शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पैसे जमा करणाऱ्या धार्मिकस्थळांना संरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:32 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार न्यायालयाच्या व्यवस्थापक कार्यालयात पैसे जमा करणाऱ्या अनधिकृत धार्मिकस्थळांना कोणतेही संरक्षण मिळाले नाही. न्यायालयाने गुरुवारीही आपली आधीची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे महापालिकेकरिता सर्वच अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाची भूमिका कायम : कारवाई करण्याचा मार्ग मोकळाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार न्यायालयाच्या व्यवस्थापक कार्यालयात पैसे जमा करणाऱ्या अनधिकृत धार्मिकस्थळांना कोणतेही संरक्षण मिळाले नाही. न्यायालयाने गुरुवारीही आपली आधीची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे महापालिकेकरिता सर्वच अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा आहे.कारवाईवर आक्षेप घेणाऱ्यांपैकी ३६५ अनधिकृत धार्मिकस्थळांनी पैसे जमा केले आहेत. न्यायालयाने हा आकडा रेकॉर्डवर घेतला, पण या धार्मिकस्थळांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला नाही. तसेच, आक्षेपकर्त्या धार्मिकस्थळांना सुनावणीची संधी देण्याची परवानगी मिळावी याकरिता मनपाने सादर केलेल्या अर्जावरदेखील निर्णय देण्यात आला नाही. हा अर्ज २ आॅगस्ट रोजी सुनावणीसाठी आल्यानंतर न्यायालयाने आक्षेपकर्त्या धार्मिकस्थळांना प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ही रक्कम वेळेवर जमा करणाºयांना सोडून उर्वरित धार्मिकस्थळांना २१ आॅगस्टपर्यंत प्रत्येकी ६० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले होते. यासंदर्भात न्यायालयात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांची जनहित याचिका प्रलंबित आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा तर, महापालिकेतर्फे वरिष्ठ वकील सी. एस. कप्तान व अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.रोडवरील अनधिकृत धार्मिकस्थळे हटवामहापालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांनी आपापल्या क्षेत्रामधल्या रोड व फुटपाथवरील अनधिकृत धार्मिकस्थळे शुक्रवारपर्यंत हटवावीत असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. तसेच, यावर दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. अनधिकृत धार्मिकस्थळे हटविल्यानंतर परत त्याच ठिकाणी पुन्हा धार्मिकस्थळांचे बांधकाम केले जात असल्याची माहिती न्यायालयाला सुनावणीदरम्यान देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने मनपाला अशा प्रकरणात काय कारवाई केली जात आहे यावरही स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत.बुटी ले-आऊटमधील नागरिकांना ‘शॉक’उच्च न्यायालयाने लक्ष्मीनगरातील बुटी ले-आऊटमधील २१ नागरिकांना ‘शॉक’ दिला. संबंधित नागरिक सार्वजनिक जागेवरील सिद्ध गणेश मंदिर वाचविण्यासाठी न्यायालयात आले आहेत. त्यांना मंदिराचा मंजूर आराखडा, जमिनीची मालकी इत्यादीबाबतची कागदपत्रे न्यायालयाला दाखविता आली नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये व्यवस्थापक कार्यालयात जमा करण्याचा आदेश दिला. नागरिकांतर्फे अ‍ॅड. शंतनु पांडे यांनी बाजू मांडली.ट्रस्ट अध्यक्षांना दणकानवीन शुक्रवारीतील शिंगाडा मार्केटस्थित नासुप्र उद्यानात असलेले मंदिर वाचविण्यासाठी नागराज महाराज व माँ अंबे चॅरिटेबल ट्रस्टने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, ट्रस्टची विनंती फेटाळून संबंधित मंदिर नासुप्रला हस्तांतरित करण्याचा आदेश दिला. तसेच, ट्रस्टच्या अध्यक्षा प्रमिलाबाई सावरकर यांना समन्स बजावून १ सप्टेंबर रोजी न्यायालयात व्यक्तिश: हजर होण्यास सांगितले. ट्रस्टतर्फे अ‍ॅड. जितेंद्र मटाले यांनी बाजू मांडली.जनार्दन मून यांच्यावर बसवला दावाखर्चनागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून २००९ पूर्वी सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेली सर्व प्रकारची धार्मिकस्थळे नियमित करण्यात यावी, अशा मागणी केली होती. त्यांनी यासंदर्भातील जीआरही न्यायालयासमक्ष ठेवला होता. उच्च न्यायालयाने आपण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण हाताळत असल्याचे स्पष्ट करून मून यांची याचिका खारीज केली. ही याचिका निरर्थक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदवले. तसेच, मून यांच्यावर १० हजार रुपये दावा खर्च बसवला. एवढेच नाही तर, यानंतर कोणतीही नवीन जनहित याचिका दाखल करताना या निर्णयाची माहिती सुरुवातीलाच नमूद करावी, असे सांगितले. मून यांच्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयReligious Placesधार्मिक स्थळे