शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी ७ कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:57 IST

पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यात ० टक्के साठा आहे. तर उर्वरित धरणात केवळ ६ टक्के इकता पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे.

ठळक मुद्देपाच वर्षातील सर्वात भयावह स्थितीधरणांमध्ये केवळ ६ टक्के पाणी साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यात ० टक्के साठा आहे. तर उर्वरित धरणात केवळ ६ टक्के इकता पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला (३० मे रोजी) केवळ २०१ दलघमी (६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभगाने जारी केलेल्या अहवालानुसार एकूण १८ पैकी ७ प्रकल्प कोरडे आहेत. यामध्ये ० टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३५ दलघमी (२५ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीसमध्ये ८ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १३ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १७ टक्के, सिरपूर १९ टक्के, पुजारी टोला ० टक्के, कालिसरार ४९ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ३ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात २८ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १२ टक्के, धाममध्ये ४ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ४ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.पाच वर्षातील स्थितीवर्ष (३० मे रोजी) नोंदवलेला पाणीसाठा२०१९- २०१ दलघमी२०१८ - ३९७ दलघमी२०१७ - ३२३ दलघमी२०१६ - ७३० दलघमी२०१५- ७९६ दलघमी२०१४ - १५२० दलघमीमध्यम व लघु प्रकल्पातील स्थितीही भयावहनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७८ दलघमी इतकी आहे. त्यात ३० मे रोजीपर्यंत केवळ ६४ दलघमी म्हणजेच १२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ४१ दलघमी म्हणजेच आठ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. मोठ्या अणि लघु प्रकल्पात तर मृतसाठ्यापेक्षाही कमी साठा आहे. मोठ्या प्रकल्पातील एकूण मृतसाठा हा किमान ९२० दलघमी असायला हवा. परंतु त्यात केवळ २०१ दलघमी इतके पाणी आहे. तर लघु प्रकल्पाचा एकूण मृतसाठा हा १६ दलघमी इतका आहे. यात आजच्या घडीला एकूण केवळ ४१ दलघमी इतकाच साठा शिल्लक आहे.

टॅग्स :DamधरणVidarbhaविदर्भwater shortageपाणीटंचाई