शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात रस्ते अपघाताला आळा : गतवर्षीच्या तुलनेत अपघात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 22:08 IST

रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.

ठळक मुद्देवाहतूक व्यवस्थेतील सुधारणांचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांचे चांगले परिणाम समोर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाताची संख्या कमी झाल्याने मृत्यूसंख्या कमी करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.बेशिस्त वाहतूक व्यवस्थेमुळे गेल्या वर्षी अपघाताची संख्या वाढली होती. वारंवार अपघात घडत होते. ८ सप्टेंबर २०१८ पर्यंत उपराजधानीत १७८ जीवघेणे अपघात घडले होते. एकूण अपघाताची संख्या ६०९ होती. यावर्षी सप्टेंबर महिन्यांपर्यंत ५६१ अपघात झाले आणि मृत्यूसंख्या १६२ आहे.शहरातील काही मार्गांवर वारंवार अपघात घडतात. अशी एकूण ८३ ठिकाणे अधोरेखित करून वाहतूक पोलिसांनी त्यातील ४० ठिकाणांना ब्लॅक स्पॉट तर ४३ ठिकाणांना हॉट स्पॉट ठरवले. या सर्व ठिकाणी पुन्हा अपघात घडणार नाही, यासाठी ज्या उपाययोजना करायच्या होत्या, त्या केल्या.काय आहे हॉट आणि ब्लॅक स्पॉटज्या ठिकाणी गंभीर अपघात घडतात त्या ठिकाणांना हॉट आणि ज्या ठिकाणी जीवघेणे अपघात घडले त्याला ब्लॅक स्पॉट ठरवत वाहतूक शाखेने रस्ता सुरक्षा दलाच्या मदतीने वाहनचालकांना रस्त्यारस्त्यावर वाहतुकीचे धडे दिले. त्याचाच परिणाम म्हणून १६२ अपघात कमी झाले.आयुक्तांच्या संकल्पाला प्रयत्नांची जोडनागपूरला अपघातमुक्त शहर बनविण्याचा पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी संकल्प केला होता. अपघात रोखण्यासाठी जनजागरण, रॅली तसेच शाळा-महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी वाहतूक शाखेची धुरा हातात घेतल्यानंतर बेशिस्त वाहतुकीला वळणावर आणण्याचे प्रयत्न चालविले. त्याचाही चांगला परिणाम उपरोक्त आकडेवारीतून दिसून येत आहे.

टॅग्स :Accidentअपघातtraffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर