शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

संविधान बदलण्याची मानसिकता ठेचण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:06 PM

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात हिंसक जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अफवेमुळे या पाच जणांना मारण्यात आले. काही जण लोकांची डोकी भडकवण्याचे काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसले, पण त्याच पक्षाचे लोक संविधान बदलायला निघाले आहेत. ही मानसिकता ठेचून काढण्याची गरज आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांचा राईनपाडा घटनेवरून सरकारवर हल्लाबोलसोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घालणारा कायदा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात हिंसक जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अफवेमुळे या पाच जणांना मारण्यात आले. काही जण लोकांची डोकी भडकवण्याचे काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसले, पण त्याच पक्षाचे लोक संविधान बदलायला निघाले आहेत. ही मानसिकता ठेचून काढण्याची गरज आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून कपिल पाटील यांनी राईनपाडा येथील नाथपंथी डवरी समाजातील पाच जणांना मारहाण करून त्यांची हत्या केल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. धनंजय मुंडे यांनी हा विषय लावून धरला. ते म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रासाठी राईनपाडाची घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. समाजातील गरीब, दुर्बल, वंचित आणि उपेक्षित घटकातील या पाच जणांची इतक्या अमानुषपणे हत्या होते; परंतु समाजातून दबका आवाज वगळता निषेधाचा तीव्र सूर उमटत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.अफवेच्या गैरसमजातून पाच जणांना ठेचून मारले जाते. पाच निरपराधांना कोंडून त्यांची ठेचून हत्या जमाव करतो. या जमावाला कायद्याची भीती का वाटत नाही. अशी हत्या करण्यास समाज का प्रवृत होतो. या झुंडशाहीमागचा मास्टमार्इंड, यामागची विचारसरणी शोधावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. राईनपाडा प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या नियंत्रणात एसआयटी गठित करून या खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यात यावी. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत व कुटुंबातील व्यक्तीस नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.आंबा खाल्ल्याने पुत्र प्राती होते. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनू मोठा आहे. अशा मानसिकतेचे राईनपाडा येथील बळी आहेत. भटक्या जमातीची जात गणना करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. या समाजातील लोकांना पोलिसांनी ओळखपत्र द्यावे, अशी मागणी कपिल पटील यांनी केली.अफवांमुळे वेगवेगळ्या घटनात २२ जणांचे बळी गेले आहे. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी टास्क फोर्स गठित करण्यात यावे. अफवांना आळा घालण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपवरील चुकीच्या मेसेजला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नीलम गोºहे यांनी केली. रामहरी नूपवर म्ह्णाले, पुरोगामी राज्यात अफवांवर विश्वास ठेवणारा समाज आहे. याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला.काँग्रेसचा एकही अध्यक्ष तडीपार नव्हताअल्पकालीन चर्चेत भाई गिरकर यांनी विरोधकांवर टीका करताना काँग्रेसचा अध्यक्ष संविधानानुसार निवडला जात नसल्याचे म्हटले. याचा भाई जगताप यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, आजवर काँग्रेसचे ७२ अध्यक्ष झाले. यात फक्त चार गांधी होते. काँग्रेसचा एकही अध्यक्ष तडीपार नव्हता, असा अप्रत्यक्ष हल्लाबोल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केला. यावरून सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता.मुंडे-गोऱ्हे यांच्यात चकमकया अल्पकालीन चर्चेदरम्यान उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दुसऱ्या क्रमाकांवर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांचे नाव पुकारले. त्यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चेत त्यांचे नाव दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी केली. त्यावरून सभागृहाचे कामकाज नेमके कोणत्या नियमानुसार चालावे, यावर खल झाला. यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मला बोलू द्यायचे नाही का? यावर मुंडे म्हणाले, सदनाच्या दोन सदस्यांत अशाप्रकारे गैरसमज होत असेल तर कामकाजाला अर्थ राहत नाही. तार्इंना मी कशाला थांबवू, त्यानंतर उपसभापतींनी मुंडे यांना बोलण्यास सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Dhananjay Mundeधनंजय मुंडे