शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

मोठा किंवा लहान भाऊ नाही, गुणवत्तेनुसार होणार जागा वाटप, नाना पटोले यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 13:02 IST

म्हणाले, महाराष्ट्र भाजपमुक्त होणारच

नागपूर : महाविकास आघाडीच्या ऐक्याचा पुनरुच्चार करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र भाजपमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. आघाडीत लहान किंवा मोठा भाऊ नाही. गुणवत्तेच्या आधारे जागा वाटप केले जाईल. जिथे जो पक्ष मजबूत असेल, तिथे त्यांचा उमेदवार उभा केला जाणार असल्याचे पटोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये आढावा बैठका घेण्यात आल्या. गुरुवारी नागपुरातही संघटनात्मक चर्चा झाली. या बैठकांत कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. बूथ आणि गावपातळीवर पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. राज्यातील नेतृत्व बदलण्याची कार्यकर्त्यांमध्ये तीव्र इच्छा आहे. राज्यात काँग्रेसला किती जागा मिळतील, असे विचारले असता पटोले म्हणाले की, निकाल काँग्रेसच्या बाजूने लागेल.

महायुती सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, राज्यातील सर्वच विभागांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. मात्र सरकार पुढाकार घेताना दिसत नाही. पिकांच्या आधारभूत किमतीतही कपात करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यातच महागाईमुळे शहरात आत्महत्याही होत आहेत. दुसरीकडे कंत्राटी पद्धतीवर नियुक्तीचे आदेश निघाल्याने बेरोजगारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेशी देणेघेणे नाही. विद्यार्थी संख्या कमी असल्याचे सांगून शाळा बंद केल्या जात आहेत. आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध लढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस हे मुद्दे जोमाने मांडणार असल्याचे पटोले म्हणाले.

भाजपने केलेल्या सर्वेक्षणात त्यांचा जनाधार संपत चालला आहे, त्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाहीत. जात जनगणनेच्या मागणीबाबत काँग्रेस ९ नोव्हेंबरपासून जनजागृती अभियान सुरू करणार आहे. यातून जात जनगणनेच्या फायद्यांची लोकांना जाणीव करून दिली जाणार असल्याचे पटोले म्हणाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, आमदार अभिजीत वंजारी, सरचिटणीस अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, प्रवक्ते अतुल लोंढे, नाना गावंडे आदी उपस्थित होते.

पूरग्रस्त भरपाई घेणार नाहीत

पाटोळे यांनी नागपुरातील पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या नुकसानभरपाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, अनेक बाधितांनी त्यांना सांगितले आहे की, ते नुकसानभरपाई स्वीकारणार नाहीत. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचे पटोले म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी