शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

बागेतील फळ विमा कंपन्यांनाच लाभदायी संत्रा उत्पादकांची आर्थिक पिळवणूक, हप्त्यात तिप्पट वाढ; 'ट्रिगर' मध्ये बदल

By सुनील चरपे | Updated: November 20, 2022 19:39 IST

बागेतील फळ विमा कंपन्यांनाच लाभदायी संत्रा उत्पादकांची आर्थिक पिळवणूक झाली. 

नागपूर : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविते. त्यासाठी शेतकरी, राज्य व केंद्र सरकार विमा कंपन्यांना हप्त्यापोटी विशिष्ट रक्कम देते. मागील १० वर्षांत संत्र्यासाठी या योजनेचे बदलले ट्रिगर, हप्त्यात केलेली तिप्पट वाढ आणि नुकसान होऊनही परतावा देण्यास टाळाटाळ या बाबींमुळे राज्यातील संत्रा उत्पादकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे व ही योजना कंपन्यांसाठीच लाभदायी असल्याचे स्पष्ट होत आहे. देशात पीक विमा योजना सन २००० पासून, तर याच योजनेंतर्गत महाराष्ट्रात सन २०१२ पासून फळपीक विमा योजना लागू करण्यात आली. 

सुरुवातीला ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली आणि नंतर ती नियमित केली. पाऊस व प्रतिकूल वातावरणामुळे होणारे फळपिकांचे नुकसान विचारात घेत फळ उत्पादकांना आर्थिक दिलासा देणे हा योजनेचा मूळ उद्देश. त्याअनुषंगाने २७ सप्टेंबर २०१२ रोजी झालेल्या राज्यस्तरीय पीक विमा योजना समितीच्या बैठकीत फळपीक विमा योजनेचे ट्रिगर, हप्ते, अटी व नियम ठरविण्यात आले. मागील १० वर्षांत या याेजनेचे ट्रिगर चार वेळा बदलण्यात आले. या काळात संत्रा उत्पादकांचा वाटा प्रतिहेक्टरी ३६०० रुपयांवरून २० हजार रुपयांवर, राज्य व केंद्र सरकारचा वाटा १८०० रुपयांवरून १० ते ३० हजार रुपये करण्यात आला. नुकसानीच्या परताव्यात मात्र केवळ २० हजार रुपयांची वाढ करण्यात आली. सन २०१२-१३ मध्ये प्रतिहेक्टर ६० हजार रुपयांचा परतावा दिला जायचा, तर सन २०२२-२३ मध्ये तो ८० हजार रुपये करण्यात आला.

नागपूर जिल्ह्यासाठी विमा कंपनीला प्रतिहेक्टर एकूण ६० हजार रुपये प्राप्त होतात. त्या बदल्यात कंपनी नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना ८० हजार रुपयांचा परतावा देते. परतावा मिळण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. विमा कंपन्यांवर कुणाचाही वचक नसल्याने त्या नुकसानभरपाई परतावा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, विमा कंपन्या व सरकार संगनमताने ही योजना राबवित असल्याने आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप संत्रा उत्पादकांनी केला आहे.

ट्रिगर, नुकसानभरपाई व त्यातील वाढट्रिगर                         सन २०१२-१३ - सन २०१९-२० - सन २०२१-२२१) अवेळी पाऊस - २४,००० रु. - १९,२५० रु.  २) जादा/कमी तापमान - २४,००० रु. - १९,२५० रु.  ३) जादा तापमान - १२,००० रु. - १९,२५० रु.  ४) विमा संरक्षित रक्कम - ६०,००० रु. - ७७,००० रु. - ८०,००० रु.

विमा कंपनीला मिळणारी रक्कमसन २०१२-१३ - सन २०१९-२० - सन २०२१-२२१) शेतकरी - ३६०० रु. - ३८०० रु. - ४००० ते २०,००० रु.२) राज्य सरकार - १८०० रु. - १७,३२५ रु. - ७६०० ते ३०,००० रु.३) केंद्र सरकार - १८०० रु. - १७,३२५ रु. - १०,००० रु.

गारपीट विम्यातून दोन महिने बादया योजनेत गारपिटीमुळे होणाऱ्या संत्रा पिकाच्या नुकसानीचा समावेश सन २०१९ मध्ये करण्यात आला. गारपीट ट्रिगर १ जानेवारी ते ३० एप्रिल ठरविण्यात आला. गारपिटीचा धोका १ डिसेंबरपासून ३१ मेपर्यंत कायम असताना ट्रिगरमधून डिसेंबर व मे हे दोन महिने बाद केले आहेत. विम्यात गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश करावयाचा असल्यास विमा कंपनीला हप्त्यापोटी अतिरिक्त रक्कम द्यावी लागते. सन २०१९-२० मध्ये २५,६६७ रुपयांचा, तर सन २०२१-२२ मध्ये २६,६६७ रुपये नुकसानभरपाई देय रक्कम ठरविली होती.

आम्ही गारपीट विमा नोव्हेंबरमध्ये काढतो. नुकसानीचा काळ १ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत ठरवला आहे. डिसेंबर व मे महिन्यात गारपिटीचा धोका असतो. जाचक अटींमुळे संत्रा उत्पादक विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. यात विमा कंपनीचा आर्थिक फायदा होता असे संत्रा उत्पादक रूपेश वाळके यांनी म्हटले.   

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरी