शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

एससींच्या विकासासाठी आरक्षण महत्त्वाचे : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 11:50 PM

शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भरू शकतात, त्यांचे आरक्षण कायम ठेवून त्यांना सवलत देऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देजागतिक मराठी संमेलनात प्रगट मुलाखत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण घेऊनही बाजारात नोकरी मागण्यासाठी गेलेल्या एससी विद्यार्थ्यांना जातीय आधारावर नोकरी नाकारली जाते. जात, वंश, धर्माच्या आधारावर ज्यांना संधी नाकारल्या जातात, अशांसाठी आरक्षण हे विकासाचे शस्त्र आहे. परंतु उच्चशिक्षित झाल्यानंतर जे शैक्षणिक शुल्क भरू शकतात, त्यांचे आरक्षण कायम ठेवून त्यांना सवलत देऊ नये, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी आज येथे केले.धरमपेठ येथील वनामतीच्या सभागृहात आयोजित जागतिक मराठी संमेलनात प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी डॉ. थोरात यांची प्रगट मुलाखत घेऊन त्यांना बोलते केले. विविध प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. थोरात म्हणाले, लोकांच्या मताने लोक प्रतिनिधी निवडून येत असल्यामुळे लोकशाहीची घसरण झाली नाही. परंतु वैचारिकतेत, धर्मनिरपेक्षतेतही घसरण झाली आहे. प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत. परंतु काही राज्यात धर्माच्या आधारावर सत्ता स्थापन होत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, शासनाचे एससी, एसटीबाबतचे धोरण बदलल्यामुळे दलितात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. राज्यात अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे वाढली आहेत. मागील पाच वर्षाच्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी योग्य ती तरतूद न केल्यामुळे त्याचा विकासावर परिणाम झाला आहे. सरपंच थेट जनतेतून निवडून देण्यात येत असल्यामुळे एससींचा मार्ग बंद झाला आहे. विकास हा गरिबापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. दारिद्र्य संपेल असा विकास व्हावा. शेती, उद्योगधंद्यांचे उत्पन्न वाढावे, पण त्यासोबतच गरिबांचेही उत्पन्न वाढण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. परंतु गरिबीत महाराष्ट्र ११ व्या क्रमांकावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाच्या खासगीकरणावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शैक्षणिक विषमता वाढून त्याचा परिणाम रोजगारावर होईल. शासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने भरती होत असून खासगी कंपन्यातही आरक्षण मिळत नसल्यामुळे एससींच्या विकासावर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.आंबेडकरी चळवळीतील गटबाजी धोकादायकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन करून महाडचा सत्याग्रह केला. काळाराम मंदिरात प्रवेश मिळविला. पुढे त्यांनी उभारलेल्या चळवळीचे गटातटात विभाजन झाले.एससींच्या समस्या गंभीर आहेत. त्यामुळे या विभाजनाची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा डॉ. थोरात यांनी दिला.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीreservationआरक्षण