शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

नागपुरात ३७ ब्लॅक स्पॉट, ६१२ अपघात, २६४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 19:41 IST

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे, असे असताना नागपुरात अपघाताचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) असून गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ६१२ अपघात झाले आहेत. यात २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात असे ६९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ६९ ‘ब्लॅक स्पॉट : सारेच काही धक्कादायक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे, असे असताना नागपुरात अपघाताचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) असून गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ६१२ अपघात झाले आहेत. यात २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात असे ६९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.मागील तीन वर्षांत ज्या ठिकाणी पाच रस्ते अपघात झाले आहेत व अपघातांमध्ये व्यक्ती जखमी किंवा मृत झाली आहे किंवा मागील तीन वर्षांत रस्ते अपघातात १० व्यक्ती मरण पावल्या आहेत ते अपघात स्थळ ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित केले जाते. गेल्या वर्षी शहरात असे ४५ तर ग्रामीण भागात ३२ ‘ब्लॅक स्पॉट’ होते. सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या पाहणीत शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये घट होऊन त्याची संख्या ३७ वर आली आहे. परंतु या ठिकाणी गेल्या तीन वर्षांत झालेले अपघात व त्यामुळे जीव गमावून बसलेल्यांचा आकडा धक्कादायक आहे. सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालय ‘ब्लॅक स्पॉट’ला किती गंभीरतेने घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वाहतूक शाखा क्र १ : अपघाताचे ठिकाण ११ , मृत्यू ८९शहरात सर्वाधिक ‘ब्लॅक स्पॉट’ हे वाहतूक शाखा क्र. १ अंतर्गत येणाऱ्या भागात आहेत. येथे ११ ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी झालेल्या अपघातात ८९ जण मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक आठवा मैल पोलीस स्टेशन वाडी या ‘स्पॉट’वर झालेल्या ३५ अपघातांमध्ये २५ जणांचा मृत्यू, वाडी टी पॉर्इंटवर झालेल्या ५१ अपघातांमध्ये २१ जणांचा मृत्यू, वडधामणा ठिकाणी झालेल्या २२ अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू, राजीवनगर ठिकाणी झालेल्या २५ अपघातांमध्ये आठ मृत्यू व आयसी चौक ठिकाणी झालेल्या १९ अपघातांमध्ये पाच मृत्यू झालेले आहेत. या शिवाय, डोंगरगाव, गौसे मानापूर, त्रिमूर्तीनगर, सुभाषनगर व छत्रपतीनगर या अपघाताच्या ठिकाणी एकूण ४५ अपघात झाले असून १९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.वाहतूक शाखा क्र. २: अपघाताचे ठिकाण १२, मृत्यू ६५वाहतूक शाखा क्रमांक दोन अंतर्गत जीपीओ चौक, महाराजबाग, छत्रपती चौक, माता कचेरी चौक, परसोडी गाव, धंतोली पूल, व्हेटर्नरी कॉलेज, राजभवन गेट, कॅम्प चौक, एलआयसी चौक, पागल खाना चौक व काटोल रोड या ‘ब्लॅक स्पॉट’वर ६६ अपघात झाले. यात ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.वाहतूक शाखा क्र. ३, ४ : अपघाताचे ठिकाण ६, मृत्यू २२वाहतूक शाखा क्रमांक तीनमध्ये मेहंदीबाग ओव्हर ब्रीज हा एकच ‘ब्लॅक स्पॉट’ आहे. येथे गेल्या तीन वर्षांत सहा अपघात झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर क्रमांक चारमध्ये पाच अपघाताचे ठिकाण आहेत. यात म्हाळगीनगर चौक, चामट चक्की चौक, मानेवाडा चौक व परिसर, विहीरगाव पूल व वाठोडा चौक व परिसर असून या अपघाताच्या ठिकाणी ४० अपघात झाले असून १८ जण मृत्युमुखी पडले आहेत.वाहतूक शाखा क्र. ५ : अपघाताचे ठिकाण ८, मृत्यू ८८वाहतूक शाखा क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या आठ अपघाताच्या ठिकाणी ३०३ अपघात झाले असून ८८ जण मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक, ६६ अपघात जुना पारडी नाका येथे झाले असून १८ जण मृत्युमुखी पडले. जरीपटका रिंगरोड चौकात ३७ अपघात झाले असून ९ जण बळी पडले. मारुती शो रुम चौकात ४६ अपघात झाले, यात ११ जणांचा मृत्यू झाला. उप्पलवाडी पूल येथे झालेल्या ३८ अपघातांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. विटा भट्टी येथे ३२ अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू तर प्रकाश हायस्कूल ते कापसी पूल दरम्यानच्या ‘ब्लॅक स्पॉट’वर ६६ अपघात झाले असून २७ जण मृत्युमुखी पडले आहेत.‘ब्लॅक स्पॉट’ शून्यावर आणणारगेल्या काही वर्षांपासून ‘ब्लॅक स्पॉट’ कमी करण्यावर आमचा जोर राहिला आहे. त्यात यश आल्यानेच गेल्या वर्षी ४५ असलेले ब्लॅक स्पॉट या वर्षी ३७ वर आले आहेत. यावर्षी हा आकडा शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.शरद जिचकारप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

 

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर