शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

पाचगाव झाले ‘खास’गाव!

By admin | Updated: November 14, 2014 00:48 IST

नागपूर मेट्रो व्हिजनमध्ये नोंद असलेले आणि उमरेड तालुक्यातील ‘गिट्टीखदान’ची आगळीवेगळी ओळख असलेल्या ‘पाचगाव’ या गावाचा चेहरा आता बदलणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी

गडकरींनी दत्तक घेतलेल्या गावाचा चेहरामोहरा बदलणारअभय लांजेवार /अशोक ठाकरे - पाचगाव नागपूर मेट्रो व्हिजनमध्ये नोंद असलेले आणि उमरेड तालुक्यातील ‘गिट्टीखदान’ची आगळीवेगळी ओळख असलेल्या ‘पाचगाव’ या गावाचा चेहरा आता बदलणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमरेड-नागपूर महामार्गालगतचे सुमारे पाच हजार लोकवस्तीचे पाचगाव नावाचे गाव नुकतेच ‘दत्तक’ घेण्याची घोषणा केली. कानठळ्या बसविणारे ब्लास्टिंग, आरोग्याला हानीकारक ठरणारी गिट्टीखदानीची धूळ, पाणीटंचाई, रस्त्याची दुरवस्था, सांडपाणी या समस्येने बेजार झालेले गावकरी आता केंद्र शासनाच्या मदतीने, नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने विकासगंगा येणार, गावाचा कायापालट होणार असा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत. नागपूर (दिघोरी)पासून केवळ किमी अंतरावर असलेल्या पाचगावची नोंद आता केंद्रस्थानी झाली असून गावकऱ्यांनी पाहिलेले स्वप्न खरे झाले तर एक नवी ओळख पाचगावची होणार, असा विश्वास सरपंच पुण्यशीला मेश्राम, उपसरपंच रामाजी हटवार यांना वाटतो. यानिमित्ताने ‘पाचगाव’बाबत ‘आॅन दि स्पॉट’ माहिती ‘लोकमत’ने घेतली. लोकप्रतिनिधींच्या भावना, संवेदना जाणून घेतल्या. गावकऱ्यांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या, प्रश्न समजून घेतले. गिट्टीखदानीचे साम्राज्यपाचगाव परिसरात गिट्टीखदानीचे साम्राज्य पसरले आहेत. एकीकडे शेकडो बेरोजगारांच्या भाकरीची सुविधा या गिट्टीखदानच्या भरोशावर असली तरीही दुसरीकडे या खदानींमुळे होणारे नुकसानही धक्कादायकच आहे. वर्षाकाठी २५ ते ३० लाख रुपयाचे उत्पन्न असलेल्या या गावालगत ६८ गिट्टीखदान आहेत. गावकऱ्यांना धुळीचा होणारा त्रास अनेक वर्षापासूनचा आहे. यामुळे विविध आजाराने बेजारही होण्याची वेळ गावकऱ्यांवर येत असते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढता येईल का, यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे मानले जाते.पाण्याची नासाडीगावाशेजारीच पाझर तलाव आहे. मात्र तलावाचे तोंड फुटल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असते. सन २००८ पासून खोलीकरण आणि दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु, जिल्हा परिषदस्तरावर याबाबतही कोणतीही हालचाल होत नाही. पाण्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्यय वारंवार येथील लोकप्रतिनिधींनी लक्षात आणून दिल्यानंतरही कुंभकर्णी प्रशासनाला जाग येणार कधी, असा सवाल गावकऱ्यांचा आहे.तलाव खोलीकरण कधी?गावात असलेल्या जिल्हा परिषद तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी धूळखात पडली आहे. उन्हाळ्यात पाणी शुद्ध होत नाही. शिवाय दरवर्षी तीव्र पाणी टंचाईचा सामनाही करावा लागतो. यामुळे सन २००८ पासून या तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केल्याचे उपसरपंच रामाजी हटवार यांनी सांगितले. याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठरावही पारित करून पाठविण्यात आला. तलावाचे खोलीकरण झाले तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल शिवाय शेतीसाठीही पाण्याची सुविधा करता येईल, असेही हटवार म्हणाले. परंतु खोलीकरण होणार कधी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तलाव खोलीकरण झाल्यास कायमस्वरुपी पाणीटंचाई दूर होईल.विकासगंगा येणार; गावकऱ्यांना विश्वासकेंद्र शासनाच्या दत्तक गावाच्या संकल्पनेचे पाचगाव येथील गावकऱ्यांनीही स्वागत केले. आता विकासकामे होतील, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सुरेश नांदूरकर, ब्रम्हराज माटे, शेतमजूर नारायण ठाकरे यांनी व्यक्त केला. पाऊस आला की निंबा ते पाचगाव यादरम्यानच्या पुलावरून पाणी वाहते. अनेकदा विद्यार्थ्यांसाठी पूल धोक्याचा ठरतो. याकडे लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. पांदण रस्त्याचे मातीकरण, खडीकरण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.