शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

नागपूरने १२ दिवसात गमावले चार गायक : संगीतक्षेत्रावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:00 IST

इतिहासात २०२० हे वर्ष सर्वार्थाने संकटवर्ष म्हणून नोंदवले जाणार आहे. कलाक्षेत्राला तर या वर्षात प्रचंड घरघर लागलेली आहे. बॉलिवूड म्हणा व इतर कला क्षेत्रातील कलावंतांचे निधन याच काळात झाल्याने कलाक्षेत्रासाठी सर्वात दु:खदायी म्हणून हे वर्ष ठरत आहे. नागपूरकरांवरही गेल्या १२ दिवसात चार गायक कलावंतांना कायमचा निरोप देण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतिहासात २०२० हे वर्ष सर्वार्थाने संकटवर्ष म्हणून नोंदवले जाणार आहे. कलाक्षेत्राला तर या वर्षात प्रचंड घरघर लागलेली आहे. बॉलिवूड म्हणा व इतर कला क्षेत्रातील कलावंतांचे निधन याच काळात झाल्याने कलाक्षेत्रासाठी सर्वात दु:खदायी म्हणून हे वर्ष ठरत आहे. नागपूरकरांवरही गेल्या १२ दिवसात चार गायक कलावंतांना कायमचा निरोप देण्याची वेळ आली आहे.चित्रपट गीते, भजनसंध्या, जागरणांमध्ये आपल्या स्वरांनी कायम नागपूरकर रसिकांचे मनोरंजन करणारे तीन गायक कलावंत मो. अफजल, शेखर घटाटे, सुधीर माणके व विजय चिवंडे यांचे गेल्या १२ दिवसात निधन झाले. २ ऑगस्टला मो. अफजल व शेखर घटाटे, ८ ऑगस्टला सुधीर माणके तर १४ ऑगस्टला विजय चिवंडे यांनी अखेरचा श्वास घेतला. शेखर घटाटे हे नागपुरात गायक व इव्हेंट मॅनेजर म्हणून विख्यात होते. त्यांचे नेताजी मार्केटमध्ये एस.कुमार इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती तर मो. अफजल हे विशेषत्वाने मो. रफी यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करत असत. १९९४ मध्ये त्यांनी त्याच अनुषंगाने फनकार आर्केस्ट्राची स्थापना केली होती. सुधीर माणके हे नागपूरच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये कार्यरत होते. काही दिवसापूर्वी त्यांची बदली जळगावच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये झाली होती. नोकरीसोबतच गायनाचा छंद त्यांनी जोपासला होता आणि बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या गोड स्वरांनी नागपूरकरांना रिझवले होते. या दोघांच्या शोककळेतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असलेल्या नागपूरच्या संगीतक्षेत्रावर १४ ऑगस्टला पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. पूर्णवेळ गायनाच्या क्षेत्रात करिअर करत असलेले ४२ वर्षीय विजय चिवंडे यांचा पहाटेच मृत्यू झाला. दोनच दिवसाआधी त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. रात्री त्यांनी घरच्यांशी आनंदाने संवादही साधला होता. मात्र, पहाटे त्यांच्या निधनाची वार्ता आली आणि कलाक्षेत्रावर दु:खाचे सावट पसरले. गेल्या २० वर्षापासून ते संगीत क्षेत्रात होते आणि हजारोंच्या वर गायनाचे त्यांचे कार्यक्रम झाले होते. मो. रफी यांचा आवाज म्हणून चिवंडे यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी व मुलगा आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर