शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

अटल ‘काव्यांजली’चा नागपूर भाजपाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:10 PM

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त त्यांना ‘काव्यांजली’ देण्यासंदर्भात भाजपाच्या ‘हायकमांड’कडून आवाहन करण्यात आले होते. नागपुरात मात्र आयोजनाचा शहर भाजपाला विसर पडला.

ठळक मुद्देशहर भाजपातर्फे कुठलाच पुढाकार नाही देशात मात्र ठिकठिकाणी आयोजन

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम मासिक पुण्यस्मरणानिमित्त देशभरात त्यांना ‘काव्यांजली’ देण्यासंदर्भात भाजपाच्या ‘हायकमांड’कडून आवाहन करण्यात आले होते. देशातील विविध ठिकाणी यासंदर्भात आयोजनदेखील झाले. मात्र अटलजींचा ऋणानुबंध असलेल्या नागपुरात मात्र आयोजनाचा शहर भाजपाला विसर पडला. वाजपेयींच्या अस्थींच्या कलशयात्रेत समोर असलेल्या नेत्यांनीदेखील यासंदर्भात कुठलाही पुढाकार घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ आॅगस्ट रोजी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभरात शोक पाळण्यात आला. शिवाय त्यांच्या अस्थींच्या कलशाची देशभरात ठिकठिकाणी यात्रादेखील काढण्यात आली. अटलजींच्या प्रथम मासिक पुण्यतिथीनिमित्त त्यांना ‘काव्यांजली’ अर्पण करून त्यांच्या स्मृतींचा जागर करण्यात यावा. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात याचे आयोजन होईल, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. यात अटलजींच्या कवितांचे वाचन, कविसंमेलन यांचे आयोजन यांचादेखील समावेश असेल, असे शाह यांनी स्पष्ट केले होते.त्याअनुसार १६ व १७ सप्टेंबर रोजी देशाच्या राजधानीसह विविध ठिकाणी ‘काव्यांजली’चे आयोजन करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी त्या त्या क्षेत्रातील मोठे नेते, कवी उपस्थित होते. मात्र नागपूर भाजपाला मात्र बहुधा राष्ट्रीय अध्यक्षांच्या घोषणेचाच विसर पडला. त्यामुळेच की काय शहरात एकाही विधानसभा क्षेत्रात कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अटलजींच्या अस्थींच्या कलश यात्रेत शहरातील अनेक नेते उपस्थित होते. त्यांनीदेखील या आयोजनासंदर्भात कुठलाही पुढाकार घेतला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शहराध्यक्ष म्हणतात, एकत्रित आयोजन करणारयासंदर्भात प्रतिक्रियेसाठी शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी १६ व १७ सप्टेंबर रोजी आयोजन झाले नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वेगवेगळे आयोजन करण्याऐवजी एकत्रित आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. याबाबत आमची प्राथमिक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आयोजन नेमके कधी होणार व त्याचे स्वरुप कसे होणार याबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ‘काव्यांजली’चे आयोजन करण्याचे निर्देश अमित शाह यांनी दिले होते.

‘कार्यांजली’ चौकटीत बांधली गेली‘काव्यांजली’ झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या आठवडा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरू होणारा सेवा सप्ताह पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपर्यंत चालेल व ही अटलजींना ‘कार्यांजली’ असेल, असे निर्देशदेखील अमित शाह यांनी दिले होते. नागपुरात सोमवारपासून काही प्रभागांमध्ये सोमवारपासून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनीदेखील यात सहभाग घेतला. मात्र प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वेगळे स्वच्छता अभियान व आरोग्य शिबीरांचे आयोजन झाले नसल्याची माहिती भाजपच्याच एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

‘सोशल मीडिया’वर शांतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी ‘पोस्ट’ टाकण्यात भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते आघाडीवर होते. मात्र अटल ‘काव्यांजली’ व ‘कार्यांजली’चा उल्लेखदेखील दिसून आला नाही. अटलजींच्या नावाने ‘काव्यांजली’चा उपक्रम होणार की नाही, असा प्रश्न भाजपच्याच कार्यकर्त्यांना पडला आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा