शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाची तयारी व नकार एकाच नाण्याच्या दोन बाजू : लक्ष्मणराव जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:29 IST

एकीकडे सरकारतर्फे सैन्यदल व शस्त्र खरेदीसाठी पैसा गुंतविला जातो तर दुसरीकडे जनसामान्यांकडून युद्धाला विरोध केला जातो. यावरून देश युद्धाचे समर्थन करतो की नाही, असा विरोधाभास निर्माण होतो. मात्र सैन्यदल सक्षम करणे आणि युद्धाला विरोध करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ईव्वानचे सामाजिक जागृती अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे सरकारतर्फे सैन्यदल व शस्त्र खरेदीसाठी पैसा गुंतविला जातो तर दुसरीकडे जनसामान्यांकडून युद्धाला विरोध केला जातो. यावरून देश युद्धाचे समर्थन करतो की नाही, असा विरोधाभास निर्माण होतो. मात्र सैन्यदल सक्षम करणे आणि युद्धाला विरोध करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांनी व्यक्त केले.माजी वायुसैनिक कल्याण संस्था (ईव्वान)च्यावतीने आयोजित सामाजिक जागृती अभियान बीआरए मुंडले सभागृह येथे आयोजित करण्यात आले. ‘काश्मीरचा मुद्दा आणि पत्रकारिता’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. ते पुढे म्हणाले, कोणताही देश युद्ध नको असे आश्वस्त करीत असला तरी कोण कधी हल्ला करेल, हे सांगता येत नाही. अशावेळी आपले सशस्त्र दल तयारीत असले की समोरच्या देशाला हल्ला करताना मागे-पुढे पाहावे लागेल. त्यांच्यातील ही भीती युद्ध टाळण्यास कारणीभूत ठरते. म्हणजे युद्धाची तयारी करणे हे युद्ध टाळण्याचेच पाऊल होय, असे विश्लेषण त्यांनी मांडले. काश्मीर समस्या कशी निर्माण झाली व दोन्ही देशांचा काय दृष्टिकोन आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. भारताच्या दृष्टिकोनातून काश्मीरमधील एकतृतीयांश भागावर पाकिस्तानने कब्जा केला आहे. दुसरीकडे देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाल्याने याच आधारावर काश्मीर ताब्यात द्यावे, असा पाकिस्तानचा अट्टाहास आहे. ही समस्या एक तर चर्चेने किंवा युद्धाने सोडविली जाऊ शकते. मात्र भारताच्या सैन्यासमोर टिकणे व युद्धाने काश्मीर मिळविणे शक्य नाही, याची जाणीव पाकिस्तानला आहे. त्यामुळे ते दहशतवादाचा वापर करतात. मात्र काश्मीर आणि पाकिस्तानचेही बहुसंख्य मुस्लिम निष्पाप असून ते युद्धाचा विचारही करीत नसल्याचे जोशी म्हणाले. कोणत्याही शर्ती न स्वीकारता विंग कमांडर अभिनंदन यांना परत आणणे, ही बाब समस्या सोडविण्याची नवी सुरुवात ठरू शकते, असे मत त्यांनी मांडले.यावेळी प्रा. दिलीप डबीर यांनी ‘काश्मीर मुद्दा आणि तरुण’ या विषयावर, सुमंत टेकाडे यांनी ‘शिवाजी महाराज आणि युद्धाचे डावपेच’ या विषयावर आपले विचार मांडले. मेजर जनरल अनिल बाम यांनी ‘सैन्यदलाचे युद्धासाठी डावपेच’ या विषयावर आपली भूमिका मांडली. पुंडलिक सावंत, मनोहर भातकुलकर, महेश आंबोकर, चंद्रशेखर कुळकर्णी, लक्ष्मीकांत नांदूरकर, श्रीकांत गंगाधडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :warयुद्धSocialसामाजिक