शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 22:08 IST

Nagpur News यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देकिडींचा प्रादुर्भाव वाढणारहरभरा उत्पादनाला फटका

नागपूर: गुलाबी थंडीत दोन दिवसाच्या अंतराने तीन दिवस अवकाळी पाऊस बरसला. शिवाय मागील आठवडा ढगाळ वातावरण आणि धुक्याचाच राहिला. वातावरणाच्या बदलाचा विपरित परिणाम जवळपास सर्वच पिकांवर झाला असून, यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उमरेड तालुक्यात हरभरा पिकाच्या पेरणीचे क्षेत्र १५,२२२ हेक्टर आहे. गहू ३,२१४ हेक्टर, भाजीपाला ३७३ हेक्टर, सोयाबीन १५० हेक्टर तर फुलपिके ३४ हेक्टर या आणि इतर पिकांसह एकूण १९,३०८ हेक्टरमध्ये रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. तालुक्यात साधारणत: १० नोव्हेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांची हरभरा पेरणी आटोपली. त्या शेतात आता हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेपर्यंत पाेहोचले आहेत.

१५ नोव्हेंबरनंतर पेरणी करणाऱ्या काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा फुलोरा आणि घाटे पकडण्याच्या अवस्थेत आहेत. उमरेड तालुक्यात १०, १२ आणि १४ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोबतच सततच्या धुक्यामुळे आणि खराब हवामानामुळे हरभरा पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळी ६.३०च्या सुमारास विजांच्या कडकटाडासह पावसाला सुरुवात झाली. दोन ते अडीच तास पावसाचा जोर कायम होता. यामुळे शेतातून पाण्याचे लोट गेले. काही ठिकाणी पाणी साचले. अनेकांच्या शेतामधील गहू, भाजीपाला पिकांनाही खराब वातावरणाचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळी सोयाबीन उत्पादकांसाठी अवकाळी पाऊस मदतीला धावून आला आहे.

किडींचा अटॅक

वारंवार होणाऱ्या सततच्या अवकाळी पावसामुळे फुलोऱ्यावर असलेला हरभरा करपण्याचीही अधिकांश संभावना व्यक्त होत आहे. घाटे अवस्थेत असलेल्या पिकांनाही फटका सोसावा लागेल. शिवाय येत्या काही दिवसात अळी अधिक जोर मारेल. मर रोगाचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

हिवाळा की पावसाळा?

उमरेड तालुक्यात १० जानेवारी रोजी ७.५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन दिवसानंतर १४ जानेवारीला ४.११ तर पुन्हा दोन दिवसानंतर शुक्रवारी पाऊस दोन-अडीच तास पाऊस झाला. यामुळे सध्या हिवाळा सुरू आहे की, पावसाळा संपायचा आहे, असाही अनुभव सर्वांनाच येत आहे. तालुक्यात आतापर्यंत ९४१.४६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेती