शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नागपूर महानगरपालिका; भाजपचा आयुक्तांवर तर काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर रोष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:40 IST

कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नितीन साठवणे व शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आणलेल्या स्थगन प्रस्तावावर सलग चौथ्या दिवशी गुरुवारी वादळी चर्चा झाली.

ठळक मुद्देसत्ताधारी-आयुक्तांमुळे मनपा व नागपूरची प्रतिमा मलीनकाँग्रेस-मुंढे यांच्यामुळे सत्ताधाऱ्यांना लोकशाही आठवली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी आजवर विरोधी पक्षाच्या सदस्यांची गळचेपी केली. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे त्यांना लोकशाही कळली, अशी टीका काँग्रेस नगरसेवकांनी केली. दुसरीकडे सत्तापक्षातील नगरसेवकांनी आयुक्तांवर घणाघाती टीका केली. आयुक्त म्हणतात गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाहीत तर विकास कामासाठी निधी कसा देणार. कोविड नियंत्रण यंत्रणा राबवताना नागरिकांना मनस्ताप व त्रास सहन करावा लागला. आयुक्त शहरातील आमदार, खासदार व नगरसेवकांना कुठल्या स्वरूपाची माहिती देत नाहीत. नगरसेवक घोटाळेबाज असल्याची प्रतिमा निर्माण करायची, मुंबईच्या आमदारांना चुकीची माहिती देऊन नागपूर महापालिकेची बदनामी करतात, असा रोष व्यक्त केला.कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नितीन साठवणे व शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आणलेल्या स्थगन प्रस्तावावर सलग चौथ्या दिवशी गुरुवारी वादळी चर्चा झाली. काँग्रेस मुंढे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र होते तर भाजप सदस्यांनी मुंढे यांना धारेवर धरले. यातून काँग्रेस-भाजप सदस्यात आरोप-प्रत्यारोप झाले.मुंबईच्या आमदारांना माहिती देऊन नागपूरची बदनामीचुका होत असतील तर ते दुरुस्त करता येतात. आयुक्तांच्या १४ बदल्या झाल्या. सर्वच ठिकाणचे नगरसेवक चुकीचे होते का? कोविडमध्ये आयुक्तांनी चांगली तयारी केली. त्यांचे अभिनंदन. पण मंत्री, महापौर, आमदार, नगरसेवक यांच्याशी साधी चर्चा करावी असे त्यांना का वाटले नाही? अधिकार प्राप्त झाले म्हणून प्रभागातील नगरसेवकांना विचारात घ्यावेसे वाटले नाही. आयुक्त स्मार्ट सिटी सीईओ कसे झाले. पालकमंत्री, महापौर यांनी बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहत नाहीत. मी बादशहा झालो, असे मुंढे वागतात. आयुक्त मुंबईच्या आमदारांना माहिती देतात. यावर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून नागपूरची बदनामी करतात. सुरुवातीला त्यांच्या शिस्तीचे स्वागत झाले. आज त्यांचा विरोध होत आहे. अनिल सोले यांनी नाग नदी स्वच्छ करण्याला सुरुवात झाली. तेव्हापासून दरवर्षी काम सुरू आहे. पण प्रत्येकाने सांगितले आमच्या टीमने केले. पण यावर्षी आयुक्त स्वत: श्रेय घेत आहेत. पाच हजार बेडचे कोविड केअर सेंटर तयार करताना एकाही पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतले का? निविदाची साधी माहिती समितीला नाही. या निविदाची चौकशी व्हावी. जेवण मोफत मिळत आहे. पण वाटपावर प्रत्येक व्यक्तीवर ५३ रुपये खर्च होत असल्याचे प्रवीण दटके म्हणाले.मुंढे याच्यामुळे सत्तापक्षाला लोकशाही कळलीमनपा सभागृहात आजवर विरोधी पक्षांच्या सदस्यांची गळचेपी झाली आहे. गेल्या तीन महिन्यापासून आयुक्त लोकशाही मानत नाही असा आरोप सत्ताधारी करीत आहेत. मुंढे यांच्या माध्यमातून का होईना, सत्तापक्षाला लोकशाही कळली आहे, अशी टीका काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी केली. आयुक्तांवर फाईल थांबवण्याचा आरोप केला जात आहे. परंतु मागील तीन महिन्यातच महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिघडलेली नाही. अनेक वर्षांत मनपाचे आर्थिक स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मनपाला भरपूर आर्थिक मदत मिळाली. परंतु शासनाच्या निधीवर किती दिवस विसंबून राहणार. स्थायी समितीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने फाईल मंजूर करण्यात आल्या. व्यक्तिगत राग, लोभ सोडून आयुक्त, महापौरांनी समन्वय निर्माण करून शहराचा विकास करावा. सत्ताधाऱ्यांना शहर विकासासाठी हजारो कोटींचा निधी आल्याचा दावा केला जात आहे; परंतु शहराचा विकास नाल्या दुरुस्तीत अडकला आहे. जाब विचारण्याचा व चुका निदर्शनास आणण्याचा विरोधकांना अधिकार आहे. आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रदीर्घ चर्चा सुरू आहे. काम करताना चुका होतच असतात. माणूस त्या दुरुस्त करतो. कोविड नियंत्रणाचे काम चांगले झाल्याचे गुडधे म्हणाले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे