शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टपर्यंत सुरू होईल नागपुरातील चिचभवनचा आरओबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 22:04 IST

वर्धा रोडवरील चिचभवन येथील रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी)वरून ऑगस्ट महिन्यात वाहतूक सुरू होणार आहे. येथील रेल्वे ट्रॅकच्या वरच्या भागावर स्टील गर्डर स्थापन करण्याचे काम मंगळवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकवर गर्डर स्थापन करण्याचे काम अतिशय गुंतागुंतीचे होते, त्यामुळे पुलाच्या निर्माणाला वेळ लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरील चिचभवन येथील रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी)वरून ऑगस्ट महिन्यात वाहतूक सुरू होणार आहे. येथील रेल्वे ट्रॅकच्या वरच्या भागावर स्टील गर्डर स्थापन करण्याचे काम मंगळवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकवर गर्डर स्थापन करण्याचे काम अतिशय गुंतागुंतीचे होते, त्यामुळे पुलाच्या निर्माणाला वेळ लागला.रेल्वे ट्रॅकच्या वरच्या भागात गर्डर स्थापित करण्यासाठी ५५ मीटर लांब स्टील गर्डरचे दोन तुकडे कापून जोडावे लागले. ट्रॅकच्या अगदी वरच्या भागात ३३ मीटरचा तुकडा व दुसरा २२ मीटरचा तुकडा आहे. हे गर्डर दोन पिल्लरवर स्थापन करण्यात आले आहे. दोन पिल्लरच्या मधात रेल्वे ट्रॅक असल्याने गर्डरला एकाच क्रेनने उचलणे शक्य होत नव्हते. त्यामुळे एक अन्य क्रेन मुंबईवरून बोलवावी लागली. या डिझाईनसाठी रेल्वेकडून दुसऱ्यांदा मंजुरी घ्यावी लागली होती. आरओबीच्या एका भागाचे काम झाले आहे. तर चिचभवनकडील भागात काम सुरू आहे. याचसोबत सर्व्हिस रोड व नालीचे काम करायचे आहे.सूत्रांकडून सांगण्यात आले की उर्विरत पिल्लरवर दोन आठवड्यात पिल्लर उभे करून काँक्रीट गर्डर लावण्याचे काम पूर्ण केले जाईल. स्टील गर्डरवाल्या भागात काँक्रीट रोड राहील. चिचभवनजवळ अ‍ॅप्रोच रोडसाठी खड्डे खोदण्यात आले आहे. ठेका कंपनीसाठी हे आव्हानात्मक काम आहे. आता पावसाळा लागत असल्याने कामाला गती आली आहे.प्रोजेक्टच्या महत्त्वपूर्ण बाबी१) १.१२ किमी लांब व १३.७ मीटर रुंद आरओबीचे काम २०१७ मध्ये डीपी जैन कंपनीने सुरू केले होते.२) ५० कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला होता.३) पुलाचे बांधकाम २५ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करायचे होते.४) या प्रोजेक्टसाठी सुरुवातीला तीन प्रकारचे डिझाईन मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.५) लॉकडाऊनपूर्वी रेल्वेकडून ब्लॉक मागण्यात आला होता. लॉकडाऊनमध्ये कामासाठी चांगली संधी मिळाली.६) विमान उड्डाण बंद असल्याने एएआयकडून ब्लॉक मिळविण्यासाठी कुठलीही अडचण आली नाही.ऑगस्टपर्यंत वाट बघाचिचभवन आरओबीचे निर्माण कार्य ऑगस्टमध्ये पूर्ण होईल. त्याच महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल. यासाठी पूर्व रेल्वेकडून काही ब्लॉक घ्यावे लागणार आहे. यासाठी एनएचएआय व रेल्वे समन्वयातून काम करीत आहे.अभिजित जिचकार, प्रोजेक्ट डायरेक्टर, एनएचएआय

टॅग्स :nagpurनागपूर