शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

Maharashtra Bandh : नागपुरात 'बंद'ला संमिश्र प्रतिसाद; राजकीय पक्षांचा निदर्शनावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 13:49 IST

महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. नागपुरात मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून शहरातील दुकाने, भाजी मार्केट सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याची विक्री सुरळीत सुरू असून मार्केटमध्ये खरेदीदार आणि शेतकऱ्यांची गर्दीही पाहायला मिळत आहे. (Maharashtra Bandh)

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचा 'बंदला' विरोध : दुकाने, भाजी मार्केट, बाजारपेठ सुरू

नागपूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून टाकल्याच्या घटनेचा निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’चे (Maharashtra Bandh) आवाहन केले होते. नागपुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Case) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकारने आज 'महाराष्ट्र्र बंदची' हाक दिली आहे. नागपुरात या बंदच्या समर्थनार्थ राजकीय पक्षांनी विविध ठिकाणी आंदोलनं केली, मोर्चे काढून निदर्शने केली. तर, दुसरीकडे व्यापारी वर्गाने या बंदला आधीच विरोध दर्शविला होता. त्यामुळे शहरातील दुकाने, भाजी मार्केट, बाजारपेठ सुरू आहेत.   

नागपुरात

 

काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी सुरू असलेली दुकाने बंद करायला लावली होती. मात्र, काही वेळाने बाजारपेठा सुरू झाल्या. नागपुरातील कॅाटनमार्केट भाजी मंडीत सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आणलेल्या भाजीपाल्याची विक्री सुरू असून भाजी मार्केटमध्ये खरेदीदार आणि शेतकऱ्यांची गर्दीही पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या बंदला नागपुरातील व्यापाऱ्यांनी आधीच विरोध दर्शविला होता. प्रशासन आणि पोलिसांनी व्यापाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन विदर्भातील १३ लाख किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी केले होते. 

कोरोना लॉकडाऊननंतर आता कुठे व्यवसायाला वेग आला आहे. सणांच्या दिवसात व्यापाऱ्यांना एक दिवसही दुकान बंद ठेवणे परवडणारे नाही. कारण ऑनलाईन व्यवसाय वाढला आहे. तो एक दिवसही बंद राहत नाही. बाजारातील दुकाने बंद राहिल्यास ग्राहक ऑनलाईनकडे वळतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मेहाडिया म्हणाले होते. 

तर, आंदोलनात सर्व पक्षांचे कार्यकर्ते बाजारपेठांमध्ये फिरून बळजबरीने दुकाने बंद करतात. अनेकदा संघर्षाची स्थिती निर्माण होते. अशावेळी प्रशासन आणि पोलिसांनी त्यांच्यावर आवर घालून दुकाने सुरू ठेवावीत. व्यापारी नेहमीच सरकारसोबत आहेत. उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खिरी येथील घटनेचा आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करावा, पण त्यासाठी व्यापाऱ्यांना टार्गेट करू नये, असे आवाहन मेहाडिया यांनी केले होते.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस