शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

नागपुरात  निवृत्त पोलीस कर्मचारी अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 22:23 IST

भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून वाहतूक रोखली होती.

ठळक मुद्देभरधाव ट्रकची धडक : अवस्थीनगरात अपघात, प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून वाहतूक रोखली होती.

हरिराम यादव पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर मानकापुरात स्थायीक झाले. त्यांचा राकेश नामक मुलगा गुन्हेशाखेत तर, दुसरा लकडगंज ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत आहे. घरगुती कामाच्या निमित्ताने यादव गुरुवारी दुपारी दुचाकीने घराबाहेर पडले. ते अवस्थीनगर रिंग रोडवरून जात होते. अचानक वळणावर त्यांना आयशर ट्रक (एमएच ०४/ जीआर २३१२) च्या चालकाने समोरून जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीचालक यादव जागीच गतप्राण झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भरदुपारी हा अपघात घडल्याने आजूबाजूच्यांनी धाव घेतली. त्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालक शेर बहादूर यादव याला पकडून त्याची बेदम धुलाई केली. काहींनी ट्रकवर दगडफेक केली. टँक फोडून आगही लावण्याचे प्रयत्न केले. मात्र काहींनी समंजसपणा दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अपघातस्थळी प्रचंड गर्दी जमली होती. याचवेळी कॉग्रेसच्या संघर्ष यात्रेतील कार्यकर्ते तिकडून जात होते. त्यांनीही तेथे जमून जोरदार घोषणाबाजी केली. या मार्गावरची वाहतूक व्यवस्था चांगली करण्यात यावी, अशी मागणी करून वाहतूक रोखली. परिणामी तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला. अपघाताची माहिती कळताच मानकापूर तसेच गिट्टीखदान पोलिसांचे गस्ती पथक तसेच वाहतूक शाखेचे पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढली. तत्पूर्वी, जमावाच्या तावडीतून आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले. नंतर गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली.नेहमीच होतात अपघातवर्दळीचा मार्ग असूनही वाहतूक पोलीस सतर्कपणे काम करीत नसल्याने या भागातील वाहतूक कमालीची बेशिस्त झाली आहे. त्यामुळे नेहमीच अपघात होतात. संतप्त जमावाने हा मुद्दा लावून या भागात सिग्नल तसेच चौकात नेहमी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागणीच्या पूर्ततेचे आश्वासन दिल्यामुळे तणाव निवळला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू