शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ हवा योजनेसाठी जनसहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:22 IST

महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या नागपूर शहराच्या स्वच्छ हवा कृती योजनेच्या प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महानगरपालिका यांसोबत शहरामध्ये वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी व्यक्त केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या नागपूर शहराच्या स्वच्छ हवा कृती योजनेच्या प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महानगरपालिका यांसोबत शहरामध्ये वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी व्यक्त केले.कोरोनानंतर शहरातील ‘हवेचा दर्जा सुधारण्यासाठीच्या कृती आराखड्याची निश्चिती’ या विषयावर नुकतेच ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेण्ट (सीएफएसडी) आणि वातावरण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिषदेत अनेक मान्यवर तज्ज्ञांचा सहभाग होता. यामध्ये नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, व्हीएनआयटीच्या स्थापत्यशास्त्र व नगर नियोजन विभागाचे सहायक प्रा. समीर देशकर, विदर्भ पर्यावरण कृती समितीचे संयोजक सुधीर पालिवाल, सीएफएसडीच्या संचालिका लीना बुद्धे, सीईईडब्ल्यूच्या प्रोग्राम असोसिएट तनुश्री गांगुली, वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केसभट आदींचा सहभाग होता. यावेळी मंडळाच्या वेबसाईटवरील १०२ शहरांच्या स्वच्छ हवा कृती आराखड्याचे विश्लेषण करण्यात आले. लीना बुद्धे यांनी लोकांना जागरूक ठेवून प्रदूषणमुक्त शहराच्या अंमलबजावणीसाठी त्यांनाच सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. शिवाय महापौर आणि लोकप्रतिनिधींनाही कृती समितीचे सदस्य बनविल्यास जबाबदारी निश्चित होईल, असेही त्या म्हणाल्या. सुधीर पालिवाल यांनी या मागणीला दुजोरा देत लोकांसाठी योजना राबविताना लोकांचाच विचार केला जात नसल्याची खंत व्यक्त केली.परिषदेदरम्यान आंतरविभागीय आणि आंतरराज्यीय समन्वय प्रणालीसोबतच वातावरणीय आणि तत्कालीन प्रदूषणाची एकात्मिक शहरनिहाय माहिती उपलब्ध करणे आणि पायाभूत सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था उभी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. शहरनिहाय लक्ष्य ठरवावे आणि त्यातील प्रत्येक कृती धोरणाचा स्वतंत्र आर्थिक गरजांनुसार विचार केला जावा. डॉ. राकेश कुमार म्हणाले, कोविड लॉकडाऊन काळात अनेक नव्या गोष्टी आपण कशा शिकलो, हवेतील प्रदूषणाशी दोन हात करण्यासाठी सामान्य लोकांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. हेमा देशपांडे यांनी, लॉकडाऊन काळात शहरातील प्रदूषणात कमालीची घट झाल्याचा उल्लेख करीत यानुसार धोरण ठरवावे लागेल, अशी भावना व्यक्त केली. समीर देशकर यांनी प्रदूषणमुक्त वाहतुकीला चालना महत्त्वाची असून त्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुदृढ व प्रभावी करण्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :pollutionप्रदूषणnagpurनागपूर