शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

नागपूर विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी ७ कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 20:57 IST

पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यात ० टक्के साठा आहे. तर उर्वरित धरणात केवळ ६ टक्के इकता पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे.

ठळक मुद्देपाच वर्षातील सर्वात भयावह स्थितीधरणांमध्ये केवळ ६ टक्के पाणी साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प्रकल्प कोरडे पडले आहेत. यात ० टक्के साठा आहे. तर उर्वरित धरणात केवळ ६ टक्के इकता पाणीसाठा आहे. गेल्या पाच वर्षातील ही सर्वात भयावह स्थिती आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला (३० मे रोजी) केवळ २०१ दलघमी (६ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभगाने जारी केलेल्या अहवालानुसार एकूण १८ पैकी ७ प्रकल्प कोरडे आहेत. यामध्ये ० टक्के इतका पाणीसाठा आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात ० टक्के इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३५ दलघमी (२५ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीसमध्ये ८ टक्के, लोवर नांद ० टक्के, वडगाव प्रकल्पात १३ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात १७ टक्के, सिरपूर १९ टक्के, पुजारी टोला ० टक्के, कालिसरार ४९ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ३ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात २८ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १२ टक्के, धाममध्ये ४ टक्के, पोथरामध्ये ० टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ४ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ व बावनथडीमध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.पाच वर्षातील स्थितीवर्ष (३० मे रोजी) नोंदवलेला पाणीसाठा२०१९- २०१ दलघमी२०१८ - ३९७ दलघमी२०१७ - ३२३ दलघमी२०१६ - ७३० दलघमी२०१५- ७९६ दलघमी२०१४ - १५२० दलघमीमध्यम व लघु प्रकल्पातील स्थितीही भयावहनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारचे धरण आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७८ दलघमी इतकी आहे. त्यात ३० मे रोजीपर्यंत केवळ ६४ दलघमी म्हणजेच १२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ४१ दलघमी म्हणजेच आठ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. मोठ्या अणि लघु प्रकल्पात तर मृतसाठ्यापेक्षाही कमी साठा आहे. मोठ्या प्रकल्पातील एकूण मृतसाठा हा किमान ९२० दलघमी असायला हवा. परंतु त्यात केवळ २०१ दलघमी इतके पाणी आहे. तर लघु प्रकल्पाचा एकूण मृतसाठा हा १६ दलघमी इतका आहे. यात आजच्या घडीला एकूण केवळ ४१ दलघमी इतकाच साठा शिल्लक आहे.

टॅग्स :DamधरणVidarbhaविदर्भwater shortageपाणीटंचाई