शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 22:08 IST

Nagpur News यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देकिडींचा प्रादुर्भाव वाढणारहरभरा उत्पादनाला फटका

नागपूर: गुलाबी थंडीत दोन दिवसाच्या अंतराने तीन दिवस अवकाळी पाऊस बरसला. शिवाय मागील आठवडा ढगाळ वातावरण आणि धुक्याचाच राहिला. वातावरणाच्या बदलाचा विपरित परिणाम जवळपास सर्वच पिकांवर झाला असून, यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उमरेड तालुक्यात हरभरा पिकाच्या पेरणीचे क्षेत्र १५,२२२ हेक्टर आहे. गहू ३,२१४ हेक्टर, भाजीपाला ३७३ हेक्टर, सोयाबीन १५० हेक्टर तर फुलपिके ३४ हेक्टर या आणि इतर पिकांसह एकूण १९,३०८ हेक्टरमध्ये रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. तालुक्यात साधारणत: १० नोव्हेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांची हरभरा पेरणी आटोपली. त्या शेतात आता हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेपर्यंत पाेहोचले आहेत.

१५ नोव्हेंबरनंतर पेरणी करणाऱ्या काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा फुलोरा आणि घाटे पकडण्याच्या अवस्थेत आहेत. उमरेड तालुक्यात १०, १२ आणि १४ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोबतच सततच्या धुक्यामुळे आणि खराब हवामानामुळे हरभरा पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळी ६.३०च्या सुमारास विजांच्या कडकटाडासह पावसाला सुरुवात झाली. दोन ते अडीच तास पावसाचा जोर कायम होता. यामुळे शेतातून पाण्याचे लोट गेले. काही ठिकाणी पाणी साचले. अनेकांच्या शेतामधील गहू, भाजीपाला पिकांनाही खराब वातावरणाचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळी सोयाबीन उत्पादकांसाठी अवकाळी पाऊस मदतीला धावून आला आहे.

किडींचा अटॅक

वारंवार होणाऱ्या सततच्या अवकाळी पावसामुळे फुलोऱ्यावर असलेला हरभरा करपण्याचीही अधिकांश संभावना व्यक्त होत आहे. घाटे अवस्थेत असलेल्या पिकांनाही फटका सोसावा लागेल. शिवाय येत्या काही दिवसात अळी अधिक जोर मारेल. मर रोगाचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

हिवाळा की पावसाळा?

उमरेड तालुक्यात १० जानेवारी रोजी ७.५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन दिवसानंतर १४ जानेवारीला ४.११ तर पुन्हा दोन दिवसानंतर शुक्रवारी पाऊस दोन-अडीच तास पाऊस झाला. यामुळे सध्या हिवाळा सुरू आहे की, पावसाळा संपायचा आहे, असाही अनुभव सर्वांनाच येत आहे. तालुक्यात आतापर्यंत ९४१.४६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेती