शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आधी दुरांतोतील झटके कमी करा, मगच बुलेट ट्रेन चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 22:57 IST

मुंबई-नागपुर दुरांतोने प्रवास करताना जोरात झटके बसतात. प्रवाशांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधी दुरांतोतील प्रवाशांना बसणारे झटके बंद करून नंतर बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष व रेल्वे मेन्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष आर. पी. भटनागर यांनी केले.

ठळक मुद्देआर. पी. भटनागर यांचे प्रतिपादन : रिक्त पदांसाठी ‘सीआरएमएस’चे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई-नागपुर दुरांतोने प्रवास करताना जोरात झटके बसतात. प्रवाशांना गंभीर दुखापत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधी दुरांतोतील प्रवाशांना बसणारे झटके बंद करून नंतर बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करावा, असे प्रतिपादन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष व रेल्वे मेन्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष आर. पी. भटनागर यांनी केले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे सुरक्षिततेवर आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आलेले असताना त्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या समाधान सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला.भटनागर म्हणाले, रेल्वेत मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. पदभरती, गु्रप डी श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाचे निर्धारण, पर्यवेक्षकीय पदांकरिता ४,८०० ग्रेड पे आदी संघटनेच्यामागण्या प्रलंबित आहेत. चर्चेतून काही मागण्यांवर तोडगा निघाला असून काही प्रलंबित आहेत. आगामी काळात कर्मचाºयांच्या हिताचे प्रश्न सेंट्रल रेल्वे मजदूर संघ लावून धरणार आहे. देशव्यापी धरणे आणि निदर्शनाच्या माध्यमातून संघटना प्रशासनाचे लक्ष वेधुन घेणार आहे. रेल्वे प्रवाशांमध्ये रेल्वेप्रति विश्वास वाढविण्यासाठी त्यांना सुरक्षित प्रवासाची शाश्वती देणे गरजेचे आहे. परंतु कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, कामाचा ताण यामुळे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांच्या अडचणी प्रशासनाकडे मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळेची बचत करण्यासाठी रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फारसा फायदा होणार नाही. पत्रकार परिषदेला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे नागपूर विभागाचे मार्गदर्शक विनोद चतुर्वेदी, झोनल कार्यकारिणीतील कार्यकारी अध्यक्ष देबाशिष भट्टाचार्य, विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव बंडू रंधई, संघटक ई. व्ही. राव, वाय. डब्ल्यू, गोपाल, पुरुषोत्तम वानखेडे उपस्थित होते.‘सीएसटीएम’ची इंचभर जागा देणार नाहीमुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ब्रिटिशकालीन हेरिटेज इमारतीत सध्या मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांचे कार्यालय आहे.या संपूर्ण इमारतीला संग्रहालयाच्या रूपाने विकसित करण्याचा प्रयत्न रेल्वे मंत्रालयाच्यावतीने करण्यात येत आहे. त्यामुळे संग्रहालयासाठी या इमारतीची इंचभरही जागा देणार नाही, अशा इशारा आर. पी. भटनागर यांनी सरकारला दिला. त्यासाठी ८ मार्चपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून, ३ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर