शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागपुरात  निवृत्त पोलीस कर्मचारी अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 22:23 IST

भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून वाहतूक रोखली होती.

ठळक मुद्देभरधाव ट्रकची धडक : अवस्थीनगरात अपघात, प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून वाहतूक रोखली होती.

हरिराम यादव पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर मानकापुरात स्थायीक झाले. त्यांचा राकेश नामक मुलगा गुन्हेशाखेत तर, दुसरा लकडगंज ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत आहे. घरगुती कामाच्या निमित्ताने यादव गुरुवारी दुपारी दुचाकीने घराबाहेर पडले. ते अवस्थीनगर रिंग रोडवरून जात होते. अचानक वळणावर त्यांना आयशर ट्रक (एमएच ०४/ जीआर २३१२) च्या चालकाने समोरून जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीचालक यादव जागीच गतप्राण झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भरदुपारी हा अपघात घडल्याने आजूबाजूच्यांनी धाव घेतली. त्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालक शेर बहादूर यादव याला पकडून त्याची बेदम धुलाई केली. काहींनी ट्रकवर दगडफेक केली. टँक फोडून आगही लावण्याचे प्रयत्न केले. मात्र काहींनी समंजसपणा दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अपघातस्थळी प्रचंड गर्दी जमली होती. याचवेळी कॉग्रेसच्या संघर्ष यात्रेतील कार्यकर्ते तिकडून जात होते. त्यांनीही तेथे जमून जोरदार घोषणाबाजी केली. या मार्गावरची वाहतूक व्यवस्था चांगली करण्यात यावी, अशी मागणी करून वाहतूक रोखली. परिणामी तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला. अपघाताची माहिती कळताच मानकापूर तसेच गिट्टीखदान पोलिसांचे गस्ती पथक तसेच वाहतूक शाखेचे पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढली. तत्पूर्वी, जमावाच्या तावडीतून आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले. नंतर गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली.नेहमीच होतात अपघातवर्दळीचा मार्ग असूनही वाहतूक पोलीस सतर्कपणे काम करीत नसल्याने या भागातील वाहतूक कमालीची बेशिस्त झाली आहे. त्यामुळे नेहमीच अपघात होतात. संतप्त जमावाने हा मुद्दा लावून या भागात सिग्नल तसेच चौकात नेहमी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागणीच्या पूर्ततेचे आश्वासन दिल्यामुळे तणाव निवळला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू