शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपूर ग्रामीण भागात वादळवाऱ्यामुळे महावितरणचे १० लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 7:15 PM

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळवाºयासह पावसामुळे नागपूरच्या ग्रामीण भागात महावितरणच्या प्राथमिक अंदाजानुसार १० लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही भागात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देअनेक भागात वीजपुरवठा सुरळीत : १५१ विद्युत खांब जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळवाºयासह पावसामुळे नागपूरच्या ग्रामीण भागात महावितरणच्या प्राथमिक अंदाजानुसार १० लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही भागात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे.वादळवाºयामुळे ग्रामीण भागात महावितरणचे उच्च दाबाचे ४६ आणि लघु दाबाचे १०५ वीज खांब जमीनदोस्त झाले. सोबतच १२ रोहित्र यामुळे नादुरुस्त झाले. वादळवाऱ्याचा सर्वाधिक फटका महावितरणच्या मौदा विभागास बसला. मौदा विभागातील मौदा, रामटेक, कामठी, कन्हान, झुल्लर, वडोदा या गावात विजेचे खांब जमीनदोस्त झाले. १२ पैकी ५ रोहित्र मौदा विभागात नादुरुस्त झाले. उच्च दाबाचे ४६ विद्युत खांब पडल्याने १ लाख १२ हजार व १०५ विजेचे खांब पडल्याने ३ लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. उच्च दाबाच्या २.६ किलोमीटर वीजवाहिनीचे ६१ हजार रुपयांचे तर ११ किलोमीटर लांबीच्या वीजवाहिनीचे २ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. १२ रोहित्र नादुरुस्त झाल्याने १ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले.काटोल, सावनेरमध्येही बसला फटकाकाटोल विभागातील रिधोरा, बाजारगाव, सावरगाव, जलालखेडा, सावनेर विभागातील गोंडखैरी, कळमेश्वर या गावांना बसला होता. येथे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले असून काही ठिकाणी विजेचे खांब उभारणीचे काम सुरू आहे. २ दिवसात येथील वीजपुरवठा सुरळीत होईल.उमरेड विभागातील ५६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडितउमरेड विभागातील डोंगरगाव वीज उपकेंद्र रविवारी रात्री बंद पडले. त्यामुळे ५६०० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पण महावितरणकडून रात्रीच या परिसरातील वीजपुरवठा टप्याटप्यात सुरळीत करण्यात आला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRainपाऊस