शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

नागपुरात ३७ ब्लॅक स्पॉट, ६१२ अपघात, २६४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 19:41 IST

वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे, असे असताना नागपुरात अपघाताचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) असून गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ६१२ अपघात झाले आहेत. यात २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात असे ६९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ६९ ‘ब्लॅक स्पॉट : सारेच काही धक्कादायक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत चालली आहे, असे असताना नागपुरात अपघाताचे ठिकाण (ब्लॅक स्पॉट) असून गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ६१२ अपघात झाले आहेत. यात २६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात असे ६९ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.मागील तीन वर्षांत ज्या ठिकाणी पाच रस्ते अपघात झाले आहेत व अपघातांमध्ये व्यक्ती जखमी किंवा मृत झाली आहे किंवा मागील तीन वर्षांत रस्ते अपघातात १० व्यक्ती मरण पावल्या आहेत ते अपघात स्थळ ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित केले जाते. गेल्या वर्षी शहरात असे ४५ तर ग्रामीण भागात ३२ ‘ब्लॅक स्पॉट’ होते. सप्टेंबर २०१७ मध्ये झालेल्या पाहणीत शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’मध्ये घट होऊन त्याची संख्या ३७ वर आली आहे. परंतु या ठिकाणी गेल्या तीन वर्षांत झालेले अपघात व त्यामुळे जीव गमावून बसलेल्यांचा आकडा धक्कादायक आहे. सोमवारपासून रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालय ‘ब्लॅक स्पॉट’ला किती गंभीरतेने घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वाहतूक शाखा क्र १ : अपघाताचे ठिकाण ११ , मृत्यू ८९शहरात सर्वाधिक ‘ब्लॅक स्पॉट’ हे वाहतूक शाखा क्र. १ अंतर्गत येणाऱ्या भागात आहेत. येथे ११ ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी झालेल्या अपघातात ८९ जण मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक आठवा मैल पोलीस स्टेशन वाडी या ‘स्पॉट’वर झालेल्या ३५ अपघातांमध्ये २५ जणांचा मृत्यू, वाडी टी पॉर्इंटवर झालेल्या ५१ अपघातांमध्ये २१ जणांचा मृत्यू, वडधामणा ठिकाणी झालेल्या २२ अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू, राजीवनगर ठिकाणी झालेल्या २५ अपघातांमध्ये आठ मृत्यू व आयसी चौक ठिकाणी झालेल्या १९ अपघातांमध्ये पाच मृत्यू झालेले आहेत. या शिवाय, डोंगरगाव, गौसे मानापूर, त्रिमूर्तीनगर, सुभाषनगर व छत्रपतीनगर या अपघाताच्या ठिकाणी एकूण ४५ अपघात झाले असून १९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.वाहतूक शाखा क्र. २: अपघाताचे ठिकाण १२, मृत्यू ६५वाहतूक शाखा क्रमांक दोन अंतर्गत जीपीओ चौक, महाराजबाग, छत्रपती चौक, माता कचेरी चौक, परसोडी गाव, धंतोली पूल, व्हेटर्नरी कॉलेज, राजभवन गेट, कॅम्प चौक, एलआयसी चौक, पागल खाना चौक व काटोल रोड या ‘ब्लॅक स्पॉट’वर ६६ अपघात झाले. यात ६५ जणांचा मृत्यू झाला आहे.वाहतूक शाखा क्र. ३, ४ : अपघाताचे ठिकाण ६, मृत्यू २२वाहतूक शाखा क्रमांक तीनमध्ये मेहंदीबाग ओव्हर ब्रीज हा एकच ‘ब्लॅक स्पॉट’ आहे. येथे गेल्या तीन वर्षांत सहा अपघात झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर क्रमांक चारमध्ये पाच अपघाताचे ठिकाण आहेत. यात म्हाळगीनगर चौक, चामट चक्की चौक, मानेवाडा चौक व परिसर, विहीरगाव पूल व वाठोडा चौक व परिसर असून या अपघाताच्या ठिकाणी ४० अपघात झाले असून १८ जण मृत्युमुखी पडले आहेत.वाहतूक शाखा क्र. ५ : अपघाताचे ठिकाण ८, मृत्यू ८८वाहतूक शाखा क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या आठ अपघाताच्या ठिकाणी ३०३ अपघात झाले असून ८८ जण मृत्युमुखी पडले. यात सर्वाधिक, ६६ अपघात जुना पारडी नाका येथे झाले असून १८ जण मृत्युमुखी पडले. जरीपटका रिंगरोड चौकात ३७ अपघात झाले असून ९ जण बळी पडले. मारुती शो रुम चौकात ४६ अपघात झाले, यात ११ जणांचा मृत्यू झाला. उप्पलवाडी पूल येथे झालेल्या ३८ अपघातांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. विटा भट्टी येथे ३२ अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू तर प्रकाश हायस्कूल ते कापसी पूल दरम्यानच्या ‘ब्लॅक स्पॉट’वर ६६ अपघात झाले असून २७ जण मृत्युमुखी पडले आहेत.‘ब्लॅक स्पॉट’ शून्यावर आणणारगेल्या काही वर्षांपासून ‘ब्लॅक स्पॉट’ कमी करण्यावर आमचा जोर राहिला आहे. त्यात यश आल्यानेच गेल्या वर्षी ४५ असलेले ब्लॅक स्पॉट या वर्षी ३७ वर आले आहेत. यावर्षी हा आकडा शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.शरद जिचकारप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर

 

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर