शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

राज्यातील पेसा क्षेत्राची पुनर्रचना ३५ वर्षांपासून रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 11:54 IST

Yawatmal News आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासीबहुल गावे पेसा क्षेत्रात समाविष्ट करून तेथे विशेष सोयीसवलती दिल्या जातात; परंतु गेल्या ३५ वर्षांपासून राज्यातील पेसा क्षेत्राची पुनर्रचना रखडलेली आहे.

ठळक मुद्देसहा नवे जिल्हे होऊनही आदिवासी गावे लाभापासून वंचितदोन आयोगाच्या शिफारशी दुर्लक्षित

अविनाश साबापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासीबहुल गावे पेसा क्षेत्रात समाविष्ट करून तेथे विशेष सोयीसवलती दिल्या जातात; परंतु गेल्या ३५ वर्षांपासून राज्यातील पेसा क्षेत्राची पुनर्रचना रखडलेली आहे. दोन समित्यांनी केलेल्या शिफारशीही सरकारने दुर्लक्षित केल्या आहेत. ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यातील पेसा क्षेत्राचा हा आढावा.

अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजातीबाबत राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित तरतुदी आहेत. अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाविषयी राज्यपालांकडून वर्षाकाठी राष्ट्रपतींना अहवाल जात असतो. विधि व न्याय मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी १९५० साली अनुसूचित क्षेत्र घोषित केले. त्याची १९६० साली पुनर्रचना झाली. त्यानंतर पुन्हा २ डिसेंबर १९८५ साली नव्याने अनुसूचित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली. मात्र त्यानंतर ३५ वर्षे लोटून गेली तरी अनुसूचित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आलेली नाही.

प्रत्यक्षात १९८५ नंतर राज्यात सहा नव्या जिल्ह्यांची निर्मिती झाली. मुंबई उपनगर, नंदुरबार, वाशिम, हिंगोली, गोंदिया, पालघर या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे अनेक नवीन तालुक्यांची निर्मिती झाली. काही तालुक्यांच्या सीमारेषेत बदल झाला, तरीही अनुसूचित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या आदिवासीबहुल लोकसंख्या असतानाही अनेक गावे घटनात्मक तरतुदींपासून वंचित आहेत.

 

पेसा क्षेत्र निश्चितीसाठी हे आहेत मापदंड

राज्यात पेसा क्षेत्र निश्चित करण्यासाठी १९६० साली ढेबर कमिशन नेमण्यात आले, तर २००२ साली भुरिया आयोग नेमण्यात आला. या दोन्ही आयोगांनी पेसा क्षेत्र निश्चित करण्यासाठी खालील मापदंडांची शिफारस केली आहे.

- आदिवासी लोकसंख्येचे ५० टक्केपेक्षा जास्त प्राबल्य

- संबंधित भागाचा, क्षेत्राचा एकसंघ आकार

- संबंधित क्षेत्र अविकसित असणे

- आर्थिक दर्जानुसार भागाच्या विकासात तफावत

- परंतु हे मापदंड आजही दुर्लक्षित आहेत

 

राज्यातील सध्याचे पेसा क्षेत्र

१३ जिल्हास्थळाची शहरे, २८ तालुके आणि १२५९ गावे पेसा क्षेत्रात मोडतात. १९८५ मध्ये घोषित केलेले अनुसूचित क्षेत्र १९७१ च्या जनगणनेप्रमाणे होते. परंतु, १९७१ ते १९८१ दरम्यान महाराष्ट्रातील गावे व शहरांमध्ये बदल झाला. १९८१ च्या जनगणनेत काही पाड्यांचे, वाड्यांचे गावात रूपांतर झाले. या गावांचा विचार करून अनुसूचित क्षेत्राची सुधारित यादी ९ मार्च १९९० रोजी करण्यात आली. परंतु, त्यानंतर राज्यात सहा नवे, जिल्हे व काही तालुके निर्माण करण्यात आले. त्यामुळेच अनुसूचित क्षेत्राची पुनर्रचना करण्याची मागणी पुढे आली आहे.

बिगर अनुसूचित क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतीच्या, महसुली गावाच्या कार्यक्षेत्रात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी राहतात, अशी गावे अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट झालेली नाही. जिल्हा, तालुका व गाव या प्रशासकीय एककात विस्तार करून पेसा क्षेत्राची पुनर्रचना करण्यात यावी.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना