शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे नागपूर जिल्ह्यातील रब्बीवर ‘संक्रांत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 22:08 IST

Nagpur News यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देकिडींचा प्रादुर्भाव वाढणारहरभरा उत्पादनाला फटका

नागपूर: गुलाबी थंडीत दोन दिवसाच्या अंतराने तीन दिवस अवकाळी पाऊस बरसला. शिवाय मागील आठवडा ढगाळ वातावरण आणि धुक्याचाच राहिला. वातावरणाच्या बदलाचा विपरित परिणाम जवळपास सर्वच पिकांवर झाला असून, यंदाच्या रब्बी हंगामावर ‘संक्रांत’ आल्याने सर्वत्र चिंतेचा सूर उमटत आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उमरेड तालुक्यात हरभरा पिकाच्या पेरणीचे क्षेत्र १५,२२२ हेक्टर आहे. गहू ३,२१४ हेक्टर, भाजीपाला ३७३ हेक्टर, सोयाबीन १५० हेक्टर तर फुलपिके ३४ हेक्टर या आणि इतर पिकांसह एकूण १९,३०८ हेक्टरमध्ये रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. तालुक्यात साधारणत: १० नोव्हेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांची हरभरा पेरणी आटोपली. त्या शेतात आता हरभरा घाटे भरण्याच्या अवस्थेपर्यंत पाेहोचले आहेत.

१५ नोव्हेंबरनंतर पेरणी करणाऱ्या काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा फुलोरा आणि घाटे पकडण्याच्या अवस्थेत आहेत. उमरेड तालुक्यात १०, १२ आणि १४ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सोबतच सततच्या धुक्यामुळे आणि खराब हवामानामुळे हरभरा पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सकाळी ६.३०च्या सुमारास विजांच्या कडकटाडासह पावसाला सुरुवात झाली. दोन ते अडीच तास पावसाचा जोर कायम होता. यामुळे शेतातून पाण्याचे लोट गेले. काही ठिकाणी पाणी साचले. अनेकांच्या शेतामधील गहू, भाजीपाला पिकांनाही खराब वातावरणाचा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळी सोयाबीन उत्पादकांसाठी अवकाळी पाऊस मदतीला धावून आला आहे.

किडींचा अटॅक

वारंवार होणाऱ्या सततच्या अवकाळी पावसामुळे फुलोऱ्यावर असलेला हरभरा करपण्याचीही अधिकांश संभावना व्यक्त होत आहे. घाटे अवस्थेत असलेल्या पिकांनाही फटका सोसावा लागेल. शिवाय येत्या काही दिवसात अळी अधिक जोर मारेल. मर रोगाचा प्रादुर्भावसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

हिवाळा की पावसाळा?

उमरेड तालुक्यात १० जानेवारी रोजी ७.५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन दिवसानंतर १४ जानेवारीला ४.११ तर पुन्हा दोन दिवसानंतर शुक्रवारी पाऊस दोन-अडीच तास पाऊस झाला. यामुळे सध्या हिवाळा सुरू आहे की, पावसाळा संपायचा आहे, असाही अनुभव सर्वांनाच येत आहे. तालुक्यात आतापर्यंत ९४१.४६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेती