शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

परीक्षेच्या अगोदर जप्त होतील अधिकाऱ्यांचे मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:32 PM

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. केंद्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. उत्तरपत्रिका ‘कस्टडी सेंटर’मध्ये गेल्यानंतरच फोन वापस करण्यात येणार आहेत. केवळ संचालकांनाच फोन बाळगण्याची परवानगी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देबोर्डाने केंद्र संचालकांना दिली सूचना : परीक्षार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्र घेऊन जाण्याची परवानगी नाही

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने परीक्षेच्या अगोदर व परीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई केली आहे. केंद्रात येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्याचे निर्देश केंद्र संचालकांना देण्यात आले आहेत. उत्तरपत्रिका ‘कस्टडी सेंटर’मध्ये गेल्यानंतरच फोन वापस करण्यात येणार आहेत. केवळ संचालकांनाच फोन बाळगण्याची परवानगी असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. यानिमित्त विभागीय अधिकाऱ्यांनी विभागातील सर्व परीक्षा केंद्र संचालकांची बैठक बोलविली होती. या बैठकीत त्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले उचलायची आहे, याची माहिती देण्यात आली. परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात कुठलेही ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्र नेण्याची परवानगी नाही, असे मंडळाच्या विभागीय सहसचिव माधुरी सावरकर यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर परीक्षार्थ्यांची कडेकोट तपासणी करण्यात येईल. जर विद्यार्थ्याकडे असे यंत्र सापडले तर ते जप्त करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागात ‘लोडशेडिंग’ची स्थिती पाहता परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर सर्व केंद्र संचालकांनी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासदेखील सांगण्यात आले आहे.‘होमगार्ड’ नव्हे पोलीस कर्मचारी तैनात करापरीक्षेदरम्यान केंद्रांवर प्रश्नपत्रिकांची सुरक्षा व परीक्षेदरम्यान शांती कायम रहावी यासाठी मंडळाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी परीक्षा केंद्रांवर ‘होमगार्ड’ऐवजी पोलीस कर्मचारी तैनात करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलexamपरीक्षा