शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

परमबीर सिंह बेपत्ता, तर मग अनिल देशमुखांना अटक का ? नाना पटोलेंचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 18:58 IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत. आरोप करणारेच बेपत्ता असतील तर अनिल देशमुख यांना ईडीने अटक कशी काय केली, असा सवाल पटोले यांनी केला आहे.

ठळक मुद्देपरमबीर सिंह गुजरातमधूनच फरार

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १३ तासांच्या चौकशीनंतर सोमवारी मध्यरात्री ईडीने अटक केली. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या अटकेचा निषेध व्यक्त करत भाजपवर निशाना साधला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत. आरोप करणारेच बेपत्ता असतील तर अनिल देशमुख यांना ईडीने अटक कशी काय केली, असा सवाल करीत केवळ राजकीय सूडबुद्धीने सत्तेचा दुरुपयोग करणे सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.

पटोले म्हणाले. केंद्र सरकारजवळ मोठमोठ्या यंत्रणा आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी परमबीर सिंहचा शोध घेऊन त्याला अटक करायला हवी. परमबीर सिंहचे भारतातील शेवटचे लोकेशन हे अहमदाबाद होते. ईडीनेही हीच माहिती दिली होती. अहमदाबादमधून जर परमबीर सिंह फरार झाले असतील, तर त्यामागे कुणाचा हात आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सिंह यांनी गुजरातमधूनच पलायन केले आहे आणि केंद्रीय यंत्रणांनीच त्याला मदत केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आता देशमुखांनंतर अजित पवारांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, अशा कारवायांमुळे महाविकास आघाडी खचणार नाही. भाजपचे सुडाचे राजकारण जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच देगलूरमध्येही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर देशमुख यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेAnil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीParam Bir Singhपरम बीर सिंग