शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

आता वेळेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 2:52 PM

आॅनलाईन लोकमतनागपूर : सरकारी काम म्हणजे महिनाभर थांब, असेच सामान्य नागरिक म्हणतात. ही प्रतिमा मोडित काढण्यासाठी लोकसेवा हमी कायदा करण्यात आला. यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.कायद्यानंतरही अधिकाऱ्यांची शिरजोरी कायम होती. त्यामुळे आता त्यांना दंडाची वेसण घालण्यात आली आहे. मुदतीत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड ...

ठळक मुद्देलोकसेवा हमी कायद्यात तरतूद

आॅनलाईन लोकमतनागपूर : सरकारी काम म्हणजे महिनाभर थांब, असेच सामान्य नागरिक म्हणतात. ही प्रतिमा मोडित काढण्यासाठी लोकसेवा हमी कायदा करण्यात आला. यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.कायद्यानंतरही अधिकाऱ्यांची शिरजोरी कायम होती. त्यामुळे आता त्यांना दंडाची वेसण घालण्यात आली आहे. मुदतीत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाच हजारांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. लोकसेवा हमी कायद्यात तशी तरतूद करण्यात आली आहे.सामान्य नागरिकांना प्रत्येक छोट्या कामासाठी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. चपला झिजल्या तरी काम होत नव्हते. एकाच कामासाठी वर्षानुवर्षे कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. यामुळे नागरिकांमध्ये शासनाप्रति प्रचंड चिड निर्माण झाली आहे. शासनाची प्रतिमा चांगली करून नागरिकांचे काम वेळेत करण्यासाठी शासनाने लोकसेवा हमी कायदा केला. या कायद्याच्या माध्यमातून कामांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.वेळेत काम न करणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. मात्र या कारवाईला अधिकाऱ्यांकडून भीकच घालण्यात आली नाही. कायद्यानंतरही नागरिकांचे काम वेळेत होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. अनेक प्रकरणात शिस्तभंगाची कारवाईच झाली नसल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. त्यामुळे शिरजोर अधिकारी तर शिस्तभंगाच्या कारवाईला भित नसल्याचे चित्र आहे. कायद्यात कारवाई संदर्भात कोणतीही ठोस तरतूद नसल्याने अधिकाऱ्यांवर याचा फारसा परिणाम होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. त्यामुळे आता कायद्याला आर्थिक दंडाची धार देण्यात आली आहे. यानुसार मुदतीत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यास पाचशे ते पाच हजारपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.मंत्रालयाला कायद्याच्या कार्यकक्षेत आणावेलोकसेवा हमी कायद्याच्या कार्यकक्षेत अनेक विभाग आणण्यात आले आहेत. मंत्रालय मात्र याच्या कार्यकक्षेत नाही. त्यामुळे अनेक विभागाकडून प्रस्ताव मंत्रालयात अडकल्याचे सांगून कामच करीत नाही. मंत्रालय कायद्याच्या कार्यकक्षेत नसल्याने त्यांच्यावर कोणतेही बंधन नाही किंवा कारवाईची तरतूद नाही. त्यामुळे मंत्रालयही कायद्याच्या कार्यकक्षेत आणायला हवे, अशीच मागणी होत आहे.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयnagpurनागपूर