शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

नागपूर जिल्ह्यात ३९ टक्के शेतकरी कुटुंबीयच मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 20:04 IST

नागपूर जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१४ पासून जिल्ह्यामध्ये २४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ३९ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देशेतकरी आत्महत्या वाढीस : साडेचार वर्षांत २४७ आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. २०१४ पासून जिल्ह्यामध्ये २४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील ३९ टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकाराअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. ३० जून २०१८ पर्यंत नागपूर विभागात किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत जानेवारी २०१४ ते जून २०१८ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ ९६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली तर तब्बल ६१ टक्के म्हणजेच १४९ प्रकरणे अपात्र ठरली. २ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र कुटुंबीयांना एकूण ९६ लाख रुपयांची मदत देण्यात आली.साडेसतरा वर्षात ७२३ आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार २००१ ते जून २०१८ या साडेसतरा वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये ७२३ शेतकºयांनी आत्महत्या केली. यातील २७० म्हणजेच २२० म्हणजेच ३७ टक्के प्रकरणे मदतीसाठी प्राप्त ठरली. तर ४५१ प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले.२०१० पासूनची आकडेवारीवर्ष          आत्महत्या         पात्र        अपात्र२०१०           ६२               २३           ३९२०११           ३६               १३            २३२०१२           २८              १५            १३२०१३           २७              ९              १८२०१४           ६१              २३            ३८२०१५           ५५             २८           २७२०१६           ६६            २५           ४१२०१७           ४३            १४            २९२०१८ (जूनपर्यंत) २२     ६              १४मदतीबाबत १५ दिवसांच्या आत निर्णय अनिवार्यराज्य शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत मदतीबाबत निर्णय घेणे अनिवार्य आहे. तहसीलदार, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष आत्महत्येच्या जागी भेट दिल्यानंतर घटना झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करावा. त्यानंतर       जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मदतीबाबत १५ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याnagpurनागपूर