शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

हमीभावासाठी कायद्यापेक्षा कृतीची गरज

By admin | Updated: May 7, 2017 02:29 IST

शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारतर्फे हमीभाव जाहीर केला जातो.

अनिल देशमुख : सरकार जबाबदारी झटकतेय लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारतर्फे हमीभाव जाहीर केला जातो. जाहीर करण्यात आलेल्या हमीभावानुसार खरेदी करणे ही सरकारची जबाबदारी असते. परंतु गेल्या तीन वर्षापासून सोयाबीन, तूर, कापूस, गहू, चणासोबतच इतर शेतमालाची खरेदी ही हमीभावापेक्षा कमी किमतीमध्येच होत आहे. आता राज्य सरकार हमीभावाने खरेदी होण्यासाठी कायदा करण्याची घोषणा करीत आहे. हमीभावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी होण्यासाठी कायदाची नाही तर कृतीची गरज आहे, अशी टीका माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षापासून सततच्या नापिकीने शेतकरी पुरता हैरणा झाला आहे. असे असताना शासनाकडून एकाही रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. यावर्षी चांगले उत्पादन झाल्याने शेतकरी आनंदात होता. परंतु त्याचा माल बाजारात येताच भाव पडले. यातच नोटाबंदीच्या निर्णयानंतर बाजार समितीच्या व्यवहारावर परिणाम झाला आणि शेतमालाचे भाव पडले. दोन वर्षापासून तुरीचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी सरकारने शेतकऱ्यांना तुरीची लागवड करण्याचे आवाहन करीत तुरी हमी भावाने खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची पेरणी करावी यासाठी तुरीचे बियाणेसुध्दा दिले होते. सुरुवातीला शासनाने तूर खरेदी करण्यास नकार दिला होता. यानंतर विरोधक आक्रमक झाल्यावर तूर खरेदी सुरू केली. परंतु कधी बारदाना नाही तर कधी जागा नाही यासह विविध कारणे देऊन तूर खरेदी संथ गतीने केली आणि आता तर ती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आधारभूत किमतीमध्ये शेतमाल खरेदी करण्याची जबाबदारी शासनाची असताना कायदा करू असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.