शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

युद्धाची तयारी व नकार एकाच नाण्याच्या दोन बाजू : लक्ष्मणराव जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:29 IST

एकीकडे सरकारतर्फे सैन्यदल व शस्त्र खरेदीसाठी पैसा गुंतविला जातो तर दुसरीकडे जनसामान्यांकडून युद्धाला विरोध केला जातो. यावरून देश युद्धाचे समर्थन करतो की नाही, असा विरोधाभास निर्माण होतो. मात्र सैन्यदल सक्षम करणे आणि युद्धाला विरोध करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ईव्वानचे सामाजिक जागृती अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे सरकारतर्फे सैन्यदल व शस्त्र खरेदीसाठी पैसा गुंतविला जातो तर दुसरीकडे जनसामान्यांकडून युद्धाला विरोध केला जातो. यावरून देश युद्धाचे समर्थन करतो की नाही, असा विरोधाभास निर्माण होतो. मात्र सैन्यदल सक्षम करणे आणि युद्धाला विरोध करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे मत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांनी व्यक्त केले.माजी वायुसैनिक कल्याण संस्था (ईव्वान)च्यावतीने आयोजित सामाजिक जागृती अभियान बीआरए मुंडले सभागृह येथे आयोजित करण्यात आले. ‘काश्मीरचा मुद्दा आणि पत्रकारिता’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. ते पुढे म्हणाले, कोणताही देश युद्ध नको असे आश्वस्त करीत असला तरी कोण कधी हल्ला करेल, हे सांगता येत नाही. अशावेळी आपले सशस्त्र दल तयारीत असले की समोरच्या देशाला हल्ला करताना मागे-पुढे पाहावे लागेल. त्यांच्यातील ही भीती युद्ध टाळण्यास कारणीभूत ठरते. म्हणजे युद्धाची तयारी करणे हे युद्ध टाळण्याचेच पाऊल होय, असे विश्लेषण त्यांनी मांडले. काश्मीर समस्या कशी निर्माण झाली व दोन्ही देशांचा काय दृष्टिकोन आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. भारताच्या दृष्टिकोनातून काश्मीरमधील एकतृतीयांश भागावर पाकिस्तानने कब्जा केला आहे. दुसरीकडे देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाल्याने याच आधारावर काश्मीर ताब्यात द्यावे, असा पाकिस्तानचा अट्टाहास आहे. ही समस्या एक तर चर्चेने किंवा युद्धाने सोडविली जाऊ शकते. मात्र भारताच्या सैन्यासमोर टिकणे व युद्धाने काश्मीर मिळविणे शक्य नाही, याची जाणीव पाकिस्तानला आहे. त्यामुळे ते दहशतवादाचा वापर करतात. मात्र काश्मीर आणि पाकिस्तानचेही बहुसंख्य मुस्लिम निष्पाप असून ते युद्धाचा विचारही करीत नसल्याचे जोशी म्हणाले. कोणत्याही शर्ती न स्वीकारता विंग कमांडर अभिनंदन यांना परत आणणे, ही बाब समस्या सोडविण्याची नवी सुरुवात ठरू शकते, असे मत त्यांनी मांडले.यावेळी प्रा. दिलीप डबीर यांनी ‘काश्मीर मुद्दा आणि तरुण’ या विषयावर, सुमंत टेकाडे यांनी ‘शिवाजी महाराज आणि युद्धाचे डावपेच’ या विषयावर आपले विचार मांडले. मेजर जनरल अनिल बाम यांनी ‘सैन्यदलाचे युद्धासाठी डावपेच’ या विषयावर आपली भूमिका मांडली. पुंडलिक सावंत, मनोहर भातकुलकर, महेश आंबोकर, चंद्रशेखर कुळकर्णी, लक्ष्मीकांत नांदूरकर, श्रीकांत गंगाधडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :warयुद्धSocialसामाजिक