शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राज्यातील पेसा क्षेत्राची पुनर्रचना ३५ वर्षांपासून रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 11:54 IST

Yawatmal News आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासीबहुल गावे पेसा क्षेत्रात समाविष्ट करून तेथे विशेष सोयीसवलती दिल्या जातात; परंतु गेल्या ३५ वर्षांपासून राज्यातील पेसा क्षेत्राची पुनर्रचना रखडलेली आहे.

ठळक मुद्देसहा नवे जिल्हे होऊनही आदिवासी गावे लाभापासून वंचितदोन आयोगाच्या शिफारशी दुर्लक्षित

अविनाश साबापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासीबहुल गावे पेसा क्षेत्रात समाविष्ट करून तेथे विशेष सोयीसवलती दिल्या जातात; परंतु गेल्या ३५ वर्षांपासून राज्यातील पेसा क्षेत्राची पुनर्रचना रखडलेली आहे. दोन समित्यांनी केलेल्या शिफारशीही सरकारने दुर्लक्षित केल्या आहेत. ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यातील पेसा क्षेत्राचा हा आढावा.

अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जनजातीबाबत राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित तरतुदी आहेत. अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाविषयी राज्यपालांकडून वर्षाकाठी राष्ट्रपतींना अहवाल जात असतो. विधि व न्याय मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी १९५० साली अनुसूचित क्षेत्र घोषित केले. त्याची १९६० साली पुनर्रचना झाली. त्यानंतर पुन्हा २ डिसेंबर १९८५ साली नव्याने अनुसूचित क्षेत्रांची घोषणा करण्यात आली. मात्र त्यानंतर ३५ वर्षे लोटून गेली तरी अनुसूचित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आलेली नाही.

प्रत्यक्षात १९८५ नंतर राज्यात सहा नव्या जिल्ह्यांची निर्मिती झाली. मुंबई उपनगर, नंदुरबार, वाशिम, हिंगोली, गोंदिया, पालघर या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे अनेक नवीन तालुक्यांची निर्मिती झाली. काही तालुक्यांच्या सीमारेषेत बदल झाला, तरीही अनुसूचित क्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या आदिवासीबहुल लोकसंख्या असतानाही अनेक गावे घटनात्मक तरतुदींपासून वंचित आहेत.

 

पेसा क्षेत्र निश्चितीसाठी हे आहेत मापदंड

राज्यात पेसा क्षेत्र निश्चित करण्यासाठी १९६० साली ढेबर कमिशन नेमण्यात आले, तर २००२ साली भुरिया आयोग नेमण्यात आला. या दोन्ही आयोगांनी पेसा क्षेत्र निश्चित करण्यासाठी खालील मापदंडांची शिफारस केली आहे.

- आदिवासी लोकसंख्येचे ५० टक्केपेक्षा जास्त प्राबल्य

- संबंधित भागाचा, क्षेत्राचा एकसंघ आकार

- संबंधित क्षेत्र अविकसित असणे

- आर्थिक दर्जानुसार भागाच्या विकासात तफावत

- परंतु हे मापदंड आजही दुर्लक्षित आहेत

 

राज्यातील सध्याचे पेसा क्षेत्र

१३ जिल्हास्थळाची शहरे, २८ तालुके आणि १२५९ गावे पेसा क्षेत्रात मोडतात. १९८५ मध्ये घोषित केलेले अनुसूचित क्षेत्र १९७१ च्या जनगणनेप्रमाणे होते. परंतु, १९७१ ते १९८१ दरम्यान महाराष्ट्रातील गावे व शहरांमध्ये बदल झाला. १९८१ च्या जनगणनेत काही पाड्यांचे, वाड्यांचे गावात रूपांतर झाले. या गावांचा विचार करून अनुसूचित क्षेत्राची सुधारित यादी ९ मार्च १९९० रोजी करण्यात आली. परंतु, त्यानंतर राज्यात सहा नवे, जिल्हे व काही तालुके निर्माण करण्यात आले. त्यामुळेच अनुसूचित क्षेत्राची पुनर्रचना करण्याची मागणी पुढे आली आहे.

बिगर अनुसूचित क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायतीच्या, महसुली गावाच्या कार्यक्षेत्रात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी राहतात, अशी गावे अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट झालेली नाही. जिल्हा, तालुका व गाव या प्रशासकीय एककात विस्तार करून पेसा क्षेत्राची पुनर्रचना करण्यात यावी.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना