शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

नागपूर विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी ७ कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:57 IST

पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यात ० टक्के साठा आहे. तर उर्वरित धरणात केवळ ६ टक्के इकता पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे.

ठळक मुद्देपाच वर्षातील सर्वात भयावह स्थितीधरणांमध्ये केवळ ६ टक्के पाणी साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यात ० टक्के साठा आहे. तर उर्वरित धरणात केवळ ६ टक्के इकता पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला (३० मे रोजी) केवळ २०१ दलघमी (६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभगाने जारी केलेल्या अहवालानुसार एकूण १८ पैकी ७ प्रकल्प कोरडे आहेत. यामध्ये ० टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३५ दलघमी (२५ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीसमध्ये ८ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १३ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १७ टक्के, सिरपूर १९ टक्के, पुजारी टोला ० टक्के, कालिसरार ४९ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ३ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात २८ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १२ टक्के, धाममध्ये ४ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ४ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.पाच वर्षातील स्थितीवर्ष (३० मे रोजी) नोंदवलेला पाणीसाठा२०१९- २०१ दलघमी२०१८ - ३९७ दलघमी२०१७ - ३२३ दलघमी२०१६ - ७३० दलघमी२०१५- ७९६ दलघमी२०१४ - १५२० दलघमीमध्यम व लघु प्रकल्पातील स्थितीही भयावहनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७८ दलघमी इतकी आहे. त्यात ३० मे रोजीपर्यंत केवळ ६४ दलघमी म्हणजेच १२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ४१ दलघमी म्हणजेच आठ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. मोठ्या अणि लघु प्रकल्पात तर मृतसाठ्यापेक्षाही कमी साठा आहे. मोठ्या प्रकल्पातील एकूण मृतसाठा हा किमान ९२० दलघमी असायला हवा. परंतु त्यात केवळ २०१ दलघमी इतके पाणी आहे. तर लघु प्रकल्पाचा एकूण मृतसाठा हा १६ दलघमी इतका आहे. यात आजच्या घडीला एकूण केवळ ४१ दलघमी इतकाच साठा शिल्लक आहे.

टॅग्स :DamधरणVidarbhaविदर्भwater shortageपाणीटंचाई