शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

नागपूर जि.प. च्या ७३२ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवास भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 11:30 PM

गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ७३२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रती विद्यार्थी सहा हजाराची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गावात शाळा नाही म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडू नये, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, म्हणून शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय घेतला. यावर्षी प्रवास भत्ता सहा हजार रुपये करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील ७३२ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.विद्यार्थ्याच्या गावातून शाळा १ किलोमीटरच्या वर असेल अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्यात येतो. गेल्या वर्षी ग्रामीण भागातील ५५ विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी वार्षिक तीन हजार रुपयेप्रमाणे प्रवास भत्ता दिला होता. मुळात भत्ता देण्याचे दुसरेही एक कारण म्हणजे जि.प.च्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १५३१ शाळा आहे. या शाळांची पटसंख्या ही दरवर्षी घसरतच चालली आहे. चार वर्षांत पटसंख्या १६ हजाराने घटली आहे. यंदा जि.प.शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ही ७१ हजार ४४८ इतकी आहे. गतवर्षी शिक्षण विभागाकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्याच्या १३ तालुक्यातील १ कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर शाळेत जाणाऱ्या ५५ विद्यार्थ्यांना प्रवासभत्त्यापोटी ३०० रुपये महिन्याप्रमाणे दहा महिन्याकरिता ३ हजार रुपये देण्यात आले होते. यंदा शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करून त्या बंद करण्याचा मानस बाळगला आहे. गेल्या वर्षी राज्यात १३०० शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कमी पटसंख्येच्या शाळांचे नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करुन विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही समायोजन करण्याचा शासनाचा मानस आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल असा विश्वास शासनाला आहे. सोबतच शिक्षकाच्या वेतनावर होणारा खर्च, पूर्वी सर्व शिक्षा अभियाना आता 'समग्र'अंतर्गत शाळेवर होणार खर्च लक्षात घेता, शासनावर कोट्यवधीचा बोझा पडतो आहे. तो कमी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरzpजिल्हा परिषदStudentविद्यार्थी