शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

नागपुरात ३७ ब्लॅक स्पॉट, ६१२ अपघात, २६४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 19:41 IST

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे, असे असताना नागपुरात अपघाताचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) असून गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ६१२ अपघात झाले आहेत. यात २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात असे ६९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ६९ ‘ब्लॅक स्पॉट : सारेच काही धक्कादायक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे, असे असताना नागपुरात अपघाताचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) असून गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ६१२ अपघात झाले आहेत. यात २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात असे ६९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.मागील तीन वर्षांत ज्या ठिकाणी पाच रस्ते अपघात झाले आहेत व अपघातांमध्ये व्यक्ती जखमी किंवा मृत झाली आहे किंवा मागील तीन वर्षांत रस्ते अपघातात १० व्यक्ती मरण पावल्या आहेत ते अपघात स्थळ ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित केले जाते. गेल्या वर्षी शहरात असे ४५ तर ग्रामीण भागात ३२ ‘ब्लॅक स्पॉट’ होते. सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या पाहणीत शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये घट होऊन त्याची संख्या ३७ वर आली आहे. परंतु या ठिकाणी गेल्या तीन वर्षांत झालेले अपघात व त्यामुळे जीव गमावून बसलेल्यांचा आकडा धक्कादायक आहे. सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालय ‘ब्लॅक स्पॉट’ला किती गंभीरतेने घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वाहतूक शाखा क्र १ : अपघाताचे ठिकाण ११ , मृत्यू ८९शहरात सर्वाधिक ‘ब्लॅक स्पॉट’ हे वाहतूक शाखा क्र. १ अंतर्गत येणाऱ्या भागात आहेत. येथे ११ ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी झालेल्या अपघातात ८९ जण मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक आठवा मैल पोलीस स्टेशन वाडी या ‘स्पॉट’वर झालेल्या ३५ अपघातांमध्ये २५ जणांचा मृत्यू, वाडी टी पॉर्इंटवर झालेल्या ५१ अपघातांमध्ये २१ जणांचा मृत्यू, वडधामणा ठिकाणी झालेल्या २२ अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू, राजीवनगर ठिकाणी झालेल्या २५ अपघातांमध्ये आठ मृत्यू व आयसी चौक ठिकाणी झालेल्या १९ अपघातांमध्ये पाच मृत्यू झालेले आहेत. या शिवाय, डोंगरगाव, गौसे मानापूर, त्रिमूर्तीनगर, सुभाषनगर व छत्रपतीनगर या अपघाताच्या ठिकाणी एकूण ४५ अपघात झाले असून १९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.वाहतूक शाखा क्र. २: अपघाताचे ठिकाण १२, मृत्यू ६५वाहतूक शाखा क्रमांक दोन अंतर्गत जीपीओ चौक, महाराजबाग, छत्रपती चौक, माता कचेरी चौक, परसोडी गाव, धंतोली पूल, व्हेटर्नरी कॉलेज, राजभवन गेट, कॅम्प चौक, एलआयसी चौक, पागल खाना चौक व काटोल रोड या ‘ब्लॅक स्पॉट’वर ६६ अपघात झाले. यात ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.वाहतूक शाखा क्र. ३, ४ : अपघाताचे ठिकाण ६, मृत्यू २२वाहतूक शाखा क्रमांक तीनमध्ये मेहंदीबाग ओव्हर ब्रीज हा एकच ‘ब्लॅक स्पॉट’ आहे. येथे गेल्या तीन वर्षांत सहा अपघात झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर क्रमांक चारमध्ये पाच अपघाताचे ठिकाण आहेत. यात म्हाळगीनगर चौक, चामट चक्की चौक, मानेवाडा चौक व परिसर, विहीरगाव पूल व वाठोडा चौक व परिसर असून या अपघाताच्या ठिकाणी ४० अपघात झाले असून १८ जण मृत्युमुखी पडले आहेत.वाहतूक शाखा क्र. ५ : अपघाताचे ठिकाण ८, मृत्यू ८८वाहतूक शाखा क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या आठ अपघाताच्या ठिकाणी ३०३ अपघात झाले असून ८८ जण मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक, ६६ अपघात जुना पारडी नाका येथे झाले असून १८ जण मृत्युमुखी पडले. जरीपटका रिंगरोड चौकात ३७ अपघात झाले असून ९ जण बळी पडले. मारुती शो रुम चौकात ४६ अपघात झाले, यात ११ जणांचा मृत्यू झाला. उप्पलवाडी पूल येथे झालेल्या ३८ अपघातांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. विटा भट्टी येथे ३२ अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू तर प्रकाश हायस्कूल ते कापसी पूल दरम्यानच्या ‘ब्लॅक स्पॉट’वर ६६ अपघात झाले असून २७ जण मृत्युमुखी पडले आहेत.‘ब्लॅक स्पॉट’ शून्यावर आणणारगेल्या काही वर्षांपासून ‘ब्लॅक स्पॉट’ कमी करण्यावर आमचा जोर राहिला आहे. त्यात यश आल्यानेच गेल्या वर्षी ४५ असलेले ब्लॅक स्पॉट या वर्षी ३७ वर आले आहेत. यावर्षी हा आकडा शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.शरद जिचकारप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

 

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर