शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
4
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
5
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
6
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
7
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
8
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
9
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
10
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
11
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
12
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
13
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
14
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
15
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर वाहतूक पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा ‘हंटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 23:43 IST

नागपूरकरांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीची जाणीव नसलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात. या वर्षातील अवघ्या सहा महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या सव्वा लाखांहून अधिक नागरिकांवर कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा कारवाईचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून वाहतुकीच्या बेशिस्तीची ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यात नियम तोडणाऱ्या १ लाख ३३ हजार ५४२ वाहनचालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मात्र स्वत:च्या जबाबदारीची जाणीव नसलेल्या नागरिकांकडून सर्रासपणे वाहतुकीचे नियम तोडले जातात. या वर्षातील अवघ्या सहा महिन्यांत वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या सव्वा लाखांहून अधिक नागरिकांवर कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा कारवाईचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून वाहतुकीच्या बेशिस्तीची ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात घडलेल्या वाहतूक नियम उल्लंघनाची प्रकरणे, दंडातून प्राप्त झालेला महसूल, सायलेन्स झोनमध्ये झालेली कारवाई इत्यादीबाबत त्यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. १ जानेवारी २०१८ ते ३० जून २०१८ या कालावधीत नागपूर शहरात वाहतुकीचे नियम तोडणाºया एकूण १ लाख ३३ हजार ५४२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यात अतिवेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलणे, हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे तसेच ‘ट्रिपलसीट’ वाहन चालविणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.सिग्नल तोडणाऱ्या ९ हजार ४७१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या नागरिकांकडून १६ लाख ४० हजार ९०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. तर ‘सीटबेल्ट’ न लावता चारचाकी चालविणाऱ्या ४ हजार ९८ नागरिकांना पकडण्यात आले व त्यांच्याकडून ८ लाख ३ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आले. मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या ३ हजार ९८६ वाहनचालकांवर कारवाई झाली व त्यांच्याकडून ७ लाख १ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर हेल्मेट न घालणाऱ्या २१ हजार ८७ दुचाकीस्वारांना ७६ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांकडून २ कोटींचा दंड वसूलसहा महिन्यांच्या कालावधीत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या तब्बल १० हजार २०५ नागरिकांवर कारवाई झाली. या मद्यपींकडून थोडाथोडका नव्हे तर २ कोटी ३० लाख ६६ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ‘सायलेन्स झोन’चे उल्लंघन करणारे अवघे सतराच वाहनचालक सापडले व त्यांना २१ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

आॅटोचालक नियम कधी पाळणार ?शहरातील विविध भागांमध्ये आॅटोचालकांकडून बेदरकारपणे आॅटो चालविण्यात येतात. शिवाय नियमांचेदेखील मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याची नागरिकांची ओरड असते. नियम न पाळल्याबद्दल १५९६४ आॅटोचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून ३१ लाख ९८ हजार रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले

ट्रक, मोटार, बस जीवघेणेजानेवारी २०१५ ते जून २०१८ या कालावधीत ट्रक, कार व बसमुळे सर्वाधिक  १६०४ अपघात झाले व यात ४४६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ट्रकमुळे  ५६२ अपघात झाले व यात सर्वात जास्त २६३ नागरिकांचा हकनाक बळी गेला.

गुन्हा                        प्रकरणे            दंड (रुपयांमध्ये)अतिवेग                    २१                २१,७००सिग्नल तोडणे           ९,४७१          १६,४०,९००मोबाईलवर बोलणे    ३,९८६          ७,०१,१००हेल्मेट न घालणे        २१,०८७         ७६,३३,५००सिटबेल्ट                  ४,०९८            ८,०३,६००ट्रीपलसीट               ३,६७९            ६,२४,८७०सायलेन्स झोन           १७                २१,४००ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह     १०,२०५            २,३०,६६,४५०

ट्रक, बस, मोटारीमुळे झालेले मृत्यू (२०१५ ते जून २०१८)वाहन            अपघात            मृत्यूट्रक            ५६२                २६३मोटार        ९०१                १२६बस            १४१                ५७

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर