शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

नळाला नाही पाणी, घागर रिकामी रे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:42 AM

पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दिवसभर टँकरची चाकेदेखील बंद होती. शहरातील वस्त्यावस्त्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र होते.

ठळक मुद्देशहरातील ८० टक्के भाग कोरडा : कन्हान नदीमुळे पूर्व, उत्तर नागपूरवर कृपा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीकपातीच्या निर्णयाची बुधवारपासून उपराजधानीत अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे शहरातील ८० टक्के भागात पाणीपुरवठाच झाला नाही. तर कन्हान नदीतील पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील काही भागात १६० एमएलडी पाण्याचा पुरवठा झाला. शहरात दिवसभर टँकरची चाकेदेखील बंद होती. शहरातील वस्त्यावस्त्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र होते.पूर्व, उत्तर व दक्षिण नागपुरातील ‘आऊटर’ भाग पूर्णत: टँकरवर अवलंबून असतात. मात्र टँकर बंद असल्याने या भागांमध्ये पाण्यासाठी शोध सुरू असल्याचे दिसून आले. लोक विहिरी व हॅण्डपंपातून पाणी भरत होते. ज्यांनी प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये पाणी भरले होते, तेथेदेखील दुपारनंतर जलशोधमोहिम दिसून आली. दक्षिण-पश्चिम, पश्चिम नागपुरात पाणीपुरवठा पूर्णत: ठप्प झाला होता.शहरात दिवसभर पाण्याचे टँकर्स बंद होते. गुरुवारी शहरात पाणीपुरवठा समान व चांगल्या प्रमाणात व्हावा यासाठी ओसीडब्ल्यू व जलप्रदाय विभागाला आवश्यक दिशानिर्देश देण्यात आले आहेत, असे जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले.चार झोनमध्ये पाणीपुरवठाप्राप्त झालेल्या माहितीनुसार कन्हान नदीत पाण्याची पातळी चांगली आहे. जर या पाण्याचा उपयोग झाला नाही तर ते वाहून जाऊ शकते. यामुळेच कन्हान जलशुद्धीकरण केंद्र बुधवारी सुरू होते. त्यामुळे पूर्व व उत्तर नागपुरांतर्गत येणाऱ्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज व आसीनगर झोनच्या अनेक भागात पाणीपुरवठा झाला. मात्र ही स्थिती जास्त काळ राहणार नाही. जोपर्यंत कन्हान नदीत पाणी असेल तोपर्यंत येथे पाणीपुरवठा होईल.‘ओसीडब्ल्यू’ला दोनशेहून अधिक फोनपाणीपुरवठा न झाल्यामुळे ओसीडब्ल्यूच्या टोल फ्री क्रमांकावर दिवसभर फोनची घंटी खणखणत होती. दिवसभरात एकूण २०३ फोन आले. यात १०२ फोन हे पाणीकपातीचा निर्णय खरा आहे की नाही, याची विचारणा करण्यासाठी होते. तर १०१ जणांनी पाणीपुरवठा न झाल्याची तक्रार केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर