शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जयताळ्यातील ९ हेक्टर जागेवरील आरक्षण रद्द

By admin | Updated: August 11, 2015 03:55 IST

मौजा जयताळा येथील आरक्षित ९.२४ हेक्टर जमिनीचे ठराविक कालावधीत भूसंपादन न केल्याने कायद्यानुसार या

नागपूर : मौजा जयताळा येथील आरक्षित ९.२४ हेक्टर जमिनीचे ठराविक कालावधीत भूसंपादन न केल्याने कायद्यानुसार या जागेवरील आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात महापालिका प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.मौजा जयताळा येथील खसरा क्र. १२२ व १६२ मधील ३.०९ जागेवरील आरक्षण या जागेचे मालक श्री मारोती देवस्थानातर्फे विनोद गुडधे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६ नुसार १ फेबु्रवारी २०१३ रोजी मनपाला सूचना बजावली होती. या जागेचा टीडीआर घेण्यात जागा मालकांनी नकार दिला होता. त्यामुळे २०१३-१४ च्या शीघ्रगणकानुसार या जागेची किंमत ६०,७६,४८,५०० गृहित धरण्यात आली होती. या जमिनीच्या भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याच भागातील २.०३ हेक्टर जमिनीसंदर्भात मालक कल्पना अशोक ठाकरे यांच्यातर्फे प्रफुल्ल गुडधे यांनी मनपाला सूचना नोटीस बजावली होती. या जागेच्या भूसंपादनासाठी ४०,९७,०४,७५० ची तरतूद करणे, तसेच मनीष गुडधे यांच्या मालकीची ४.१२ हेक्टर जमीन भूसंपादनासाठी ८३,१५,१९,००० ची तरतूद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. परंतु भूसंपादनाचा कालावधी संपला आहे की नाही, यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. नियमानुसार कालावधी संपला असल्याने हा प्रस्ताव परत पाठवून याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना केल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. (प्रतिनिधी)समिती गठित करणार४शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागांचे भूसंपादन करण्याची गरज आहे की नाही, याबाबत चौक शी करण्यासाठी उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समिती अध्यक्षांच्या नियंत्रणात ही समिती काम करेल. समिती चौकशी अहवाल सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई४भूसंपादनाची कार्यवाही वेळीच न केल्याने आरक्षण रद्द झाले आहे. आरक्षणाला गरज असताना भूसंपादन केले नसल्याचे चौकशीत आढळून आल्यास या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सिंगारे यांनी दिला.अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही४जयताळा येथील आरक्षित ९.२४ हेक्टर जमिनीसंदर्भात अधिकाऱ्यांनी स्थायी पूर्वसूचना दिली नाही. याची वेळीच माहिती दिली असती तर अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करता आली असती. प्रस्तावाला विलंब झाल्याने व आर्थिक तरतूद नसल्याने हा विषय प्रशासनाकडे परत पाठविण्यात आला.