शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

.. तर नागपुरात धावपट्टीची लांबी कमी होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 23:33 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल बांधण्यात आलेल्या इमारतींच्या अवैध उंचीच्या बांधकामामुळे विमानाचे उड्डाण आणि उतरण्याला धोका निर्माण झाला आहे. मनपाने पुढाकार घेऊन इमारतींची अवैध उंची पाडावी. त्यामुळे विमानतळाची धावपट्टीची लांबी कमी करण्याचा प्रश्नच नाही, असे मत मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ व्यवस्थापक विजय मुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देमनपाने इमारतींचे अवैध बांधकाम तोडावे : ‘एमआयएल’तर्फे कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल बांधण्यात आलेल्या इमारतींच्या अवैध उंचीच्या बांधकामामुळे विमानाचे उड्डाण आणि उतरण्याला धोका निर्माण झाला आहे. मनपाने पुढाकार घेऊन इमारतींची अवैध उंची पाडावी. त्यामुळे विमानतळाची धावपट्टीची लांबी कमी करण्याचा प्रश्नच नाही, असे मत मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ व्यवस्थापक विजय मुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.मिहान इंडिया लिमिटेडच्यावतीने ‘विमानतळालगतच्या उंच इमारतींना ना-हरकत प्रमाणपत्र’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन बुधवारी वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये करण्यात आले. लोकांच्या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत बांधकामाशी संबंधित मनपा, नासुप्र, नगररचना विभाग, एनएमआरडी, महामेट्रो विभागाचे अधिकारी, क्रेडाई, वेद संस्थांचे पदाधिकारी, आठ नगरसेवकांसह एकूण ७० जण उपस्थित होते. कार्यशाळेत नागरी विमान प्राधिकरणाचे (मुख्यालय, कॉर्पोरेट कम्युनिकेशन) उपमहाव्यवस्थापक संजीव शाह आणि सहायक महाव्यवस्थापक (एनओसी) संजय कार यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुळेकर म्हणाले, उंच इमारतींबाबत संबंधित विभागाला पत्र लिहिले आहे. याशिवाय मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) याची माहिती महापालिकेला देऊन ८ ते १० इमारतींना नोटिसा जारी केल्या आहेत. त्यानंतरही मनपाने अवैध बांधकाम पाडण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही. ज्या इमारतींना नोटीस जारी केल्या आहेत, त्या अपीलमध्ये गेल्या आहेत. वेळीच पाऊल उचलले नाही तर विमानांचे उड्डाण आणि उतरण्याला धोका निर्माण होऊ शकतो.मंजुरीसाठी एक खिडकी योजनाविमानतळाच्या २० कि़मी. चौरस क्षेत्रात इमारतींच्या बांधकामाला मंजुरी हवी असेल तर आता केंद्र आणि राज्य सरकारने एक खिडकी योजना सुरू केली आहे. त्यामुळे १० ते १२ विभागाकडे मंजुरीसाठी जावे लागणार नाही. एएआयने कलर कोडिंग झोनिंग मॅप वेबसाईट प्रकाशित केली आहे. सर्व अधिकार मनपाला राहणार असून त्यांना ‘नोकॉस’ (नो आॅब्जेक्शन सर्टिफिकेट अप्लिंकेशन सिस्टीम) लोड करायची आहे. ही यंत्रणा संबंधित सर्व विभागाशी जोडण्यात येणार आहे. मॅपनुसार मनपाने इमारतींना मंजुरी दिल्यास एएआय मॅप पाहून मंजुरी प्रदान करणार आहे. कुठल्याही झंझटीविना ही प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण होणार आहे.सॉफ्टवेअरसंदर्भात एएआय व एमआयडीसीशी करार होणार आहे. ही यंत्रणा मुंबई, दिल्ली येथे कार्यान्वित झाली असून नागपुरात ३१ मार्च २०१९ पूर्वी सुरू होईल.विमानतळाच्या सभोवतालच्या इमारतींचे सर्वेक्षण होणारविमानांच्या उड्डाणाला धोका ठरणाऱ्या इमारतींचे नाशिक येथील राज टेक्नॉलॉजी कंपनी सर्वेक्षण करणार आहे. आॅक्टोबरमध्ये सर्वेक्षण पूर्ण होईल. त्याचा अहवाल डीजीसीएला पाठविण्यात येणार असून विमानांना अडथळा ठरणाºया इमारतींच्या संदर्भात डीजीसीए जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देऊन अवैध बांधकाम पाडण्यासंदर्भात सांगणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित विभागाला निर्देश देतील. ही प्रक्रिया योग्यरीत्या पार पडली तर धावपट्टीची लांबी कमी करण्यावर विचारही होणार नाही. नागपूर विमानतळाची धावपट्टी ३२०० मीटर आहे. इमारतींच्या अवैध बांधकामामुळे ५६० मीटर धावपट्टी कमी होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली होती. एमआयएलने दोन उंच इमारतींचे ना-हरकत प्रमाणपत्र रद्द केले आहे. यापूर्वी विमानतळाला धोका निर्माण होऊ पाहणाऱ्या मुंबईतील लाला पेन्टा हॉटेलचे दोन मजले पाडण्यात आल्याचे मुळेकर यांनी सांगितले. यावेळी एएआयचे महाव्यवस्थापक (एटीसी) युधिष्ठिर शाहू आणि सहय्यक महाव्यवस्थापक शफीक शाह उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर