शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘पीडीएम पाेटॅश’; शेतकऱ्यांची होतेय तिहेरी फसवणूक

By सुनील चरपे | Updated: May 16, 2023 18:40 IST

Nagpur News काही कंपन्या ‘पीडीएम’ (पाेटॅश डिराइव्हड माेलॅसिस) एमओपीच्या दराने विकत आहे. एमओपीच्या तुलनेत पीडीएममध्ये अल्प प्रमाणात पाेटॅश असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुटीसाेबतच तिहेरी फसवणूक हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सुनील चरपे

नागपूर : चार महिन्यांपासून ‘एमओपी’ (म्युरेट ऑफ पाेटॅश)ची आयात बंद असल्याने देशात तुटवडा निर्माण झाला आहे. याला पर्याय म्हणून काही कंपन्या ‘पीडीएम’ (पाेटॅश डिराइव्हड माेलॅसिस) एमओपीच्या दराने विकत आहे. एमओपीच्या तुलनेत पीडीएममध्ये अल्प प्रमाणात पाेटॅश असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुटीसाेबतच तिहेरी फसवणूक हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रत्येक पिकाला नायट्राेजन, फाॅस्फरस आणि पाेटॅशिअम या तीन मूलभूत घटकांची नितांत आवश्यकता असते. पाेटॅशिअमच्या पूर्ततेसाठी पिकांना प्रति एकर ५० किलाे म्हणजेच ३० टक्के पाेटॅश देणे अनिवार्य असते. यासाठी शेतकरी पाेटॅशचे ६० टक्के प्रमाण असलेल्या एमओपीचा वापर करतात. चार महिन्यांपासून देशात एमओपीचा तुटवडा निर्माण झाला आहे. हीच संधी साधून काही कंपन्या १४.५ टक्के पाेटॅश असलेल्या पीडीएमची चढ्या दराने विक्री करीत आहेत. विशेष म्हणजे, एमओपी आणि पीडीएम यात किती टक्के पाेटॅश असते, याबाबत बहुतांश शेतकरी अनभिज्ञ आहेत.

चार महिन्यांपूर्वी बाजारात एमओपीचे दर एक हजार रुपये प्रति बॅग (५० किलाे) हाेते. सध्या पीडीएमची विक्री ९०० रुपये प्रति बॅग (५० किलाे) दराने केली जात आहे. विशेष म्हणजे, पीडीएमची निर्मिती उसाच्या मळीपासून केली जात असून, त्याचा प्रति बॅग उत्पादन खर्च २०० ते २५० रुपये आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. त्यामुळे पीडीएमचे दर प्रति बॅग ३०० ते ३५० रुपयांत मिळायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयात का थांबली?

एमओपीची आयात रशिया आणि युक्रेनमधून केली जाते. केंद्र सरकारने एमओपीच्या आयातीकडे दाेन वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे चार महिन्यांपासून एमओपीची आयात थांबली असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगतात. वास्तवात, या दाेन्ही देशांमधून सूर्यफूल, गहू व इतर वस्तूंची आयात सातत्याने सुरू असताना, एमओपीचीच आयात का थांबली आहे, यावर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पीडीएममुळे एमओपीकडे दुर्लक्ष

बाजारात एमओपीला पर्याय म्हणून पीडीएम उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एमओपीच्या पुरवठ्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा पर्याय उपलब्ध नसता तर शेतकऱ्यांनी एमओपीच्या पुरवठ्याची मागणी केली असती. पीडीएममुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट व फसवणूक हाेत असल्याचे कृषी विभागासह सर्वांनाच माहिती आहे. मात्र, कुणीही बाेलायला तयार नाही.

पिकांवर हाेणारे परिणाम

पाेटॅशचे प्रमाण कमी असल्याने पीडीएमचा पिकांना फारसा फायदा हाेत नाही. पाेटॅशच्या अभावामुळे शेतमालाचे उत्पादन घटते व दर्जा खालावताे. दर्जा खालावलेल्या शेतमालाला बाजारात कमी दर मिळताे. एमओपी मिळत नसल्याने आपले माेठे आर्थिक नुकसान हाेत असल्याचे खान्देशातील केळी उत्पादकांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती