शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

नागपुरात  निवृत्त पोलीस कर्मचारी अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 22:23 IST

भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून वाहतूक रोखली होती.

ठळक मुद्देभरधाव ट्रकची धडक : अवस्थीनगरात अपघात, प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून वाहतूक रोखली होती.

हरिराम यादव पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर मानकापुरात स्थायीक झाले. त्यांचा राकेश नामक मुलगा गुन्हेशाखेत तर, दुसरा लकडगंज ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत आहे. घरगुती कामाच्या निमित्ताने यादव गुरुवारी दुपारी दुचाकीने घराबाहेर पडले. ते अवस्थीनगर रिंग रोडवरून जात होते. अचानक वळणावर त्यांना आयशर ट्रक (एमएच ०४/ जीआर २३१२) च्या चालकाने समोरून जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीचालक यादव जागीच गतप्राण झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भरदुपारी हा अपघात घडल्याने आजूबाजूच्यांनी धाव घेतली. त्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालक शेर बहादूर यादव याला पकडून त्याची बेदम धुलाई केली. काहींनी ट्रकवर दगडफेक केली. टँक फोडून आगही लावण्याचे प्रयत्न केले. मात्र काहींनी समंजसपणा दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अपघातस्थळी प्रचंड गर्दी जमली होती. याचवेळी कॉग्रेसच्या संघर्ष यात्रेतील कार्यकर्ते तिकडून जात होते. त्यांनीही तेथे जमून जोरदार घोषणाबाजी केली. या मार्गावरची वाहतूक व्यवस्था चांगली करण्यात यावी, अशी मागणी करून वाहतूक रोखली. परिणामी तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला. अपघाताची माहिती कळताच मानकापूर तसेच गिट्टीखदान पोलिसांचे गस्ती पथक तसेच वाहतूक शाखेचे पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढली. तत्पूर्वी, जमावाच्या तावडीतून आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले. नंतर गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली.नेहमीच होतात अपघातवर्दळीचा मार्ग असूनही वाहतूक पोलीस सतर्कपणे काम करीत नसल्याने या भागातील वाहतूक कमालीची बेशिस्त झाली आहे. त्यामुळे नेहमीच अपघात होतात. संतप्त जमावाने हा मुद्दा लावून या भागात सिग्नल तसेच चौकात नेहमी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागणीच्या पूर्ततेचे आश्वासन दिल्यामुळे तणाव निवळला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू