शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शिक्षा अभियान अंधारात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:15 IST

देवलापार : देशात २००३ पासून सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. सुरुवातीची काही वर्षे वगळता गेल्या अनेक वर्षांपासून हे ...

देवलापार : देशात २००३ पासून सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले. सुरुवातीची काही वर्षे वगळता गेल्या अनेक वर्षांपासून हे अभियान फेल ठरत आहे. अभियानाच्या रामटेक येथील गटसाधन केंद्राच्या कार्यालयातील दूरध्वनी अनेक वर्षापासून बंद आहे. यासोबतच थकबाकीअभावी येथील विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या मार्गावर आहे.

वर्ग १ ते ८ वी करिता केंद्र शासनाने सर्व शिक्षा अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्याकरिता विविध योजना राबविण्यात आल्या व येत आहेत. परंतु याकरिता स्थापित कार्यालयाची मात्र दुरवस्था झाली आहे. या अभियानासाठी तालुक्याच्या ठिकाणी गटसाधन केंद्र तर जिल्हा स्तरावर समग्र शिक्षा जिल्हा कार्यालय स्थापित करण्यात आले.

पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी तर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीत या कार्यालयाचे काम चालते. राज्यात ४०० हून गटसाधन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. परंतु सादिल अनुदानाअभावी अनेक गटसाधन केंद्रांचे काम ठप्प पडले आहे. निधीअभावी या केंद्रातील दूरध्वनी बंद झाले. यासोबतच ऑनलाईन कामाकरिता इंटरनेट सुविधा नसल्याने कार्यालयातील संगणक धूळखात पडले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना लॅपटॉपवर काम करण्यासाठी नेटचा खर्च स्वत: करावा लागतो. थकबाकी वाढल्याने येथील विद्युत पुरवठा खंडित करण्याकरिता महावितरणने ताकीद दिली आहे. याशिवाय येथे स्टेशनरी घेण्याकरिताही सादील नसल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

रामटेकच्या गटसाधन केंद्रात कनिष्ठ अभियंता, लेखा लिपिक, एम.आय.एस. को-ऑर्डिनेटर, डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रत्येकी एक पद तर विषय साधन व्यक्ती सहा पदे, विशेषज्ञ (दिव्यांग साधन व्यक्ती) दोन पदे, विशेष संसाधन शिक्षक पाच पदे अशी एकूण १७ पदे मंजूर व कार्यरत आहेत. सदर याजनेचे कामकाज राज्यस्तरावर प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईच्या अंतर्गत चालते. सदर कर्मचारी हे गटसाधन केंद्राशिवाय पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचेही काम सांभाळतात. तरीही त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. शिवाय त्यांना काही साहित्य व इंटरनेट सुविधेकरिता स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागतो ही शोकांतिका आहे. संपूर्ण राज्य वगळता केवळ नागपूर जिल्ह्यात गटसाधन केंद्रात व समग्र शिक्षा जिल्हा कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ऐवजी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा वापर केला जात होता. याकडे ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर नागपूर जिल्ह्यातही कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात सध्या सहा हजारांपेक्षा जास्त कंत्राटी काम करीत असले तरी अभियानाचा कारभार सांभाळणाऱ्या प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.