शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

हमीभावासाठी कायद्यापेक्षा कृतीची गरज

By admin | Updated: May 7, 2017 02:29 IST

शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारतर्फे हमीभाव जाहीर केला जातो.

अनिल देशमुख : सरकार जबाबदारी झटकतेय लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारतर्फे हमीभाव जाहीर केला जातो. जाहीर करण्यात आलेल्या हमीभावानुसार खरेदी करणे ही सरकारची जबाबदारी असते. परंतु गेल्या तीन वर्षापासून सोयाबीन, तूर, कापूस, गहू, चणासोबतच इतर शेतमालाची खरेदी ही हमीभावापेक्षा कमी किमतीमध्येच होत आहे. आता राज्य सरकार हमीभावाने खरेदी होण्यासाठी कायदा करण्याची घोषणा करीत आहे. हमीभावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी होण्यासाठी कायदाची नाही तर कृतीची गरज आहे, अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षापासून सततच्या नापिकीने शेतकरी पुरता हैरणा झाला आहे. असे असताना शासनाकडून एकाही रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. यावर्षी चांगले उत्पादन झाल्याने शेतकरी आनंदात होता. परंतु त्याचा माल बाजारात येताच भाव पडले. यातच नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजार समितीच्या व्यवहारावर परिणाम झाला आणि शेतमालाचे भाव पडले. दोन वर्षापासून तुरीचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी सरकारने शेतकऱ्यांना तुरीची लागवड करण्याचे आवाहन करीत तुरी हमी भावाने खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची पेरणी करावी यासाठी तुरीचे बियाणेसुध्दा दिले होते. सुरुवातीला शासनाने तूर खरेदी करण्यास नकार दिला होता. यानंतर विरोधक आक्रमक झाल्यावर तूर खरेदी सुरू केली. परंतु कधी बारदाना नाही तर कधी जागा नाही यासह विविध कारणे देऊन तूर खरेदी संथ गतीने केली आणि आता तर ती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आधारभूत किमतीमध्ये शेतमाल खरेदी करण्याची जबाबदारी शासनाची असताना कायदा करू असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.