शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

राष्ट्रीयीकृत बँका महिन्यात कापताहेत थेट तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते : कर्जदार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 8:49 PM

Moratorium, Bank Harrasment, Nagpur news कोरोना महामारीनंतर रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत तब्बल सहा महिने व्यावसायिक आणि नोकरदार कर्जदारांना दिलासा देण्यासाठी मोरॅटोरिअमची सुविधा अर्थात कर्ज भरण्यास स्थगिती दिली. त्यानंतरही अनेक राष्ट्रीयीकृत बँका कर्जदारांना न कळविता त्यांच्या खात्यातून एकाच महिन्यात कर्जाचे तीन हप्ते कापत आहेत. त्यामुळे कर्जदार संकटात आले असून बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या घोषणेला हरताळ फासल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेच्या मोरॅटोरिअमच्या घोषणेला हरताळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोना महामारीनंतर रिझर्व्ह बँकेने एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत तब्बल सहा महिने व्यावसायिक आणि नोकरदार कर्जदारांना दिलासा देण्यासाठी मोरॅटोरिअमची सुविधा अर्थात कर्ज भरण्यास स्थगिती दिली. त्यानंतरही अनेक राष्ट्रीयीकृत बँका कर्जदारांना न कळविता त्यांच्या खात्यातून एकाच महिन्यात कर्जाचे तीन हप्ते कापत आहेत. त्यामुळे कर्जदार संकटात आले असून बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या घोषणेला हरताळ फासल्याचे चित्र आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कर्जाचे तीन हप्ते कापल्याची कर्जदारांची तक्रार आहे. हा प्रकार बँक ऑफ इंडियाच्या सर्वच शाखांमध्ये अनेक कर्जदारांसोबत घडत असल्याची तक्रार लोकमतकडे आली आहे. याची शहानिशा केली असता एका नोकरदार कर्जदाराने हप्ते कापल्याचे स्टेटमेंट दाखविले. या स्टेटमेंटमध्ये कर्जदाराच्या खात्यात असलेली रक्कम बँकेने वळती केली आहे. आता त्यांच्या खात्यात शून्य रुपये बॅलेन्स दाखवत आहे. हातात पैसा नसल्याने महिन्याचा खर्च कसा चालवायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

स्टेटमेंटनुसार कर्जदाराने जून २०१२ मध्ये बँक ऑफ इंडियाच्या सीताबर्डी शाखेतून गृहकर्ज घेतले आहे. तो कर्जाचे हप्ते नियमित फेडत आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी मोरॅटोरिअमची घोषणा करताना सप्टेंबरपर्यंत हप्ते कापण्यात येणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतरही कर्जदाराच्या खात्यातून ११ सप्टेंबरला १०,०१८ रुपयांचा हप्ता कापण्यात आला. एवढेच नव्हे तर ३० सप्टेंबरला पुन्हा ८,०१८ रुपयांचा दुसरा हप्ता कापला. त्यानंतर सप्टेंबरच्या पगाराची रक्कम खात्यात जमा होताच ९ ऑक्टोबरला ११,९४५ रुपये, १२ ऑक्टोबरला १,२२०, १३ ऑक्टोबरला ७०० रुपये आणि १६ ऑक्टोबरला २,१७० रुपये असे एकूण कर्जाच्या दोन हप्त्याचे १६,०३५ रुपये बँकेने वळते केले. दोन हप्त्यानंतर बँकेने पुन्हा तिसरा हप्ता कापण्याची तयारी केली आणि १९ ऑक्टोबरला १,७९५ रुपये बँकेने वळते केले. आता खात्यात शून्य रक्कम दाखवित आहे. खात्यात जशी जशी रक्कम जमा होईल, तशी वळती करण्याची बँकेची तयारी आहे. बँकेने रक्कम वळती केल्याचा मेसेज पहाटे ४ वाजता येतो. बँकेच्या अशा प्रकाराने कर्जदार त्रस्त आहेत. अशी घटना अनेक कर्जदारांसोबत घडत आहे.

काही बँकांनी मोरॅटोरिअमनंतर कर्जाचा कालावधी वाढविला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्याला ६० महिने कर्जाचे हप्ते फेडायचे असतील तर रिझर्व्ह बँकेच्या मोरॅटाेरिअमच्या घोषणेनंतर कर्ज फेडण्याची मुदत ६६ महिन्यांवर गेली आहे. पण बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँकेच्या घोषणेची अवहेलना करताना दिसून येत आहे.

मोरॅटोरिअमनंतर कर्जदारांना हप्ते कापण्यासाठी ‘एस आणि नो’चा पर्याय दिला होता. त्यानुसारच बँक हप्ते कापत आहे. ज्यांना नियमित पगार मिळत आहे, त्यांच्याच कर्जाचे हप्ते कापण्यात येत आहे आणि ज्यांना नियमित पगार मिळत नाही, अशांचे हप्ते कापण्यात येत नाहीत.

- विलास पराते, उपमहाव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया.

टॅग्स :bankबँकnagpurनागपूर