शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

‘चित्रांश’ने घातला व्यावसायिकांना गंडा

By admin | Updated: March 27, 2015 01:59 IST

चित्रांश नामक कंपनीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवत भिवापुरातील ५० व्यावसायिकांनी त्यात प्रत्येकी ३५ हजार रुपये गुंतविले होते.

भिवापूर : चित्रांश नामक कंपनीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवत भिवापुरातील ५० व्यावसायिकांनी त्यात प्रत्येकी ३५ हजार रुपये गुंतविले होते. मात्र, सदर कंपनी बोगस असल्याचे स्पष्ट होताच या सर्व व्यावसायिकांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, चित्रांशने भिवापुरातील या व्यावसायिकांना एकूण २० लाख रुपयांनी गंडा घातल्याचे उघड झाले आहे. चित्रांश टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीने एक योजना वर्षभरापूर्वी सुरू केली होती. या योजनेंतर्गत ३५ हजार रुपयांची प्राथमिक गुंतवणूक केल्यानंतर प्रति महिना सात हजार रुपये देण्याची बतावणी करण्यात आली होती. यासाठी कंपनीने भिवापुरातील काही दुकानांमध्ये एलसीडी लावून जाहिरात केली होती. ही कंपनी गुंतवणूक करणाऱ्यांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत सात हजार रुपये सहा ते १२ महिन्यांपर्यंत आठ हजर रुपये १२ ते ३६ महिन्यांपर्यंत १० हजार रुपये देणर होती. या आमिषाला बळी पडून भिवापुरातील काही व्यावसायिकांनी प्रत्येकी ३५ हजार रुपयांप्रमाणे गुंतवणूक केली होती. सुरुवातीला काहींनी या कंपनीकडून धनादेशही प्राप्त झाले. त्यामुळे इतरांचा विश्वास बसल्याने गुंतवणुकदारांची संख्या वाढूून ती ५० वर पोहोचली. या सर्वांनी ३५ हजार रुपयांचा भरणा करून त्यांच्या दुकानांमध्ये एलसीडी लावला. काही महिन्यानंतर या व्यवासायिकांना धनादेश मिळणे बंद झाले. काहींचे धनादेश वटले नाही. त्यामुळे त्यांनी पैशासाठी एजंटकडे तगादा लावायला सुरुवात केली. या कंपनीचे बिंंग फुटल्याने फसवणूक झाल्याचे त्या व्यवासायिकांच्या लक्षात आले. या प्रकरणी कुणीही भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची नावे कळू शकली नाहीत. (तालुका प्रतिनिधी)धनादेश ‘बाऊ न्स’या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अनेकांचे धनादेश बाऊन्स झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली. काहींनी कंपनीच्या नागपूर येथील कार्यालयात धाव घेतली. काहींनी नागपूर शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्याने या कंपनीच्या संचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पोलीस ठाण्यात कुणीही तक्रार नोंदविली नाही. काहींनी त्यांच्या दुकानातील टीव्ही संच काढून टाकत ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेतली.एजंट भूमिगतसदर प्रकार चव्हाट्यावर येताच अनेकांनी या कंपनीच्या एजंटशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या एजंटने कुणालाही प्रतिसाद दिला नाही. उलट, सर्व एजंट भूमिगत झाले. या कंपनीचे संचालक कोण आहे, कार्यालय कुठे आहे, त्यात नेमकी किती व्यावसायिकांनी किती रक्कम गुंतविली, हे कळायला मार्ग नाही. यात काहींनी कर्ज काढून तर काहींनी उसनवार करून गुंतवणूक केल्याची माहिती जाणकारांनी दिली. कुणीही भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली नाही.