शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

नागपूर ग्रामीण भागात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये ५३ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 8:38 PM

एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात, असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभरात १०१ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५३ टक्क्यांनी अधिक आहे.

ठळक मुद्देमहिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह : ४९ गुन्हेगार तडीपार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात, असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभरात १०१ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा ५३ टक्क्यांनी अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे विविध गुन्ह्यांसंदर्भात विचारणा केली होती. नागपूर ग्रामीणमध्ये २०१७ मध्ये दरोडा, बलात्कार, चोरी, खून, विनयभंग इत्यादींचे किती गुन्हे दाखल झाले व किती आत्महत्या झाल्या, यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत ग्रामीण भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराचे ५५६ गुन्हे नोंदविण्यात आले. यात बलात्काराच्या १०१ प्रकरणांची नोंद आहे. २०१६ मध्ये हाच आकडा ६६ इतका होता. याशिवाय २०१७ या वर्षभरात विनयभंगाचे २१२ तर अपहरणाचे १४९ गुन्हे दाखल झाले.वर्षभरात ४१ हत्याया कालावधीत ग्रामीण भागात ४१ हत्या झाल्या. जबरी चोरीच्या ६२ प्रकरणांची नोंद झाली तर ८ ठिकाणी दरोडे पडले. दंगा पसरविण्यासाठी ८९ गुन्हे दाखल झाले.दिवसाला एक आत्महत्याजिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात थोड्याथोडक्या नव्हे तर ३४९ नागरिकांनी विविध कारणांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. सरासरी प्रत्येक महिन्याला २९ आत्महत्यांची नोंद झाली. ग्रामीण भागात आत्महत्यांचे प्रमाण कमी असते, असा समज आहे. मात्र ही आकडेवारी निश्चितच विचार करायला लावणारी आहे.तीन गुन्हेगारांवर मोक्का२०१७ या वर्षभरात पोलिसांनी ४९ गुन्हेगारांना तडीपार केले तर ३ गुन्हेगारांवर मोक्का लावण्यात आला. या कालावधीत खुनाच्या गुन्ह्यांत ७३, बलात्काराच्या गुन्ह्यांत ९७ तर दरोड्याच्या गुन्ह्यांतील ३१ आरोपींना अटक झाली. दंग्यांच्या ८९ प्रकरणांत ३२४ आणि विनयभंगाच्या आरोपाखाली २१८ जणांना अटक झाली.

 

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा