शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
3
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
4
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
6
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
7
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
8
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
9
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
10
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
11
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
12
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
13
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
14
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
15
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
16
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
17
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
18
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
19
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
20
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ३९ टक्के शेतकरी कुटुंबीयच मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 20:04 IST

नागपूर जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१४ पासून जिल्ह्यामध्ये २४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ३९ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्या वाढीस : साडेचार वर्षांत २४७ आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१४ पासून जिल्ह्यामध्ये २४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ३९ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकाराअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. ३० जून २०१८ पर्यंत नागपूर विभागात किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत जानेवारी २०१४ ते जून २०१८ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ ९६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली तर तब्बल ६१ टक्के म्हणजेच १४९ प्रकरणे अपात्र ठरली. २ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र कुटुंबीयांना एकूण ९६ लाख रुपयांची मदत देण्यात आली.साडेसतरा वर्षात ७२३ आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार २००१ ते जून २०१८ या साडेसतरा वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये ७२३ शेतकºयांनी आत्महत्या केली. यातील २७० म्हणजेच २२० म्हणजेच ३७ टक्के प्रकरणे मदतीसाठी प्राप्त ठरली. तर ४५१ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले.२०१० पासूनची आकडेवारीवर्ष          आत्महत्या         पात्र        अपात्र२०१०           ६२               २३           ३९२०११           ३६               १३            २३२०१२           २८              १५            १३२०१३           २७              ९              १८२०१४           ६१              २३            ३८२०१५           ५५             २८           २७२०१६           ६६            २५           ४१२०१७           ४३            १४            २९२०१८ (जूनपर्यंत) २२     ६              १४मदतीबाबत १५ दिवसांच्या आत निर्णय अनिवार्यराज्य शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत मदतीबाबत निर्णय घेणे अनिवार्य आहे. तहसीलदार, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष आत्महत्येच्या जागी भेट दिल्यानंतर घटना झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा. त्यानंतर       जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मदतीबाबत १५ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnagpurनागपूर