शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

१५ जुलैनंतर लागू शकतो दहावीचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 20:34 IST

Tenth class result कोरोना संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी, विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करून बोर्ड निकाल जाहीर करणार आहे.

ठळक मुद्देदहावी परीक्षेच्या मूल्यमापनाला सुरुवात : ३० जूनपर्यंत मूल्यांकनाची प्रक्रिया करायची पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी, विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करून बोर्ड निकाल जाहीर करणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित केली असून, प्रत्येक शाळांना विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाइन भरावे लागणार आहेत. याशिवाय गुणांची हार्डकॉपी विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविणे अनिवार्य आहे. ही सर्व प्रक्रिया ३ जुलैपर्यंत पूर्ण करायची आहे. त्यानंतर राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे १५ जुलैनंतरच दहावीचा निकाल लागू शकतो, असे संकेत मिळताहेत.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इयत्ता दहावीच्या परीक्षांचे मूल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. ११ ते ३० जून या कालावधीत शाळांची जबाबदारी, विषयनिहाय शिक्षकांचे कर्तव्य, प्रत्यक्ष निकाल, निकाल समिती आणि मुख्याध्यापकांचे कर्तव्य आदी बाबी राज्य शिक्षण मंडळाने निश्चित केल्या आहे. नववी आणि दहावीच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण द्यावे लागणार आहे. निकषनिहाय गुण एकत्रित केल्यानंतर मुख्याध्यापकांना मंडळाने प्रसिद्ध केलेल्या लिंकद्वारे ते ऑनलाइन भरावे लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया ३ जुलैपर्यंत पूर्ण करायची आहे. याशिवाय एकत्रित शाळानिहाय दहावीच्या गुणांची यादी, विद्यार्थ्यांचे नाव, आसन क्रमांकाची हार्ड कॉपी बंद पाकिटात मुख्याध्यापकांना विभागीय बोर्डाकडे पाठवावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने विषयनिहाय गुण आणि निकालाबाबत शिक्षकांसाठी यू-ट्यूबवर मार्गदर्शन केले आहे.

 पुढील जबाबदारी राज्य मंडळाची

शाळांना ३० जूनपर्यंत गुणदानाची प्रक्रिया शाळांना पार पाडायची आहे. ३ जुलैपर्यंत बोर्डाच्या वेबसाइटवर एक्सल शीटमध्ये गुण भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, छपाई करणे आदी प्रक्रिया होणार आहे. साधारणत: १५ जुलैनंतरच दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

नागपूर विभागीय मंडळातील दहावीचे विद्यार्थी

नागपूर - ६०,३८६

भंडारा - १६,५३९

चंद्रपूर - २८,९८९

वर्धा - १६,४२९

गडचिरोली - १४,४२९

गोंदिया - १९,३३५

टॅग्स :ssc examदहावीResult Dayपरिणाम दिवस