शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला रेकॉर्डब्रेक भाव ८ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:07 IST

नागपूर : यंदा मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे पीक खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच व्यापारी आणि शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या ...

नागपूर : यंदा मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे पीक खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच व्यापारी आणि शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत आहे. भाव जास्त मिळत असल्याने अनेक जण कळमना बाजारात सोयाबीन विक्रीसाठी आणत असून, शनिवारी रेकॉर्डब्रेक भावात अर्थात ८ हजार रुपये क्विंटलने सोयाबीनची विक्री झाली. भाववाढीसाठी कमी आवक कारणीभूत असल्याचे अडत्यांनी सांगितले.

सणांमुळे खाद्यतेलाची मागणी वाढली

बाजारात सोयाबीनचा भाव वाढला असला तरीही सध्या कळमना बाजारात केवळ ४०० ते ५०० क्विंटल पोत्यांचीच आवक आहे. त्यात व्यापारी जास्त माल आणत आहेत. कळमना धान्य बाजाराचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, विदेशी बाजारात मंदी आहे; पण देशात सणांमुळे मागणी वाढल्याने खाद्यतेल आणि तेलबियांच्या बाजारात सोयाबीनचा भाव रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे. याशिवाय कमी आवक असल्याने भाववाढ झाली आहे. यावर्षी खरीप हंगामाचे सोयाबीन दसऱ्यानंतर बाजारात येणार आहे. यावर्षी सोयाबीनची जास्त लागवड झाली आहे. सध्या पीक चांगले आहे; पण यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे पिकावर संकटच आहे. गेल्या वर्षी काढणीच्या वेळी पाऊस मोठ्या प्रमाणात आल्याने सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे उत्पन्नात ५० टक्क्यांची घट झाली होती. त्याच कारणाने खाद्यतेलाचे भावही वाढले होते. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा तशीच परिस्थिती ओढवू नये, असे सेनाड यांनी स्पष्ट केले.

सरकारने तेलबियांच्या उत्पादनावर भर द्यावा

यंदा सोयाबीनच्या तुलनेत कापसाची लागवड कमी झाली आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला जास्त भाव मिळाल्याने सोयाबीनची लागवड वाढली आहे. याशिवाय यंदा सोयाबीनचे बियाणे महाग झाल्याने शेतकऱ्यांची गुंतवणूक वाढली आहे. सेनाड म्हणाले, लातूर आणि नांदेड येथील सोयाबीन तेलनिर्मिती प्रकल्प संचालकांनी सोयाबीन ८,४५० ते ८,७०० रुपये क्विंटल खरेदी केले आहे. हा एक रेकॉर्डच आहे. वाढते दर पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीनची जास्त पेरणी करावी. सरकारने खाद्यतेलाचे आयात शुल्क कमी करण्याऐवजी तेलबियांच्या उत्पादन वाढीवर भर द्यावा आणि आयातीसाठी विदेशी बाजारावर अवलंबून राहू नये. एवढेच नव्हे तर पामोलिनच्या आयातीवर नियंत्रण आणावे, अन्यथा घरगुती रिफायनरी कंपन्या संकटात येतील.