री व ज्योतिरावांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेत शिक्षणात, सत्तेत, प्रशासनात व निर्णयप्रक्रियेत महिलांना प्राधान्य देण्याचे धोरण सर्वात आधी राबविले. या गोष्टी डॉ. आंबेडकरांनी संविधानात अंतर्भूतही केल्या. महिलांच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून आहे या त्यांच्याच स्त्रीकेंद्री धोरणाचा २०१२ साली युनोने स्वीकार केला आहे.
फुले दाम्पत्याने त्या काळात विद्यार्थ्यांच्या गळतीची कारणे शोधली, त्यावर उपाय सुचविले आणि गरीब मुलांना शिक्षण देताना ते राबविलेही आहेत. गरिबी, जातीपातीची उतरंड, अभ्यासक्रम अशा प्रत्येक गोष्टीचा विचार त्यांनी केला आणि तसे धोरण राबविले. बालविवाह, सतीप्रथा या अमानवीय परंपराविरोधात लढा उभारला. केशवापन विरोधात न्हाव्यांचा संप केला. परिवर्तनाच्या चळवळीत त्यांनी स्त्री-पुरुष समानता, ज्ञान आणि कौशल्याची निर्मिती व त्यांचा समन्वय, जातीनिर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह, संसाधनांचे फेरवाटप, संवाद चिकित्सा व विद्रोह ही पंचसुत्री दिली आहे. हे कार्य दस्तावेजाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. प्लेगची साथ आली तेव्हा लोकांची सेवा करतानाच या माऊलीचे निधन झाले. सावित्रीबाईच्या सामाजिक कार्याला जगात तोड नाही, अशी भावना प्रा. नरके यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कार्यक्रमात खासदार अजय संचेती, धनवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, माजी खासदार खुशाल बोपचे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, बुलडाणा मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद खरसने, सचिव वामन शास्त्री, सुषमा भड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्य करणाऱ्या संध्याताई सराटकर यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबत नवनियुक्त आमदार परिणय फुके व डॉ. बबनराव तायवाडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. कोमल ठाकरे यांनी केले. (प्रतिनिधी)