शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

बौद्ध उद्योजकांना चालना देण्याचा संकल्प : ६५०० उद्योजकांना जोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:57 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जेमतेम ६२ वर्षे लोटली आहेत. महामानवाच्या प्रेरणेतून या पाच दशकात या समाजाने शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. आता उद्योग क्षेत्रातही हा समाज पुढे येण्यासाठी धडपड करीत आहे. अपुरे भांडवल आणि भक्कम पाठबळ नसल्याने अनेक अडचणी आहेत. मात्र या अडचणींचे निराकरण करीत कल्पक उद्योजकांकडून वाटचाल केली जात आहे. अशा कल्पक उद्योजकांना चालना देण्यासाठी रत्नदीप कांबळे या तरुण उद्योजकाच्या संकल्पनेतून ‘बुद्धिस्ट उद्योजक’ समूहाचा उदय झाला आहे.

ठळक मुद्देरत्नदीप कांबळे यांच्या संकल्पनेला यश

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जेमतेम ६२ वर्षे लोटली आहेत. महामानवाच्या प्रेरणेतून या पाच दशकात या समाजाने शिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. आता उद्योग क्षेत्रातही हा समाज पुढे येण्यासाठी धडपड करीत आहे. अपुरे भांडवल आणि भक्कम पाठबळ नसल्याने अनेक अडचणी आहेत. मात्र या अडचणींचे निराकरण करीत कल्पक उद्योजकांकडून वाटचाल केली जात आहे. अशा कल्पक उद्योजकांना चालना देण्यासाठी रत्नदीप कांबळे या तरुण उद्योजकाच्या संकल्पनेतून ‘बुद्धिस्ट उद्योजक’ समूहाचा उदय झाला आहे.बौद्ध समाजातील तरुणांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी सहा वर्षापूर्वी रत्नदीप यांनी ‘बुद्धिस्ट एन्टरप्रीनर्स असोसिएशन आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ या ग्रुपची स्थापना केली. लहान मोठा व्यवसाय करणाऱ्या बौद्ध उद्योजकांना एकत्रित करायचे हा मूळ उद्देश यामागे होता. बौद्ध तरुणाकडून झालेला अशाप्रकारचा पहिलाच प्रयत्न होता. पुढे कार्याचाही विस्तार होत गेला. एखादा व्यवसाय करण्यास इच्छुक तरुणाला त्याबाबत आवश्यक मार्गदर्शन, बँक फायनान्ससाठी मदत, रितसर नोंदणी करण्यापासून व्यवसाय वाढीसाठी आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा या समूहातर्फे करण्याचे कार्य होत गेले. रत्नदीप आणि त्यांना जुळलेल्या सहकाºयांच्या प्रामाणिक प्रयत्नातून हळूहळू अनेक लहानमोठे उद्योजक त्यांच्याशी जुळले तर या संघटनेच्या मदतीने अनेक उद्योजक निर्माण झाले. विशेष म्हणजे अनेक बौद्ध महिला उद्योजिकासुद्धा या संघटनेशी जुळल्या असून संचालक म्हणून संघटनेची धुरा स्वीटी कांबळे या सांभाळत आहेत.या सहा वर्षात या संघटनेसोबत साडेसहा हजार उद्योजकांना जोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व प्रकारचे व्यावसायिक या संघटनेसोबत आहेत. आपल्या सहकाºयांना व्यवसाय मिळवून देणे, कोणते प्रोडक्ट कुठे चांगल्या प्रकारे विकले जाईल याची माहिती देणे आणि सामान्य ग्राहकांना या सहकाºयापर्यंत पोहचविणे याचे प्रयत्न संघटनेने चालविले आहेत. अभय, अनंत, पूरब, विश्लेष, समीर, सुशील, संजय, अमोल, सविता, नितेश, पवन आदी सहकारी उद्योजक या कार्यात दिवसरात्र झटत आहेत. या प्रयत्नातून आज बौद्ध उद्योजकांचे जाळे देशातील १२ राज्यांसह जपान, श्रीलंका, आॅस्ट्रेलिया, युएई, इंग्लंड, युक्रेन आदी देशात पसरले आहेत. १४० व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि वेबसाईटच्या माध्यमातून हे उद्योजक एकमेकांशी जुळले आहेत. विशेष म्हणजे संघटनेच्या माध्यमातूनच वर्षाला ५ कोटींचा व्यवसाय या उद्योजकांना मिळत आहे. रत्नदीप यांच्या संकल्पनेतून बाबासाहेबांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी बौद्ध उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे मोठे अभियानच उदयाला आले आहे.

 

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर