शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बागेतील फळ विमा कंपन्यांनाच लाभदायी संत्रा उत्पादकांची आर्थिक पिळवणूक, हप्त्यात तिप्पट वाढ; 'ट्रिगर' मध्ये बदल

By सुनील चरपे | Updated: November 20, 2022 19:39 IST

बागेतील फळ विमा कंपन्यांनाच लाभदायी संत्रा उत्पादकांची आर्थिक पिळवणूक झाली. 

नागपूर : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविते. त्यासाठी शेतकरी, राज्य व केंद्र सरकार विमा कंपन्यांना हप्त्यापोटी विशिष्ट रक्कम देते. मागील १० वर्षांत संत्र्यासाठी या योजनेचे बदलले ट्रिगर, हप्त्यात केलेली तिप्पट वाढ आणि नुकसान होऊनही परतावा देण्यास टाळाटाळ या बाबींमुळे राज्यातील संत्रा उत्पादकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे व ही योजना कंपन्यांसाठीच लाभदायी असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात पीक विमा योजना सन २००० पासून, तर याच योजनेंतर्गत महाराष्ट्रात सन २०१२ पासून फळपीक विमा योजना लागू करण्यात आली. 

सुरुवातीला ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली आणि नंतर ती नियमित केली. पाऊस व प्रतिकूल वातावरणामुळे होणारे फळपिकांचे नुकसान विचारात घेत फळ उत्पादकांना आर्थिक दिलासा देणे हा योजनेचा मूळ उद्देश. त्याअनुषंगाने २७ सप्टेंबर २०१२ रोजी झालेल्या राज्यस्तरीय पीक विमा योजना समितीच्या बैठकीत फळपीक विमा योजनेचे ट्रिगर, हप्ते, अटी व नियम ठरविण्यात आले. मागील १० वर्षांत या याेजनेचे ट्रिगर चार वेळा बदलण्यात आले. या काळात संत्रा उत्पादकांचा वाटा प्रतिहेक्टरी ३६०० रुपयांवरून २० हजार रुपयांवर, राज्य व केंद्र सरकारचा वाटा १८०० रुपयांवरून १० ते ३० हजार रुपये करण्यात आला. नुकसानीच्या परताव्यात मात्र केवळ २० हजार रुपयांची वाढ करण्यात आली. सन २०१२-१३ मध्ये प्रतिहेक्टर ६० हजार रुपयांचा परतावा दिला जायचा, तर सन २०२२-२३ मध्ये तो ८० हजार रुपये करण्यात आला.

नागपूर जिल्ह्यासाठी विमा कंपनीला प्रतिहेक्टर एकूण ६० हजार रुपये प्राप्त होतात. त्या बदल्यात कंपनी नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना ८० हजार रुपयांचा परतावा देते. परतावा मिळण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. विमा कंपन्यांवर कुणाचाही वचक नसल्याने त्या नुकसानभरपाई परतावा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, विमा कंपन्या व सरकार संगनमताने ही योजना राबवित असल्याने आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप संत्रा उत्पादकांनी केला आहे.

ट्रिगर, नुकसानभरपाई व त्यातील वाढट्रिगर                         सन २०१२-१३ - सन २०१९-२० - सन २०२१-२२१) अवेळी पाऊस - २४,००० रु. - १९,२५० रु.  २) जादा/कमी तापमान - २४,००० रु. - १९,२५० रु.  ३) जादा तापमान - १२,००० रु. - १९,२५० रु.  ४) विमा संरक्षित रक्कम - ६०,००० रु. - ७७,००० रु. - ८०,००० रु.

विमा कंपनीला मिळणारी रक्कमसन २०१२-१३ - सन २०१९-२० - सन २०२१-२२१) शेतकरी - ३६०० रु. - ३८०० रु. - ४००० ते २०,००० रु.२) राज्य सरकार - १८०० रु. - १७,३२५ रु. - ७६०० ते ३०,००० रु.३) केंद्र सरकार - १८०० रु. - १७,३२५ रु. - १०,००० रु.

गारपीट विम्यातून दोन महिने बादया योजनेत गारपिटीमुळे होणाऱ्या संत्रा पिकाच्या नुकसानीचा समावेश सन २०१९ मध्ये करण्यात आला. गारपीट ट्रिगर १ जानेवारी ते ३० एप्रिल ठरविण्यात आला. गारपिटीचा धोका १ डिसेंबरपासून ३१ मेपर्यंत कायम असताना ट्रिगरमधून डिसेंबर व मे हे दोन महिने बाद केले आहेत. विम्यात गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश करावयाचा असल्यास विमा कंपनीला हप्त्यापोटी अतिरिक्त रक्कम द्यावी लागते. सन २०१९-२० मध्ये २५,६६७ रुपयांचा, तर सन २०२१-२२ मध्ये २६,६६७ रुपये नुकसानभरपाई देय रक्कम ठरविली होती.

आम्ही गारपीट विमा नोव्हेंबरमध्ये काढतो. नुकसानीचा काळ १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत ठरवला आहे. डिसेंबर व मे महिन्यात गारपिटीचा धोका असतो. जाचक अटींमुळे संत्रा उत्पादक विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. यात विमा कंपनीचा आर्थिक फायदा होता असे संत्रा उत्पादक रूपेश वाळके यांनी म्हटले.   

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी