शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

नागपूरने १२ दिवसात गमावले चार गायक : संगीतक्षेत्रावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:00 IST

इतिहासात २०२० हे वर्ष सर्वार्थाने संकटवर्ष म्हणून नोंदवले जाणार आहे. कलाक्षेत्राला तर या वर्षात प्रचंड घरघर लागलेली आहे. बॉलिवूड म्हणा व इतर कला क्षेत्रातील कलावंतांचे निधन याच काळात झाल्याने कलाक्षेत्रासाठी सर्वात दु:खदायी म्हणून हे वर्ष ठरत आहे. नागपूरकरांवरही गेल्या १२ दिवसात चार गायक कलावंतांना कायमचा निरोप देण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतिहासात २०२० हे वर्ष सर्वार्थाने संकटवर्ष म्हणून नोंदवले जाणार आहे. कलाक्षेत्राला तर या वर्षात प्रचंड घरघर लागलेली आहे. बॉलिवूड म्हणा व इतर कला क्षेत्रातील कलावंतांचे निधन याच काळात झाल्याने कलाक्षेत्रासाठी सर्वात दु:खदायी म्हणून हे वर्ष ठरत आहे. नागपूरकरांवरही गेल्या १२ दिवसात चार गायक कलावंतांना कायमचा निरोप देण्याची वेळ आली आहे.चित्रपट गीते, भजनसंध्या, जागरणांमध्ये आपल्या स्वरांनी कायम नागपूरकर रसिकांचे मनोरंजन करणारे तीन गायक कलावंत मो. अफजल, शेखर घटाटे, सुधीर माणके व विजय चिवंडे यांचे गेल्या १२ दिवसात निधन झाले. २ ऑगस्टला मो. अफजल व शेखर घटाटे, ८ ऑगस्टला सुधीर माणके तर १४ ऑगस्टला विजय चिवंडे यांनी अखेरचा श्वास घेतला. शेखर घटाटे हे नागपुरात गायक व इव्हेंट मॅनेजर म्हणून विख्यात होते. त्यांचे नेताजी मार्केटमध्ये एस.कुमार इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती तर मो. अफजल हे विशेषत्वाने मो. रफी यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करत असत. १९९४ मध्ये त्यांनी त्याच अनुषंगाने फनकार आर्केस्ट्राची स्थापना केली होती. सुधीर माणके हे नागपूरच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये कार्यरत होते. काही दिवसापूर्वी त्यांची बदली जळगावच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये झाली होती. नोकरीसोबतच गायनाचा छंद त्यांनी जोपासला होता आणि बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या गोड स्वरांनी नागपूरकरांना रिझवले होते. या दोघांच्या शोककळेतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असलेल्या नागपूरच्या संगीतक्षेत्रावर १४ ऑगस्टला पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. पूर्णवेळ गायनाच्या क्षेत्रात करिअर करत असलेले ४२ वर्षीय विजय चिवंडे यांचा पहाटेच मृत्यू झाला. दोनच दिवसाआधी त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. रात्री त्यांनी घरच्यांशी आनंदाने संवादही साधला होता. मात्र, पहाटे त्यांच्या निधनाची वार्ता आली आणि कलाक्षेत्रावर दु:खाचे सावट पसरले. गेल्या २० वर्षापासून ते संगीत क्षेत्रात होते आणि हजारोंच्या वर गायनाचे त्यांचे कार्यक्रम झाले होते. मो. रफी यांचा आवाज म्हणून चिवंडे यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी व मुलगा आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर